शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

मुंबईतील कचरा भिवंडीकरांच्या माथी; हिरव्यागार निसर्गाला प्रदूषणाचे ग्रहण

By नितीन पंडित | Updated: September 8, 2023 17:36 IST

गृह प्रकल्पासमोर गावातील काही मंडळी आपल्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरील कचरा टाकण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

भिवंडी : मुंबईसह ठाणे व आजूबाजूच्या परिसरातील कचरा भिवंडीतील दिवे अंजुर गावात टाकला जात असून या कचऱ्याला आग लावल्याने होत असलेल्या धुराच्या प्रदूषणाने येथील स्थानिक नागरिक हैराण झाले आहेत.या प्रदूषणाबाबत स्थानिक नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळासह स्थानिक ग्राम पंचायत व पोलीस प्रशासनाबरोबरच केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांच्याकडे लेखी निवेदने दिली आहेत मात्र तरीही शासकीय यंत्रणा याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

भिवंडीतील निसर्गरम्य असलेल्या दिवे अंजुर व मानकोली परिसरात मोठ्या प्रमाणात मोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत.भिवंडी ग्रामीण भागात निसर्ग सौंदर्य मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक बांधकाम व्यवसायिकांनी येथे मोठं मोठी गृह प्रकल्प बांधली आहेत.याच परिसरात अप्पर ठाणे म्हणून ओळख असलेल्या लोढा गृह प्रकल्प असून शहराच्या दाटीवाटीतून स्वतःची सुटका करून घेतलेले अनेक नागरिकांनी या गृह संकुलात मोठी किंमत देऊन घरे घेतली आहेत.मात्र याच गृह प्रकल्पासमोर गावातील काही मंडळी आपल्या स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी बाहेरील कचरा टाकण्यासाठी पुढाकार घेत आहेत.त्यामुळे या ठिकाणी कचऱ्याचे ढिगारे तयार झाले आहेत.त्याचबरोबर कचरा जास्त झाली की या कचऱ्याला आग लावली जाते त्यामुळे कचऱ्याचा धूर गावाबरोबरच बाजूला असलेल्या शाळा व अप्पर ठाणे प्रकल्पात पसरल्याने येथील नागरिकांना धुराचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.

ठाणे मुंबईच्या धकाधकीच्या वातावरणातून भिवंडीतील निसर्गरम्य ठिकाणी आम्ही पैसे खर्च करून राहिला आलो आहोत.मात्र येथे काही नागरिक बाहेरचा कचरा आणून टाकत असून या कचऱ्याच्या दुर्गंधी व धुराने आम्ही हैराण झालो आहोत.याबाबत शासकीय यंत्रणेसह ग्राम पंचायत,पोलीस,प्रदूषण मंडळ व खासदारांना देखील विनंती केली आहे मात्र आमच्या या गंभीर समस्येकडे कोणीही लक्ष देत नाही त्यामुळे भविष्यात भिवंडीतील निसर्गरम्य असलेल्या ग्रामीण भागात देखील प्रदूषणाची समस्या गंभीर होणार असून आमच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे अशी प्रतिक्रिया लोढा अप्पर ठाणे गृहप्रकल्पातील रहिवासी संतोष नार्वेकर यांनी लोकमतकडे व्यक्त केली आहे.