शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

ठाण्यात ५०० चौरस फुटांच्या घराच्या करमाफीसाठी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2021 04:25 IST

ठाणे : २०१७ च्या निवडणुकीत दिलेले आश्वासन अद्यापही पूर्ण न झाल्याने ठाणेकर नागरिकांची फसवणूक झाली आहे. ती करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या ...

ठाणे : २०१७ च्या निवडणुकीत दिलेले आश्वासन अद्यापही पूर्ण न झाल्याने ठाणेकर नागरिकांची फसवणूक झाली आहे. ती करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या निषेधार्थ मंगळवारी ठाणे महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर ठाणे वेल्फेअर सोसायटी या सामाजिक संस्थेने निदर्शने केली. या वेळी “फसवले फसवले - ठाणेकरांना फसवले”, “दिलेले आश्वासन पूर्ण करा, नाहीतर खुर्च्या खाली करा”, “५०० चौरस फुटांच्या घरांची करमाफी झालीच पाहिजे,” अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या. तसेच यापुढे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गल्लोगल्ली जाऊन आंदोलन करणार असल्याचा इशाराही दिला.

संस्थेचे अध्यक्ष ॲड. अल्पेश कदम यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. या वेळी हातात बॅनर घेऊन २० ते २५ ठाणेकरांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता.

लवकरात लवकर ठाणेकरांना ही करमाफी लागू करावी, या मागणीसाठी हे आंदोलन केले आहे. एकीकडे बिल्डरांना मेट्रो सेस माफ केला जातो. मात्र, ठाणेकर नागरिकांना कररूपी भुर्दंड टाकणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात यापुढे अशीच गल्लोगल्ली आंदोलने करण्यात येणार असल्याचे कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.