शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

उत्तनचे डम्पिंग ग्राउंड अन्यत्र हलवा

By admin | Updated: March 5, 2016 01:26 IST

शहरातील कचरा उत्तन येथील डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकण्यास येथील नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. अन्यत्र पर्याय शोधण्याची सूचना ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने गुरुवारच्या प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत केली.

भार्इंदर : शहरातील कचरा उत्तन येथील डम्पिंग ग्राउंडमध्ये टाकण्यास येथील नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. अन्यत्र पर्याय शोधण्याची सूचना ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने गुरुवारच्या प्रशासनासोबत झालेल्या बैठकीत केली.शिष्टमंडळात नगरसेवक बर्नड डिमेलो, नगरसेविका शर्मिला बगाजी, हेलन जॉर्जी, लिओ कोलासो, रेनॉल्ड बेचरी, विल्यम गोविंद जॉर्जी, अ‍ॅलन बोर्जीस यांचा समावेश होता. पालिकेने २००८ मध्ये उत्तनच्या धावगी-डोंगरी येथे बीओटी तत्त्वावर कचऱ्यावरील पुनर्प्रक्रिया प्रकल्प सुरू केला. त्या वेळी स्थानिकांनी विरोध केल्यानंतर प्रशासनाच्या वतीने तेथील धर्मगुरूंसह स्थानिक नेत्यांनी हा प्रकल्प लवकरच अन्यत्र स्थलांतर करण्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. परंतु, हा प्रकल्प आजही तेथेच सुरू आहे. तेथील प्रकल्प बंद पडल्याने कचरा उघड्यावर टाकला जात आहे. दरम्यानच्या काळात तो वसई तालुक्यातील सकवार येथे स्थलांतरित करण्याची कार्यवाही प्रशासनाने सुरू केल्यानंतर ती जागा वन विभागांतर्गत असल्याने वन विभागाने अद्याप परवानगी दिलेली नाही. तसेच या प्रकल्पास सकवार ग्रामस्थांनीही विरोध केल्यामुळे हा प्रकल्प रखडण्याची शक्यता निर्माण झाल्याने पालिकेने एमएमआरडीएमार्फत तळोजा येथे प्रस्तावित असलेल्या प्रकल्पात समाविष्ट होण्यासाठी तयारी दर्शविली आहे. त्यामुळे उत्तन येथील डम्पिंग ग्राउंड सुरूच राहिल्याने त्याच्या स्थलांतरासाठी ग्रामस्थांनी नागरी हक्क समितीच्या माध्यमातून १० वर्षांपासून पालिकेकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यावर प्रशासनाकडून प्रकल्प स्थलांतराचा निर्णय लवकरच घेतला जाईल, असे सांगून स्थानिकांचा विरोध थोपवला जात आहे. त्यातच, सकवार येथील नियोजित प्रकल्पही वन विभागाच्या लालफितीत अडकल्याने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार या प्रकल्पाचा अभ्यास करणाऱ्या आयआयटीच्या अहवालानुसार कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची सूचना पालिकेला केली आहे. डम्पिंग ग्राउंडच स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी उत्तनच्या शिष्टमंडळाने पालिका आयुक्त अच्युत हांगे यांची भेट घेत शहरातील कचरा उत्तन येथे टाकण्यास विरोध दर्शविला. नागरिकांचा विरोध शमवण्यासाठी प्रशासनाने येत्या दोन महिन्यांत येथील कचऱ्यावर प्रभावी प्रक्रिया केली जाणार आहे. (प्रतिनिधी)