शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

पीक नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:45 IST

केंद्र सरकारला अहवाल देणार। शुक्रवारी अडकले होते वाहतूककोंडीत

ठाणे : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पाच हजार ८८७ हेक्टरवरील पिकांसह शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या वस्तुस्थितीची दोनदिवसीय पाहणी केंद्रीय पथकाने शनिवारी ठिकठिकाणी जाऊन केली. शनिवारी पाऊस असतानाही छत्र्यांच्या मदतीने पथकातील अधिकाऱ्यांनी पीक व जमीन नुकसानीची पाहणी केली. याचा अहवाल ते केंद्र शासनाला देणार आहेत.

केंद्र शासनाच्या या पीक नुकसान पाहणी पथकाकडून शुक्रवार, शनिवार या दोन दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील भातपिकासह शेतजमिनीच्या नुकसानीची पाहणी केली. शुक्रवारी रायगडहून येताना या पथकास वाहतूककोंडीचा फटका बसला. पेणजवळील हमरापूर परिसरात वाहतूककोंडीत अडकले होते. तरी, शुक्रवारी संध्याकाळी बारवी येथील विश्रामगृहात गेल्यानंतर पीकपाहणीचे पे्रझेंटेशन जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना देऊन शनिवारी सकाळीच नियोजनानुसार अंबरनाथ तालुक्यातील कसगाव येथील पीकनुकसानीची पाहणी केली. याशिवाय, बदलापूरजवळील हेंदरेपाडा, रमेशनगर येथील नुकसानग्रस्त घरांची पाहणी या अधिकाºयांनी केली.कल्याण तालुक्यातील आणे, वासुंद्री, कोंढेरी येथील भातपिकांच्या नुकसानीची पाहणी या केंद्रीय पथकाने केली. यामध्ये केंद्राच्या इलेक्ट्रिकल अ‍ॅथॉरिटीचे सहसंचालक ओम किशोर यांच्यासह केंद्रीय पाणीआयोगाचे संचालक मिलिंद पानपाटील, केंद्राच्या रस्ते वाहतूक महामार्गाचे अधीक्षक अभियंता संजय जैस्वाल, पीएफसीचे संचालक चित्तरंजन दास आदी केंद्रीय पथकातील अधिकाºयांसह ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, कृषी उपसंचालक सावंत, तालुका कृषी अधिकारी शिल्पा निखाडे, संजय पायस, रामचंद्र घुडे आदी अधिकारी या पीक, शेतजमीन नुकसान पाहणी पथकात सामाविष्ट होते.या पथकाने जिल्ह्यातील पाच हजार ८०० हेक्टर पिकांची, तर ८७ हेक्टर शेतजमिनीच्या नुकसानीचीदेखील वस्तुस्थितीची पाहणी या पथकाने केली. या पाहणी दौºयात कल्याण तालुक्यात वसात-शेलवली येथील पीक नुकसानीच्या पाहणीसह आणे व भिसोळ येथील घरांच्या आणि पिकांच्या नुकसानीच्या पाहणीचे नियोजन केले होते. त्याुनसार, या पथकाने पाहणी केली. यामध्ये कल्याण तालुक्यातील वसुंद्री व सांगोडे येथील पीक नुकसानीची पाहणी या दौºयात करण्यात आली.१०,२७५ मालमत्तांचे नुकसानगेल्या महिन्यातील २६ व २७ जुलै या दोन दिवसांसह ४ आॅगस्टच्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे नदीनाल्यांना पूर आला. या पुराच्या पाण्याचा निचरा वेळेत न झाल्यामुळे निवासी वस्त्यांमध्ये पाणी शिरले.यामुळे १० हजार २७५ खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तर, एक हजार ५१८ घरांची पूर्णत: तर काहींची अंशत: पडझड झाली. जिल्हाभरात तब्बल २७ जणांचा या पूरआपत्तीत मृत्यू झाला. या अतिवृष्टीमुळे सहा हजार १०० कुटुंबांना व ५०० व्यक्तींना तात्पुरत्या स्वरूपात निराधार व्हावे लागले होते.एवढेच नव्हे तर गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यासारखी १०४ जनावरे पुराच्या पाण्यात दगावली आहेत. सुमारे पाच हजार ८८७ हेक्टरवरील भातपीक नष्ट झाले आहे. याशिवाय, ८७ हेक्टरवरील शेतजमीन या पूरस्थितीत नापीक झाल्याचे शेतकºयांकडून ऐकायला मिळत आहे. 

टॅग्स :thaneठाणेST Strikeएसटी संप