शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

काश्मीरमधून मुंबई, ठाण्यात चरसची विक्री, तिघांना अटक, ३२ लाखांचा ऐवज जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2018 02:10 IST

थेट जम्मू-काश्मीरमधून मुंबई, ठाण्यात चरसची तस्करी करणा-या साजीद खान (३८), अब्दुल गुजली (५५) आणि मोहम्मद मकबूल भट (५५) या तिघांना मुंब्य्रातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे.

ठाणे : थेट जम्मू-काश्मीरमधून मुंबई, ठाण्यात चरसची तस्करी करणा-या साजीद खान (३८), अब्दुल गुजली (५५) आणि मोहम्मद मकबूल भट (५५) या तिघांना मुंब्य्रातून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून १५ हजार ७०० ग्रॅम चरस या अमली पदार्थासह ३२ लाख ४० हजार ७३० रुपयांचा ऐवज जप्त केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे यांनी दिली. आंतरराष्टÑीय बाजारपेठेत त्याची किंमत सुमारे ३१ कोटींच्या घरात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.मुंब्य्रातील मित्तल ग्राउंड येथील सार्वजनिक स्वच्छतागृहासमोर काही व्यक्ती चरसच्या विक्रीसाठी १ मार्च रोजी येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती. याच माहितीच्या आधारे मुंब्रा रेल्वे स्थानक ते कौसा भागाकडे जाणाºया रस्त्यावर उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्या मार्गदर्शनाखाली शर्मा यांच्यासह निरीक्षक राजकुमार कोथमिरे, विकास घोडके, उपनिरीक्षक हेमंत ढोले, अविनाश महाजन, विकास बाबर आदींच्या पथकाने सापळा लावून गुरुवारी दुपारी पावणेचार वाजता साजीद (रा. अमृतनगर, मुंब्रा) याच्या ताब्यातून ८०० ग्रॅम चरस, अब्दुल गुजली (रा. संबल, जम्मू-काश्मीर) याच्याकडून आठ हजार ८०० ग्रॅम चरस आणि मोहम्मद मुक्ता (रा. पहिलपोरा, जि. गंधरबल, जम्मू-काश्मीर) याच्याकडून सहा हजार १०० ग्रॅम चरस असे ३१ लाख ४० हजारांचे १५ किलो ७०० ग्रॅम चरस तसेच एक लाख ७३० रुपयांची रक्कम असा ऐवज जप्त केला. त्यांनी हे चरस जम्मू-काश्मीर येथून आणल्याची कबुली दिली. या तिघांविरुद्ध मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाणे न्यायालयाने त्यांना ५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यामागे आणखी कोणती टोळी सक्रिय आहे का? किती दिवसांपासून ते ही तस्करी करत होते, या सर्व बाबींचा तपास सुरू असल्याचे रानडे यांनी सांगितले.कोणत्या देशांमध्ये अधिक मागणीचरस या अमलीपदार्थाची हॉलंड, कॅनडा या देशांमध्ये अधिक मागणी असते. चरस हा उच्च प्रतीचा मानला जातो. भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या देशांमध्ये त्याची प्रामुख्याने निर्मिती होते. काश्मीरमधून७० ते ८० हजारांमध्ये खरेदी केल्यानंतर अब्दुल गुजली आणि त्याचे साथीदार ते मुंबई, ठाण्यासह देशभरात दोन लाख रुपये किलोच्या दराने विक्री करत होते. आंतरराष्टÑीय बाजारपेठेत मात्र याच चरसचा दर किलोमागे दोन कोटी रुपये असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :thaneठाणेCrimeगुन्हा