शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले नाही तर एकही विमान उडू देणार नाही; खा. बाळ्या मामांचा केंद्र सरकारला इशारा

By नितीन पंडित | Updated: December 2, 2025 20:24 IST

समाजाच्या रोषाची वाट न पाहता स्व. दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळास द्यावे अन्यथा संघर्ष अटळ आहे अशी प्रतिक्रिया खा.सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे.

नितीन पंडित, लोकमत न्यूज नेटवर्क, भिवंडी: नवी मुंबईविमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचे नाव दिले नाही तर या विमान तळावरून एकही विमान उडू देणार नाही असा इशारा केंद्र सरकारला भिवंडी लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी मंगळवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.यावेळी नवी मुंबई येथील निलेश पाटील,सागर पाटील,गिरीश साळगावकर,धीरज पाटील,रवी मढवी,अतुल म्हात्रे रोशन पाटील हिमांशू पाटील,सुशांत पाटील,सर्वेश तरे यांसह विविध भूमिपुत्र संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव द्यावे यासाठी १४ सप्टेंबर रोजी खासदार बाळ्या मामा यांच्या नेतृत्वाखाली भिवंडी ते नवी मुंबई विमानतळ व जासई गावापर्यंत कार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.त्यांनतर विमानतळाचे उदघाटन होऊ देणार नाही असा पवित्रा आंदोलनकर्त्यांनी घेतला होता.या आंदोलनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी ३ ऑक्टोबर रोजी स्थानिक भूमिपुत्रांसोबत बैठक घेत दोन ते अडीच महिन्यात विमानतळाला दि बा पाटील यांचे नाव देण्याचे आश्वासन दिले होते.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अश्वासनाला ३ डिसेंम्बर रोजी दोन महिने पूर्ण होणार असून २५ डिसेंम्बर रोजी हे विमानतळ उड्डाणासाठी सुरु होणार आहे.

मात्र केंद्र शासनाने अजूनही नामकरण प्रस्ताव चर्चेला आणलेला नाही व त्याबाबत कोणताही ठोस निर्णक घेतलेला नाही.त्यामुळे केंद्र शासनाची भूमिका हि स्थानिक भूमिपुत्रांना वेठीस धरणारी असल्याने स्थानिक भूमीपुत्रांच्या वतीने २२ डिसेंम्बर रोजी भिवंडीतील मानकोली नाका ते नवी मुंबई विमानतळ पर्यंत पदयात्रा जन आक्रोश आंदोलन करण्यात येणार असून २४ डिसेंम्बर रोजी विमानतळावर हे पदयात्रा आंदोलन पोहचणार असून २५ डिसेंम्बर रोजी या विमानतळावरून एकही विमान आम्ही उडू देणार नाही अशी भूमिका आज स्थानिक भूमीपुत्रसंघटनेच्या वतीने घेतलेल्या बैठकीत ठराव करण्यात आला असल्याची माहिती खा बाळ्या मामा यांनी या पत्रकार परिषदेत दिली आहे.

राज्य सरकार केंद्र सरकार कडे प्रस्ताव पाठविल्याचे सांगत आहे,पण दिल्लीत मी स्वतः मंत्रालयात चौकशी केली असता ते प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत चर्चेसाठी घेतलाच गेला नसल्याचे समजले,म्हणजे सरकार जाणीव पूर्वक चालढकल पणा करीत असून भूमिपुत्रांच्या ही मागणी जाणीवपूर्वक डावलली जात असल्याने सर्व पाच ही जिल्ह्यातील सागरी भूमिपुत्र समाजामध्ये प्रचंड रोष असून ,सरकारच्या हाती २० दिवस आहेत त्यादरम्यान समाजाच्या रोषाची वाट न पाहता स्व. दि.बा.पाटील यांचे नाव विमानतळास द्यावे अन्यथा संघर्ष अटळ आहे अशी प्रतिक्रिया खा.सुरेश म्हात्रे यांनी दिली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : No flights if Navi Mumbai Airport isn't named for Patil.

Web Summary : MP Balyan Mama warns the central government: no flights will operate from Navi Mumbai Airport if Loknete D.B. Patil's name isn't given. A car rally and protests are planned, demanding immediate action before the airport's December 25th opening.
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईAirportविमानतळCentral Governmentकेंद्र सरकार