शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

काश्मीरमधून मुंबई, ठाण्यात चरसची विक्री, तिघांना अटक, ३२ लाखांचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 02:10 IST

थेट जम्मू-काश्मीरमधून मुंबई, ठाण्यात चरसची तस्करी करणा-या साजीद खान (३८), अब्दुल गुजली (५५) आणि मोहम्मद मकबूल भट (५५) या तिघांना मुंब्य्रातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.

ठाणे : थेट जम्मू-काश्मीरमधून मुंबई, ठाण्यात चरसची तस्करी करणा-या साजीद खान (३८), अब्दुल गुजली (५५) आणि मोहम्मद मकबूल भट (५५) या तिघांना मुंब्य्रातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १५ हजार ७०० ग्रॅम चरस या अमली पदार्थासह ३२ लाख ४० हजार ७३० रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली. आंतरराष्टÑीय बाजारपेठेत त्याची किंमत सुमारे ३१ कोटींच्या घरात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुंब्य्रातील मित्तल ग्राउंड येथील सार्वजनिक स्वच्छतागृहासमोर काही व्यक्ती चरसच्या विक्रीसाठी १ मार्च रोजी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे मुंब्रा रेल्वे स्थानक ते कौसा भागाकडे जाणाºया रस्त्यावर उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली शर्मा यांच्यासह निरीक्षक राजकुमार कोथमिरे, विकास घोडके, उपनिरीक्षक हेमंत ढोले, अविनाश महाजन, विकास बाबर आदींच्या पथकाने सापळा लावून गुरुवारी दुपारी पावणेचार वाजता साजीद (रा. अमृतनगर, मुंब्रा) याच्या ताब्यातून ८०० ग्रॅम चरस, अब्दुल गुजली (रा. संबल, जम्मू-काश्मीर) याच्याकडून आठ हजार ८०० ग्रॅम चरस आणि मोहम्मद मुक्ता (रा. पहिलपोरा, जि. गंधरबल, जम्मू-काश्मीर) याच्याकडून सहा हजार १०० ग्रॅम चरस असे ३१ लाख ४० हजारांचे १५ किलो ७०० ग्रॅम चरस तसेच एक लाख ७३० रुपयांची रक्कम असा ऐवज जप्त केला. त्यांनी हे चरस जम्मू-काश्मीर येथून आणल्याची कबुली दिली. या तिघांविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे न्यायालयाने त्यांना ५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यामागे आणखी कोणती टोळी सक्रिय आहे का? किती दिवसांपासून ते ही तस्करी करत होते, या सर्व बाबींचा तपास सुरू असल्याचे रानडे यांनी सांगितले.कोणत्या देशांमध्ये अधिक मागणीचरस या अमलीपदार्थाची हॉलंड, कॅनडा या देशांमध्ये अधिक मागणी असते. चरस हा उच्च प्रतीचा मानला जातो. भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये त्याची प्रामुख्याने निर्मिती होते. काश्मीरमधून७० ते ८० हजारांमध्ये खरेदी केल्यानंतर अब्दुल गुजली आणि त्याचे साथीदार ते मुंबई, ठाण्यासह देशभरात दोन लाख रुपये किलोच्या दराने विक्री करत होते. आंतरराष्टÑीय बाजारपेठेत मात्र याच चरसचा दर किलोमागे दोन कोटी रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हा