शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
3
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
4
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
5
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
6
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
7
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
8
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
9
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
10
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
11
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
12
डोनाल्ड ट्रम्प यांचा H-1B व्हिसा बॉम्ब होणार बॅकफायर, अमेरिकेचंच होणार नुकसान, तर भारताचा...
13
सर्वपित्री अमावास्या २०२५: पूर्वज स्मरणासह ‘ही’ कामे अवश्य कराच; पुण्य-वरदान-कृपा लाभेल!
14
तुमचा पुण्यातील रोजचा प्रवास ३५ किमी आहे, तर तुम्ही कोणती स्कूटर, मोटरसायकल घ्यावी? 
15
Navratri 2025: नवरात्रीत घट बसवण्याआधी देवघरात 'हे' बदल केले का? नसेल तर आजच करा
16
परदेशात फिरायला जाणाऱ्या प्रवाशांनी शोधली 'ही' नवीन युक्ती; नेमका काय आहे 'फ्लाइंग नेकेड ट्रेंड'?
17
आयडियाची कल्पना! "मला १०० रुपये द्या ना...", गाडी खरेदी करण्यासाठी महिलेचा 'कारनामा'
18
ट्रम्प यांच्या एका निर्णयाने अमेरिकेतील भारतीयांची धाकधूक वाढली; मायक्रोसॉफ्टने कर्मचाऱ्यांना पाठवला तातडीचा ईमेल
19
सर्वार्थ सिद्धी योगात सर्वपित्री अमावास्या २०२५: श्राद्ध विधीचा शुभ मुहूर्त; महत्त्व-मान्यता
20
परदेशी पाहुण्यांशी असलं वागणं शोभतं का? 'टपोरी' मुलाच्या Viral Video वर नेटकरी संतापले

पीक नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:45 IST

केंद्र सरकारला अहवाल देणार। शुक्रवारी अडकले होते वाहतूककोंडीत

ठाणे : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पाच हजार ८८७ हेक्टरवरील पिकांसह शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या वस्तुस्थितीची दोनदिवसीय पाहणी केंद्रीय पथकाने शनिवारी ठिकठिकाणी जाऊन केली. शनिवारी पाऊस असतानाही छत्र्यांच्या मदतीने पथकातील अधिकाऱ्यांनी पीक व जमीन नुकसानीची पाहणी केली. याचा अहवाल ते केंद्र शासनाला देणार आहेत.

केंद्र शासनाच्या या पीक नुकसान पाहणी पथकाकडून शुक्रवार, शनिवार या दोन दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील भातपिकासह शेतजमिनीच्या नुकसानीची पाहणी केली. शुक्रवारी रायगडहून येताना या पथकास वाहतूककोंडीचा फटका बसला. पेणजवळील हमरापूर परिसरात वाहतूककोंडीत अडकले होते. तरी, शुक्रवारी संध्याकाळी बारवी येथील विश्रामगृहात गेल्यानंतर पीकपाहणीचे पे्रझेंटेशन जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना देऊन शनिवारी सकाळीच नियोजनानुसार अंबरनाथ तालुक्यातील कसगाव येथील पीकनुकसानीची पाहणी केली. याशिवाय, बदलापूरजवळील हेंदरेपाडा, रमेशनगर येथील नुकसानग्रस्त घरांची पाहणी या अधिकाºयांनी केली.कल्याण तालुक्यातील आणे, वासुंद्री, कोंढेरी येथील भातपिकांच्या नुकसानीची पाहणी या केंद्रीय पथकाने केली. यामध्ये केंद्राच्या इलेक्ट्रिकल अ‍ॅथॉरिटीचे सहसंचालक ओम किशोर यांच्यासह केंद्रीय पाणीआयोगाचे संचालक मिलिंद पानपाटील, केंद्राच्या रस्ते वाहतूक महामार्गाचे अधीक्षक अभियंता संजय जैस्वाल, पीएफसीचे संचालक चित्तरंजन दास आदी केंद्रीय पथकातील अधिकाºयांसह ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, कृषी उपसंचालक सावंत, तालुका कृषी अधिकारी शिल्पा निखाडे, संजय पायस, रामचंद्र घुडे आदी अधिकारी या पीक, शेतजमीन नुकसान पाहणी पथकात सामाविष्ट होते.या पथकाने जिल्ह्यातील पाच हजार ८०० हेक्टर पिकांची, तर ८७ हेक्टर शेतजमिनीच्या नुकसानीचीदेखील वस्तुस्थितीची पाहणी या पथकाने केली. या पाहणी दौºयात कल्याण तालुक्यात वसात-शेलवली येथील पीक नुकसानीच्या पाहणीसह आणे व भिसोळ येथील घरांच्या आणि पिकांच्या नुकसानीच्या पाहणीचे नियोजन केले होते. त्याुनसार, या पथकाने पाहणी केली. यामध्ये कल्याण तालुक्यातील वसुंद्री व सांगोडे येथील पीक नुकसानीची पाहणी या दौºयात करण्यात आली.१०,२७५ मालमत्तांचे नुकसानगेल्या महिन्यातील २६ व २७ जुलै या दोन दिवसांसह ४ आॅगस्टच्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे नदीनाल्यांना पूर आला. या पुराच्या पाण्याचा निचरा वेळेत न झाल्यामुळे निवासी वस्त्यांमध्ये पाणी शिरले.यामुळे १० हजार २७५ खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तर, एक हजार ५१८ घरांची पूर्णत: तर काहींची अंशत: पडझड झाली. जिल्हाभरात तब्बल २७ जणांचा या पूरआपत्तीत मृत्यू झाला. या अतिवृष्टीमुळे सहा हजार १०० कुटुंबांना व ५०० व्यक्तींना तात्पुरत्या स्वरूपात निराधार व्हावे लागले होते.एवढेच नव्हे तर गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यासारखी १०४ जनावरे पुराच्या पाण्यात दगावली आहेत. सुमारे पाच हजार ८८७ हेक्टरवरील भातपीक नष्ट झाले आहे. याशिवाय, ८७ हेक्टरवरील शेतजमीन या पूरस्थितीत नापीक झाल्याचे शेतकºयांकडून ऐकायला मिळत आहे. 

टॅग्स :thaneठाणेST Strikeएसटी संप