शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
2
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
3
कोव्हिशील्ड घेतलेल्यांना सर्वात महत्वाची गोष्ट सांगायची राहूनच गेली! रवी गोडसेंनी सांगितला पुढचा 'धोका...'
4
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती
5
Uma Bharti : "काँग्रेसने सत्ता मिळवण्यासाठी देशाचे विभाजन केले"; उमा भारतींची राहुल-सोनिया गांधींवर टीका
6
अहो आश्चर्यम्! मारुतीच्या नव्या स्विफ्टला मिळाली ४ स्टार सेफ्टी रेटिंग; जपानमध्ये क्रॅश टेस्ट
7
Multibagger Stock : सलग तिसऱ्या दिवशी 'या' कंपनीच्या शेअरला अपर सर्किट; वर्षभरापासून करतोय मालामाल
8
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
9
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
10
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
11
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
12
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
13
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
14
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
१२ अफेयर, २ वर्षात झाला घटस्फोट, आता या अभिनेत्रीला थाटायचाय दुसरा संसार
16
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
17
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
18
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
19
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
20
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक

मुंबई-गोरखपूर अंत्योदय एक्स्प्रेसचा डबा घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2019 5:48 AM

मुंबई-नाशिक रेल्वेमार्गावरील कसारा घाटात गुरुवारी पहाटे पावणेचार वाजता प्रवासी साखरझोपेत असताना मुंबईहून गोरखपूरला जाणाऱ्या अंत्योदय हमसफर गोरखपूर एक्स्प्रेसच्या एका डब्याचे चाक घसरले.

