शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

पीक नुकसानीची केंद्रीय पथकाकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:45 IST

केंद्र सरकारला अहवाल देणार। शुक्रवारी अडकले होते वाहतूककोंडीत

ठाणे : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पाच हजार ८८७ हेक्टरवरील पिकांसह शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या वस्तुस्थितीची दोनदिवसीय पाहणी केंद्रीय पथकाने शनिवारी ठिकठिकाणी जाऊन केली. शनिवारी पाऊस असतानाही छत्र्यांच्या मदतीने पथकातील अधिकाऱ्यांनी पीक व जमीन नुकसानीची पाहणी केली. याचा अहवाल ते केंद्र शासनाला देणार आहेत.

केंद्र शासनाच्या या पीक नुकसान पाहणी पथकाकडून शुक्रवार, शनिवार या दोन दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील भातपिकासह शेतजमिनीच्या नुकसानीची पाहणी केली. शुक्रवारी रायगडहून येताना या पथकास वाहतूककोंडीचा फटका बसला. पेणजवळील हमरापूर परिसरात वाहतूककोंडीत अडकले होते. तरी, शुक्रवारी संध्याकाळी बारवी येथील विश्रामगृहात गेल्यानंतर पीकपाहणीचे पे्रझेंटेशन जिल्ह्यातील अधिकाऱ्यांना देऊन शनिवारी सकाळीच नियोजनानुसार अंबरनाथ तालुक्यातील कसगाव येथील पीकनुकसानीची पाहणी केली. याशिवाय, बदलापूरजवळील हेंदरेपाडा, रमेशनगर येथील नुकसानग्रस्त घरांची पाहणी या अधिकाºयांनी केली.कल्याण तालुक्यातील आणे, वासुंद्री, कोंढेरी येथील भातपिकांच्या नुकसानीची पाहणी या केंद्रीय पथकाने केली. यामध्ये केंद्राच्या इलेक्ट्रिकल अ‍ॅथॉरिटीचे सहसंचालक ओम किशोर यांच्यासह केंद्रीय पाणीआयोगाचे संचालक मिलिंद पानपाटील, केंद्राच्या रस्ते वाहतूक महामार्गाचे अधीक्षक अभियंता संजय जैस्वाल, पीएफसीचे संचालक चित्तरंजन दास आदी केंद्रीय पथकातील अधिकाºयांसह ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, विभागीय कृषी सहसंचालक विकास पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हिरालाल सोनावणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, कृषी उपसंचालक सावंत, तालुका कृषी अधिकारी शिल्पा निखाडे, संजय पायस, रामचंद्र घुडे आदी अधिकारी या पीक, शेतजमीन नुकसान पाहणी पथकात सामाविष्ट होते.या पथकाने जिल्ह्यातील पाच हजार ८०० हेक्टर पिकांची, तर ८७ हेक्टर शेतजमिनीच्या नुकसानीचीदेखील वस्तुस्थितीची पाहणी या पथकाने केली. या पाहणी दौºयात कल्याण तालुक्यात वसात-शेलवली येथील पीक नुकसानीच्या पाहणीसह आणे व भिसोळ येथील घरांच्या आणि पिकांच्या नुकसानीच्या पाहणीचे नियोजन केले होते. त्याुनसार, या पथकाने पाहणी केली. यामध्ये कल्याण तालुक्यातील वसुंद्री व सांगोडे येथील पीक नुकसानीची पाहणी या दौºयात करण्यात आली.१०,२७५ मालमत्तांचे नुकसानगेल्या महिन्यातील २६ व २७ जुलै या दोन दिवसांसह ४ आॅगस्टच्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले. यामुळे नदीनाल्यांना पूर आला. या पुराच्या पाण्याचा निचरा वेळेत न झाल्यामुळे निवासी वस्त्यांमध्ये पाणी शिरले.यामुळे १० हजार २७५ खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तर, एक हजार ५१८ घरांची पूर्णत: तर काहींची अंशत: पडझड झाली. जिल्हाभरात तब्बल २७ जणांचा या पूरआपत्तीत मृत्यू झाला. या अतिवृष्टीमुळे सहा हजार १०० कुटुंबांना व ५०० व्यक्तींना तात्पुरत्या स्वरूपात निराधार व्हावे लागले होते.एवढेच नव्हे तर गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या यासारखी १०४ जनावरे पुराच्या पाण्यात दगावली आहेत. सुमारे पाच हजार ८८७ हेक्टरवरील भातपीक नष्ट झाले आहे. याशिवाय, ८७ हेक्टरवरील शेतजमीन या पूरस्थितीत नापीक झाल्याचे शेतकºयांकडून ऐकायला मिळत आहे. 

टॅग्स :thaneठाणेST Strikeएसटी संप