शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

तुझ्याविना गं आई मला मुळीच करमत नाही…; अनाथाश्रमात सोडलेल्या लहानग्याने संपवले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2024 09:14 IST

आईच्या विरहाने व्याकूळ ७ वर्षे १० महिने वयाच्या चिमुरड्याने विहिरीत उडी मारून जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड : वडील वारल्यानंतर आईने दुसऱ्याशी घरोबा केला असता, दोन मुलांना अनाथाश्रमात ठेवले होते, परंतु आईच्या विरहाने व्याकूळ ७ वर्षे १० महिने वयाच्या चिमुरड्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे. 

नालासोपारा येथील अब्दुल सय्यद याच्याशी प्रीती हिने लग्न केले होते. लग्नानंतर तिचे नाव फरिदा झाले. अब्दुलपासून तिला चार मुले झाली, परंतु अब्दुल सय्यद याच्या मृत्यूनंतर २९ वर्षांच्या फरिदासमोर मुलांच्या पालनपोषणाचा  प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे तिने दुसऱ्याशी घरोबा केला.  दुसऱ्यासोबत घरोबा केल्यानंतर तिने २६ जूनला  तिच्या ७ वर्षे ७ महिन्याच्या अरमान व ११ वर्षांचा रेहान यांना भाईंदरच्या उत्तन-पाली येथील सेवा कुटीर या अनाथाश्रमात ठेवले. दीड वर्षाचे आणि ४ वर्षे वयाची तिची दोन मुले फरिदा हिने स्वतःसोबत ठेवली. 

आईजवळ राहण्याचा हट्ट

फरिदा हिने २६ जून रोजी अरमानला आश्रमात ठेवले तेव्हा तो खूप रडला होता. फरिदा तीन वेळा आश्रमात मुलांना भेटायला गेली. अरमान तुझ्यासोबत राहायचे आहे, असा हट्ट धरून रडत असे. आश्रमात २१ मुले आहेत. ८ ऑक्टोबरला सकाळी अरमान न दिसल्याने त्याची शोधाशोध सुरू झाली. परिसरातील विहिरीत अरमानचा मृतदेह आढळला. भाईंदर विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना, उत्तन सागरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादाराम करांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. उत्तन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून स.पो.नि. सपन बिश्वास तपास करत आहेत. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर