शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
3
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
4
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
5
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
6
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
7
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
8
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
9
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
10
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
11
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
12
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
13
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
14
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  
15
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश
16
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
17
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
18
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
19
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
20
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!

मोहाची झाडे ठरताहेत ग्रामीण भागातील जनतेला फलदायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 00:56 IST

फळा-फुलांपासून विविध लाभ

राहुल वाडेकरविक्रमगड : जि ग्रामीण भाग म्हटला की, हिरवागार मखमलींनी नटलेला परिसर. ग्रामीण भागात आंब्याच्या झाडानंतर दुसरा क्रमांक मोहाच्या झाडाचा लागतो. मोठ्या प्रमाणात असलेल्या या मोहाच्या झाडाचा गोरगरीब आदिवासी कुटुंबांना चांगला फायदा होतो. त्याच्या पालापाचोळ्याचा खत म्हणून होणारा उपयोग, त्याच्या फुलांपासून बनवल्या जाणाऱ्या गावठी दारूचा औषध म्हणून वापर, फळांची केली जाणारी भाजी, बियांपासून बनणारे खाद्यतेल असे एक ना अनेक उपयोग असल्याने ही झाडे ग्रामीण भागातील आदिवासींसाठी खऱ्या अर्थाने फलदायी ठरत आहेत. विक्रमगड, जव्हार, मोखाडा अशा आदिवासी दुर्गम भागातील जंगलात मोहाचे फलदायी वृक्ष गोरगरीब आदिवासी कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहेत. बहुतांश शेतकरी, शेतमजूर हे शेतीपूरक व्यवसायावर जास्त अवलंबून असतात. शेतकऱ्याला स्वतःचे ऊन, वारा, पाऊस यापासून रक्षण करण्याकरिता मोहाचे झाड तर असतेच, त्यापासून लाकूड तर मिळतेच, पण पावसाळ्यात या झाडाची नवीन फुटलेली पालवी उन्हाच्या उष्णतेने सुकून जाते. या झाडांचा जमिनीवर पडलेला पालापाचोळा शेतीची राबणी करण्याकरिता वापरला जातो. गोरगरीब शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी रासायनिक खते परवडत नाहीत. महागाईच्या भडक्याचा विचार केला तर बाजारात खाद्यतेलाला प्रतिकिलो १३० ते १५० रुपये भावाप्रमाणे शेतकऱ्यांची वार्षिक २० ते ३० हजार रुपये बचत होत असते. तर फुलांपासून रोजगारही प्राप्त होतो.शेतकरी खरीप हंगामाकरिता शेतीची राबणी करण्यासाठी जंगलातील पालापाचोळा गोळा करून शेतात भाजतात. त्यापासून शेतात पेरलेल्या भाताच्या रोपट्याला उपयुक्त खत मिळते.या झाडाला पिवळ्या रंगाची फुले येतात. उष्णता फुलाला लागली की ती फुले खाली पडतात. ही फुले ग्रामीण भागात सकाळ, दुपारपर्यंतच्या वेळेत वेचून उन्हात सुकवतात. कालांतराने या फुलांना भाव मिळाला तर २० ते ३० रुपये किलोने विकली जातात. मोहाच्या झाडाला काही दिवसानंतर फळे येतात. या भागात या फळांना दोडे (मोहट्या) म्हणतात. त्या सुकवून बारमाही केव्हाही भाजीसाठी वापर केला जातो तर पिकलेल्या दोड्यांमधून पाच ते सहा बिया मिळतात. शिवाय यातील फळांच्या टरफलांपासून शेतात खतही तयार होते. फुलानंतर मोहाच्या झाडाला काही दिवसांनंतर फळे येतात. काही वेळेस कोवळ्या दोड्यापासून स्वादिष्ट भाजीचे साधन म्हणून मोहट्या तयार केल्या जातात. त्या सुकवून बारमाही केव्हाही भाजीसाठी वापर केला जातो. तर पिकलेल्या दोड्यामधून पाच ते सहा बिया मिळतात. मजूर दिवसभर २ ते ३ टोपल्या जमा करतो. त्यानंतर त्या बिया फोडल्या असता, यामधून दोन दले मिळतात. त्यास ग्रामीण भागात लोक डाळंब संबोधतात.