शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

मोहाची झाडे ठरताहेत ग्रामीण भागातील जनतेला फलदायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 00:56 IST

फळा-फुलांपासून विविध लाभ

राहुल वाडेकरविक्रमगड : जि ग्रामीण भाग म्हटला की, हिरवागार मखमलींनी नटलेला परिसर. ग्रामीण भागात आंब्याच्या झाडानंतर दुसरा क्रमांक मोहाच्या झाडाचा लागतो. मोठ्या प्रमाणात असलेल्या या मोहाच्या झाडाचा गोरगरीब आदिवासी कुटुंबांना चांगला फायदा होतो. त्याच्या पालापाचोळ्याचा खत म्हणून होणारा उपयोग, त्याच्या फुलांपासून बनवल्या जाणाऱ्या गावठी दारूचा औषध म्हणून वापर, फळांची केली जाणारी भाजी, बियांपासून बनणारे खाद्यतेल असे एक ना अनेक उपयोग असल्याने ही झाडे ग्रामीण भागातील आदिवासींसाठी खऱ्या अर्थाने फलदायी ठरत आहेत. विक्रमगड, जव्हार, मोखाडा अशा आदिवासी दुर्गम भागातील जंगलात मोहाचे फलदायी वृक्ष गोरगरीब आदिवासी कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहेत. बहुतांश शेतकरी, शेतमजूर हे शेतीपूरक व्यवसायावर जास्त अवलंबून असतात. शेतकऱ्याला स्वतःचे ऊन, वारा, पाऊस यापासून रक्षण करण्याकरिता मोहाचे झाड तर असतेच, त्यापासून लाकूड तर मिळतेच, पण पावसाळ्यात या झाडाची नवीन फुटलेली पालवी उन्हाच्या उष्णतेने सुकून जाते. या झाडांचा जमिनीवर पडलेला पालापाचोळा शेतीची राबणी करण्याकरिता वापरला जातो. गोरगरीब शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी रासायनिक खते परवडत नाहीत. महागाईच्या भडक्याचा विचार केला तर बाजारात खाद्यतेलाला प्रतिकिलो १३० ते १५० रुपये भावाप्रमाणे शेतकऱ्यांची वार्षिक २० ते ३० हजार रुपये बचत होत असते. तर फुलांपासून रोजगारही प्राप्त होतो.शेतकरी खरीप हंगामाकरिता शेतीची राबणी करण्यासाठी जंगलातील पालापाचोळा गोळा करून शेतात भाजतात. त्यापासून शेतात पेरलेल्या भाताच्या रोपट्याला उपयुक्त खत मिळते.या झाडाला पिवळ्या रंगाची फुले येतात. उष्णता फुलाला लागली की ती फुले खाली पडतात. ही फुले ग्रामीण भागात सकाळ, दुपारपर्यंतच्या वेळेत वेचून उन्हात सुकवतात. कालांतराने या फुलांना भाव मिळाला तर २० ते ३० रुपये किलोने विकली जातात. मोहाच्या झाडाला काही दिवसानंतर फळे येतात. या भागात या फळांना दोडे (मोहट्या) म्हणतात. त्या सुकवून बारमाही केव्हाही भाजीसाठी वापर केला जातो तर पिकलेल्या दोड्यांमधून पाच ते सहा बिया मिळतात. शिवाय यातील फळांच्या टरफलांपासून शेतात खतही तयार होते. फुलानंतर मोहाच्या झाडाला काही दिवसांनंतर फळे येतात. काही वेळेस कोवळ्या दोड्यापासून स्वादिष्ट भाजीचे साधन म्हणून मोहट्या तयार केल्या जातात. त्या सुकवून बारमाही केव्हाही भाजीसाठी वापर केला जातो. तर पिकलेल्या दोड्यामधून पाच ते सहा बिया मिळतात. मजूर दिवसभर २ ते ३ टोपल्या जमा करतो. त्यानंतर त्या बिया फोडल्या असता, यामधून दोन दले मिळतात. त्यास ग्रामीण भागात लोक डाळंब संबोधतात.