शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दितवा’चा प्रभाव! पाऊस झाला आता थंडी कहर करणार? महाराष्ट्रातील २ ठिकाणे सर्वाधिक गारठणार
2
आता ठाकरेंची वेळ! शिंदेच्या ठाण्यातील बडा नेता उद्धवसेनेत; म्हणाले, “सत्तेसाठी लाचारी...”
3
अयोध्येत होणार आता भव्य राम मंदिर संग्रहालय; सरकारने दिली ५२ एकर जमीन, TATA कंपनी बांधणार
4
“निवडणूक आयुक्तांच्या विरोधात महाभियोग आणण्यासाठी विशेष अधिवेशन बोलावले पाहिजे”: नाना पटोले
5
सावंतवाडीत पोलिस ठाण्यात शिंदे सेना-भाजपाचे कार्यकर्ते भिडले; पोलिसांकडून वेळीच हस्तक्षेप
6
DRDO ची मोठी कामगिरी; 800 KM वेगावर फायटर जेट एस्केप सिस्टीमचे यशस्वी परीक्षण
7
मिशन 2026! बंगाल, असम, केरळ आणि तामिळनाडूसाठी भाजपचा प्लान तयार..!
8
२०२५ची शेवटची पौर्णिमा: ३ गोष्टी कराच, महालक्ष्मी दोन्ही हातांनी भरभरून देईल; भरभराट होईल!
9
२०२५ संपताना हवं ते देणार, ८ राशींना सगळं मिळणार; गुरु-बुधाचा षडाष्टक योग, सोन्यासारखे दिवस!
10
भाजपचे उमेदवार अजय अग्रवाल बोगस मतदान करुन घेत असल्याचा खळबळजनक आरोप ! फार्म हाऊसवर मिळाले महत्वाचे पुरावे
11
इम्रान खान जिवंत की मृत? तुरुंगात भेटायला गेलेली डॉक्टर बहीण बाहेर आली, म्हणाली... 
12
रोहित तयार, पण किंग कोहलीच्या मनात वाजतंय "आम्ही नाही जा.." गाणं; गंभीर-आगरकरचा 'तो' डाव फसणार?
13
“नगरपालिका निवडणुकीत आचारसंहितेची पायमल्ली, महायुतीविरोधात हजारो तक्रारी”; काँग्रेसची टीका
14
दिल्लीच्या CM रेखा गुप्ता यांच्या हस्ते पिकलबॉल लीग ट्रॉफीचे अनावरण; मुंबई-चेन्नईसह ६ फ्रँचायझी संघात रंगणार स्पर्धा
15
Video: निरागस बाबा..! लेकीनं दाखवलं 'कोरियन हार्ट' पण बापाला वाटलं वेगळंच.. पुढे काय झालं?
16
“शिंदे मालवणात आले, येताना बॅगेतून काय आणले?”; थेट व्हिडिओ दाखवत संजय राऊतांचा सवाल
17
प्राजक्ता-शंभूराजच्या लग्नाचा अल्बम आला समोर; राजेशाही थाटात पार पडला लग्नसोहळा
18
हसावे की...! मतदान केंद्रातील कर्मचारी बोटाला शाई लावायची सोडून गप्पा हाणत बसला; मतदार मतदान करून...
19
Travel : भारतीयांसाठी व्हिसा फ्री एन्ट्री! पण, मलेशिया फिरायला किती खर्च येतो? जायचा विचार करताय तर जाणून घ्या...
20
आकाशाला गवसणी! चंद्र-ताऱ्यांची स्वप्न पाहणारी भारताची मिसाईल वुमन; पुरस्काराने झाला सन्मान
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले नाही तर एकही विमान उडू देणार नाही; खा. बाळ्या मामांचा केंद्र सरकारला इशारा

By नितीन पंडित | Updated: December 2, 2025 20:24 IST

समाजाच्या रोषाची वाट न पाहता स्व. दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळास द्यावे अन्यथा संघर्ष अटळ आहे अशी प्रतिक्रिया खा.सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे.

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: नवी मुंबईविमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव दिले नाही तर या विमान तळावरून एकही विमान उडू देणार नाही असा इशारा केंद्र सरकारला भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.यावेळी नवी मुंबई येथील निलेश पाटील,सागर पाटील,गिरीश साळगावकर,धीरज पाटील,रवी मढवी,अतुल म्हात्रे रोशन पाटील हिमांशू पाटील,सुशांत पाटील,सर्वेश तरे यांसह विविध भूमिपुत्र संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी १४ सप्टेंबर रोजी खासदार बाळ्या मामा यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी ते नवी मुंबई विमानतळ व जासई गावापर्यंत कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.त्यांनतर विमानतळाचे उदघाटन होऊ देणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला होता.या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी ३ ऑक्टोबर रोजी स्थानिक भूमिपुत्रांसोबत बैठक घेत दोन ते अडीच महिन्यात विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याचे आश्वासन दिले होते.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अश्वासनाला ३ डिसेंम्बर रोजी दोन महिने पूर्ण होणार असून २५ डिसेंम्बर रोजी हे विमानतळ उड्डाणासाठी सुरु होणार आहे.

मात्र केंद्र शासनाने अजूनही नामकरण प्रस्ताव चर्चेला आणलेला नाही व त्याबाबत कोणताही ठोस निर्णक घेतलेला नाही.त्यामुळे केंद्र शासनाची भूमिका हि स्थानिक भूमिपुत्रांना वेठीस धरणारी असल्याने स्थानिक भूमीपुत्रांच्या वतीने २२ डिसेंम्बर रोजी भिवंडीतील मानकोली नाका ते नवी मुंबई विमानतळ पर्यंत पदयात्रा जन आक्रोश आंदोलन करण्यात येणार असून २४ डिसेंम्बर रोजी विमानतळावर हे पदयात्रा आंदोलन पोहचणार असून २५ डिसेंम्बर रोजी या विमानतळावरून एकही विमान आम्ही उडू देणार नाही अशी भूमिका आज स्थानिक भूमीपुत्रसंघटनेच्या वतीने घेतलेल्या बैठकीत ठराव करण्यात आला असल्याची माहिती खा बाळ्या मामा यांनी या पत्रकार परिषदेत दिली आहे.

राज्य सरकार केंद्र सरकार कडे प्रस्ताव पाठविल्याचे सांगत आहे,पण दिल्लीत मी स्वतः मंत्रालयात चौकशी केली असता ते प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेसाठी घेतलाच गेला नसल्याचे समजले,म्हणजे सरकार जाणीव पूर्वक चालढकल पणा करीत असून भूमिपुत्रांच्या ही मागणी जाणीवपूर्वक डावलली जात असल्याने सर्व पाच ही जिल्ह्यातील सागरी भूमिपुत्र समाजामध्ये प्रचंड रोष असून ,सरकारच्या हाती २० दिवस आहेत त्यादरम्यान समाजाच्या रोषाची वाट न पाहता स्व. दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळास द्यावे अन्यथा संघर्ष अटळ आहे अशी प्रतिक्रिया खा.सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : No flights if Navi Mumbai Airport isn't named for Patil.

Web Summary : MP Balyan Mama warns the central government: no flights will operate from Navi Mumbai Airport if Loknete D.B. Patil's name isn't given. A car rally and protests are planned, demanding immediate action before the airport's December 25th opening.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळCentral Governmentकेंद्र सरकार