शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

मोरबे धरणाला गळती सुरूच, पाटबंधारे विभागाचे डागडुजीकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 06:54 IST

: पनवेल परिसरातील पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील येणाºया मोरबे धरणाच्या भिंतीला ठिकठिकाणी तडे गेले आहेत.

- मयूर तांबडेपनवेल : पनवेल परिसरातील पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील येणाºया मोरबे धरणाच्या भिंतीला ठिकठिकाणी तडे गेले आहेत. त्यातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. गेल्या काही वर्षांपासून धरणाच्या दगडी भिंतीला तडे गेल्यामुळे पाणीगळती सुरू आहे. मात्र तरीही धरणाची डागडुजी करण्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे.मार्च महिना सुरू असला तरी पनवेल तालुक्यातील काही गावांमध्ये पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. अजून संपूर्ण उन्हाळा बाकी आहे. त्यामुळे तालुक्यात टंचाईची भीषण समस्या उद्भवण्याची शक्यता आहे. शासन स्तरावर पाणी वाचवा, पाणी जिरवा अशी कितीही ओरड होत असली तरी प्रत्यक्षात मात्र पनवेल परिसरात पाण्याची नासाडी होताना दिसत आहे. पाटबंधारे खात्याच्या मोरबे धरणातून दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असताना देखील डागडुजीकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.तालुक्यातील खैरवाडी-गारमाळ परिसरातील मोरबे धरण जवळपास ५० एकर जमिनीवर व्यापले आहे. धरणाचे पाणी आजूबाजूच्या गावातील शेतीसाठी वापरले जाते. त्यामुळे परिसरातील नागरिकांना दुबार पीक घेता येणे शक्य होते. मोरबे धरणातील पाण्यावरच गारमाळ, मोरबे, येरमाळ आदी परिसरातील नागरिक दुबार भाताचे पीक घेतात. तसेच मोरबे, दुंदरेपाडा, चिंचवली या गावांतील नागरिक पिण्यासाठी येथील पाण्याचा उपयोग करतात. धरणाची क्षमता ३.२२ दशलक्ष घनमीटर असून ३.१२ दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा असतो.तालुक्यातील अनेक गावे सध्या पाणीटंचाईने त्रस्त झाली आहेत. आदिवासी बांधवांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे आणि मोरबे धरणातून जवळपास दोन ते तीन वर्षापासून नियमितपणे हजारो लिटर पाणी वाया जात आहे. पनवेल महापालिकेसाठी या धरणाच्या पाण्याचा उपयोग करण्यात यावा असे देखील सुचविण्यात आले असल्याचे समजते. मात्र या धरणाच्या दुरु स्तीकडे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप केला जात आहे.आमदारांचाही पाठपुरावाजल अमृत योजना मंजूर होवून त्यातून पनवेलकरांना नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा व्हावा याकरिता आमदार प्रशांत ठाकूर यांनी शासन स्तरावर पाठपुरावा केला होता. यासंदर्भात त्यांनी नुकतीच नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांची भेट घेतली होती.पनवेलमधील ग्रामीण भागात पाणीटंचाई सुरू आहे. उन्हाळ्यात ही समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. तालुक्यातील मोरबे धरणाची डागडुजी करून ते पाणी वापरात आणणे गरजेचे आहे. मात्र त्याकडे पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. पनवेल महापालिकेतील लोकप्रतिनिधींकडून याबाबत पाठपुरावा होणे गरजेचे आहे.सध्या पनवेलमधील ग्रामीण भागात पाणीटंचाई भेडसावत आहे. अशा वेळी मोरबे धरणातील पाणी ग्रामस्थांना मिळाले तर त्यांची वणवण थांबेल. धरणातील गळती थांबण्यासाठी पाटबंधारे विभागाने लवकरात लवकर डागडुजी करणे गरजेचे आहे. यासंदर्भात पाटबंधारे विभाग तसेच जिल्हाधिकाºयांशी पत्रव्यवहार केला आहे.- नीलेश बाविस्कर, पाणीपुरवठा सभापती, पनवेल महापालिका

टॅग्स :Damधरणthaneठाणे