शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

मुंबईतील कचरा भिवंडीकरांच्या माथी; हिरव्यागार निसर्गाला प्रदूषणाचे ग्रहण

By नितीन पंडित | Updated: September 8, 2023 17:36 IST

गृह प्रकल्पासमोर गावातील काही मंडळी आपल्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरील कचरा टाकण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

भिवंडी : मुंबईसह ठाणे व आजूबाजूच्या परिसरातील कचरा भिवंडीतील दिवे अंजुर गावात टाकला जात असून या कचऱ्याला आग लावल्याने होत असलेल्या धुराच्या प्रदूषणाने येथील स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.या प्रदूषणाबाबत स्थानिक नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळासह स्थानिक ग्राम पंचायत व पोलीस प्रशासनाबरोबरच केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे लेखी निवेदने दिली आहेत मात्र तरीही शासकीय यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

भिवंडीतील निसर्गरम्य असलेल्या दिवे अंजुर व मानकोली परिसरात मोठ्या प्रमाणात मोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत.भिवंडी ग्रामीण भागात निसर्ग सौंदर्य मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक बांधकाम व्यवसायिकांनी येथे मोठं मोठी गृह प्रकल्प बांधली आहेत.याच परिसरात अप्पर ठाणे म्हणून ओळख असलेल्या लोढा गृह प्रकल्प असून शहराच्या दाटीवाटीतून स्वतःची सुटका करून घेतलेले अनेक नागरिकांनी या गृह संकुलात मोठी किंमत देऊन घरे घेतली आहेत.मात्र याच गृह प्रकल्पासमोर गावातील काही मंडळी आपल्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरील कचरा टाकण्यासाठी पुढाकार घेत आहेत.त्यामुळे या ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहेत.त्याचबरोबर कचरा जास्त झाली की या कचऱ्याला आग लावली जाते त्यामुळे कचऱ्याचा धूर गावाबरोबरच बाजूला असलेल्या शाळा व अप्पर ठाणे प्रकल्पात पसरल्याने येथील नागरिकांना धुराचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

ठाणे मुंबईच्या धकाधकीच्या वातावरणातून भिवंडीतील निसर्गरम्य ठिकाणी आम्ही पैसे खर्च करून राहिला आलो आहोत.मात्र येथे काही नागरिक बाहेरचा कचरा आणून टाकत असून या कचऱ्याच्या दुर्गंधी व धुराने आम्ही हैराण झालो आहोत.याबाबत शासकीय यंत्रणेसह ग्राम पंचायत,पोलीस,प्रदूषण मंडळ व खासदारांना देखील विनंती केली आहे मात्र आमच्या या गंभीर समस्येकडे कोणीही लक्ष देत नाही त्यामुळे भविष्यात भिवंडीतील निसर्गरम्य असलेल्या ग्रामीण भागात देखील प्रदूषणाची समस्या गंभीर होणार असून आमच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे अशी प्रतिक्रिया लोढा अप्पर ठाणे गृहप्रकल्पातील रहिवासी संतोष नार्वेकर यांनी लोकमतकडे व्यक्त केली आहे.