श्याम धुमाळ कसारा : मुंबई-नाशिक रेल्वेमार्गावरील कसारा घाटात गुरुवारी पहाटे पावणेचार वाजता प्रवासी साखरझोपेत असताना मुंबईहून गोरखपूरला जाणाऱ्या अंत्योदय हमसफर गोरखपूर एक्स्प्रेसच्या एका डब्याचे चाक घसरले. सुदैवाने यात कुणीही जखमी झाले नाही. मात्र, यामुळे नाशिककडे जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. जर या एक्स्प्रेसच्या मुख्य इंजीनजवळील डबा घसरला असता, तर मोठा अपघात झाला असता. जवळपास ५०० फूट खोल दरीत एका डब्यापाठोपाठ सर्वच डबे कोसळून मोठा अनर्थ झाला असता. दरम्यान, रेल्वे प्रशासनाला या अपघाताबाबत माहिती विचारली असता, किरकोळ अपघात असल्याची माहिती दिली. पहाटे ४ पासून प्रवासी येथे अडकले असून रेल्वे प्रशासनाने कोणतीही सुविधा पुरवली नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.या घटनेची माहिती मिळताच शहापूरचे आपत्ती व्यवस्थापन सदस्य घटनास्थळी दाखल झाले, तर रेल्वे प्रशासनाच्या आपत्कालीन विभागाने तब्बल तीन तासांनंतर मदतकार्य सुरू केले. गुरुवारी पहाटे मुंबईहून गोरखपूरला जाणारी हमसफर एक्स्प्रेस कसारा सोडल्यानंतर घाटात असलेल्या ब्रिटिशकालीन भीमादोन पुलावर पहाटे साडेतीनच्या सुमारास वळणावर पुढच्या इंजीनपासून सतरावा डबा व मागच्या इंजीनपासून दुसरा डबा रुळांवरून घसरला. पुलावर काहीतरी होऊन मोठा आवाज आल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने प्रसंंगावधान राखून गाडी थांबवली. यामुळे मोठी दुर्घटना टळली.पहाटेपासून गाडी पुलावर उभी असल्याने प्रवासी भेदरलेल्या अवस्थेत होते. या वेळी रेल्वे प्रशासनाने डाउन मार्गावरून येणाºया सर्व गाड्या अपमार्गाने वळवल्या होत्या. गाडी पुलावरून बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.ज्या वेळी डबा घसरला, त्या वेळी गाडीतील प्रवाशांना मोठा धक्का बसला. कोणी वरच्या सीटवरून तर कोणी खालच्या सीटवरून पडले. गाडीच्या आवाजामुळे लहान मुलांसह महिला मोठमोठ्याने रडत होत्या. अनेक प्रवाशांनी काय प्रकार झाला, हे बघण्यासाठी दरवाजाकडे धाव घेतली, तेव्हा आजूबाजूला दाट धुके व सुमारे ५०० फूट खोल दरी दिसल्याने प्रवाशांत घबराट पसरली. गाडीतील महिलांनी जागेवर बसून देवाचा धावा सुरू केला.पहाटे साडेतीन ते ६ पर्यंत रेल्वेकडून प्रवाशांना कुठलीही मदत मिळाली नाही. अपघातग्रस्त प्रवाशांना एका विशेष गाडीने सकाळी साडेनऊ वाजता इगतपुरी रेल्वे स्थानकावर आणल्यानंतर रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना चहा, बिस्किटे, पाणी, वडापाव देण्यात आले.>पहाटे साखरझोपेत असताना अचानक मोठा आवाज आला. काही समजण्याअगोदरच गाडीतील दरवाजे आदळले, काचा फुटल्या. खडबडून उठलो तेव्हा गाडीत आरडाओरडा सुरू होता. मी दरवाजाजवळ धावत गेलो, तर समोर खोल दरी व आजूबाजूला दाट अंधार व धुके होते. पहाटे साडेतीन ते सकाळी ६ पर्यंत आमची रेल्वे प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही.- सुनील यादव,प्रवासी, वडाळा>रात्री ३च्या सुमारास कसारा सोडल्यावर पहाटे कसारा घाटात गाडी आली. माझी मुलगी एका बर्थवर झोपली होती, तर मी खालील बर्थवर. पहाटे घटना घडण्याअगोदर पाच मिनिटे मला जाग आली. मी उठून बॅगा व माझ्यासोबतच्या प्रवाशांकडे पाहिले व पुन्हा जागेवर झोपण्यासाठी आले असता अचानक जोराचा आवाज झाला. गाडीने अचानक ब्रेक लावल्याने काचा वगैरे फुटल्या. मी गाडीतील लहान मुले व महिलांना एकत्र केले. षुरु ष मंडळींनी दरवाजा बंद करत सर्वांना धीर दिला.- प्रीती चव्हाण, प्रवासी, गोरखपूरमुंबईहून निघालेल्या या गाडीची कारशेडमध्ये दुरु स्ती न झाल्याने रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रसंग ओढवला. देवाच्या कृपेने आम्ही वाचलो.- चंद्रभान रनवर, प्रवासी, नालासोपारा>मदतकार्यात अडथळेइगतपुरी रेल्वे स्थानकापासून १५ मिनिटांच्या अंतरावर हा अपघात घडला होता. परंतु, पहाटे ६ पर्यंत कोणतीही मदत रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना झाली नाही. ज्या ठिकाणी दुर्घटना घडली, त्या ठिकाणी मदतकार्य करण्यासाठी खूप अडथळे येत होते. आजूबाजूला दरी असल्याने रेल्वे कर्मचारी साखळी पद्धतीने दुरुस्ती करत होते.> इतर मेल, एक्सप्रेस, लोकलवर परिणाममुंबई : या घटनेमुळे इतर मेल, एक्स्प्रेसची सेवा काही काळ रखडली होती. त्यामुळे दोन्ही दिशेकडील जाणाºया मेल, एक्स्प्रेस आणि लोकल सेवेवर परिणाम झाला. मध्य रेल्वे प्रशासनाने या मार्गावरून विशेष गाड्या चालविल्या. गर्दी विभाजित करण्यासाठी गाडी क्रमांक १२११० पंचवटी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२२६२ हावडा ते मुंबई, गाडी क्रमांक १२३२१ हावडा ते मुंबई या मेल, एक्स्प्रेसला डोंबिवली, दिवा, ठाणे, दादर येथे थांबा दिला गेला.