शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
2
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
3
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
4
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
5
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
6
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
7
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा
8
Tripuri Purnima 2025: त्रिपुरी पौर्णिमा हीच 'मनोरथ पौर्णिमा'; ५ नोव्हेंबरला 'या' वस्तूंचे दान ठरेल वरदान!
9
'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
10
...म्हणून त्या डंपरचालकाने ५० जणांना चिरडलं, धक्कादायक कारण समोर आलं
11
ऐतिहासिक अंदाज: निफ्टी ५४,००० अंकांचा टप्पा गाठणार; काय म्हणाले एक्सपर्ट?
12
आई-वडिलांशिवाय लेकाची पहिली फ्लाईट, जिनिलिया देशमुखने शेअर केला व्हिडीओ; म्हणाली...
13
काळाचा घाला! बाराबंकीमध्ये भीषण अपघात; ६ जणांचा मृत्यू, ८ जखमी, कारचा चक्काचूर
14
Reliance Anil Ambani: अनिल अंबानींची ७,५०० कोटींची संपत्ती जप्त; नवी मुंबईतील १३२ एकर जागा, पाली हिलमधील घरासह ४० संपत्त्यांवर टाच
15
पगार नाही तर विमानही नाही! इंजिनिअर्सच्या संपाने पाकिस्तान आंतरराष्ट्रीय एअरलाईन्स ठप्प, प्रवाशांचे हाल
16
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
17
CA Final Result: सीए फायनल परीक्षेत मुकुंद अगिवाल देशात प्रथम; फाऊंडेशन परीक्षेत मुंबईचा नील राजेश शाह तिसरा
18
मलायकासोबत दिसणारा 'तो' कोण? अभिनेत्रीहून १७ वर्ष लहान; प्रचंड श्रीमंत आहे हा 'मिस्ट्री मॅन'!
19
हातावर मेंदी लावून आल्या म्हणून मुलींना चक्क वर्गात बसू देण्यास शाळेचा नकार; मुंबईतील घटना
20
कडक! सलमान खानचं गजब ट्रान्सफॉर्मेशन, ६० वर्षांचा होणार भाईजान; बॉडी दाखवत म्हणाला...

मीरा भाईंदर शहरातील २४ हून अधिक जुन्या विहिरी होणार पुनरुजीवित

By धीरज परब | Updated: March 7, 2024 19:08 IST

Mira Bhayandar : मीरा भाईंदर शहरातील जवळपास २४ हुन अधिक विहिरींची टप्या टप्याने साफ सफाई करून विहिरींमधील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत जिवंत करण्यासाठी एकूण ५० कोटी रुपये निधी मंजूर केला असून महापालिकेतर्फे त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे सांगत त्या कामांची सुरवात आमदार प्रताप सरनाईक यांनी केली.

मीरारोड -  मीरा भाईंदर शहरातील जवळपास २४ हुन अधिक विहिरींची टप्या टप्याने साफ सफाई करून विहिरींमधील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत जिवंत करण्यासाठी एकूण ५० कोटी रुपये निधी मंजूर केला असून महापालिकेतर्फे त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असल्याचे सांगत त्या कामांची सुरवात आमदार प्रताप सरनाईक यांनी केली.

मीरा शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून महापालिकेकडून होणारा पाणी पुरवठा अपुरा त्यातच अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे बंद राहतो . एप्रिल-मे महिन्यात पाणी कपातीला नागरिकांना तोंड द्यावे लागते. नागरिकांना पाणी टंचाई व बाहेरून पाणी विकत घेण्याचा भुर्दंड पडतो . त्यामुळे शहरात पूर्वीच्या काळापासून असलेल्या विहिरी पुर्नजीवित कराव्यात, या विहिरींमधील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत जपले जावेत, भविष्याच्या दृष्टीने हे पाणी नागरिकांच्या उपयोगी पडण्यासाठी सर्व विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीने साफ सफाई करण्याची मागणी आ . सरनाईक यांनी चालवली होती. 

अनेक पूर्वीच्या विहिरी बुजवल्या गेल्या आहेत. काही विहिरी १०० वर्ष जुन्या आहेत. काही ठिकाणी कचराकुंडी म्हणून विहिरीचा वापर होतोय. तर काही विहिरींमध्ये चक्क सांडपाणी सोडून विहिरी प्रदूषित केल्या गेल्या आहेत. अशा बहुतांश सगळ्या विहिरी घाण होऊन  पाण्याला दुर्गंधी येते. तसेच आतील पाण्याचे नैसर्गिक स्त्रोत बंद होत चालले आहेत. अश्या विहरींची साफसफाई करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे . ७ मार्च रोजी मीरा गावठाण, महाविष्णू मंदिराशेजारील विहीर व मस्कर पाडा, काशीमीरा येथील या दोन विहिरींच्या कामाची सुरवात आ. प्रताप सरनाईक  यांच्या हस्ते करण्यात आली .

या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर, जिल्हासंघटक निशा नार्वेकर, १४६ ओवळा माजिवडा विधानसभा क्षेत्रप्रमुख सचिन मांजरेकर,  मिरा भाईंदर १४५ विधानसभा क्षेत्रप्रमुख विक्रम प्रताप सिंह, महिला संघटक’’ पूजा आमगावकर, उपजिल्हाप्रमुख विकास पाटील,  , रामभवन शर्मा, युवासेना  ठाणे पालघर  निरीक्षक स्वराज पाटील, माजी नगरसेविका संध्या पाटील, वंदना पाटील, उपशहरप्रमुख ऍड बाबासाहेब बंडे,  कमलाकर पाटील, राजु पाटील, शिवाजी पानमंद, उपशहरसंघटक गिता रॉय, शहरसमन्वय संगिता खुणे आदींसह पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

सर्वच विहिरींची टप्या टप्याने साफ सफाई करून विहिरींमधील नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत जिवंत करण्यासाठी एकूण ५० कोटी रुपये निधीची आवश्यकता असल्याने त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. विहिरींच्या संवर्धन प्रकल्पात  खोदाई करून साफसफाई व त्यातील पाण्याचे झरे जिवंत केले जातील.  सांडपाणी सोडले जात असेल तर ते बंद केले जाईल. विहिरीचे कठडे नव्याने बांधून, प्लास्टरिंग करणे व सुरक्षिततेच्या दृष्टीने ग्रील लावण्यात येणार आहे. विहिरींच्या वर जलशुद्धीकरण सयंत्र लावण्यात येणार आहे. हे यंत्र पूर्णतः सौर उर्जेवर चालणारे असेल. इनलेट पॅरामीटर्स वर आधारीत वॉटर ट्रीटमेंट प्लांटची रचना करण्यात येणार आहे. या यंत्रणेत वाळू गाळण्याची प्रक्रिया कार्बन फिल्टरेशन, अल्ट्रा फिल्टरेशन, यु.व्ही. प्रणालीचा समावेश केला आहे जेणेकरून विभागातील नागरिकांना दैनंदिन वापराकरिता योग्य व शुद्ध असे पाणी उपलब्ध होणार आहे, असे सरनाईक यांनी सांगितले. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर