शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

तुझ्याविना गं आई मला मुळीच करमत नाही…; अनाथाश्रमात सोडलेल्या लहानग्याने संपवले जीवन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2024 09:14 IST

आईच्या विरहाने व्याकूळ ७ वर्षे १० महिने वयाच्या चिमुरड्याने विहिरीत उडी मारून जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरा रोड : वडील वारल्यानंतर आईने दुसऱ्याशी घरोबा केला असता, दोन मुलांना अनाथाश्रमात ठेवले होते, परंतु आईच्या विरहाने व्याकूळ ७ वर्षे १० महिने वयाच्या चिमुरड्याने विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना भाईंदरमध्ये घडली आहे. 

नालासोपारा येथील अब्दुल सय्यद याच्याशी प्रीती हिने लग्न केले होते. लग्नानंतर तिचे नाव फरिदा झाले. अब्दुलपासून तिला चार मुले झाली, परंतु अब्दुल सय्यद याच्या मृत्यूनंतर २९ वर्षांच्या फरिदासमोर मुलांच्या पालनपोषणाचा  प्रश्न निर्माण झाला. त्यामुळे तिने दुसऱ्याशी घरोबा केला.  दुसऱ्यासोबत घरोबा केल्यानंतर तिने २६ जूनला  तिच्या ७ वर्षे ७ महिन्याच्या अरमान व ११ वर्षांचा रेहान यांना भाईंदरच्या उत्तन-पाली येथील सेवा कुटीर या अनाथाश्रमात ठेवले. दीड वर्षाचे आणि ४ वर्षे वयाची तिची दोन मुले फरिदा हिने स्वतःसोबत ठेवली. 

आईजवळ राहण्याचा हट्ट

फरिदा हिने २६ जून रोजी अरमानला आश्रमात ठेवले तेव्हा तो खूप रडला होता. फरिदा तीन वेळा आश्रमात मुलांना भेटायला गेली. अरमान तुझ्यासोबत राहायचे आहे, असा हट्ट धरून रडत असे. आश्रमात २१ मुले आहेत. ८ ऑक्टोबरला सकाळी अरमान न दिसल्याने त्याची शोधाशोध सुरू झाली. परिसरातील विहिरीत अरमानचा मृतदेह आढळला. भाईंदर विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त दीपाली खन्ना, उत्तन सागरी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दादाराम करांडे यांनी घटनास्थळी भेट दिली. उत्तन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून स.पो.नि. सपन बिश्वास तपास करत आहेत. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर