शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
4
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
5
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
6
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
7
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
8
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
9
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
10
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
11
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
12
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
13
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
14
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
15
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
16
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
17
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
18
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
19
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
20
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
Daily Top 2Weekly Top 5

मोहाची झाडे ठरताहेत ग्रामीण भागातील जनतेला फलदायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 00:56 IST

फळा-फुलांपासून विविध लाभ

राहुल वाडेकरविक्रमगड : जि ग्रामीण भाग म्हटला की, हिरवागार मखमलींनी नटलेला परिसर. ग्रामीण भागात आंब्याच्या झाडानंतर दुसरा क्रमांक मोहाच्या झाडाचा लागतो. मोठ्या प्रमाणात असलेल्या या मोहाच्या झाडाचा गोरगरीब आदिवासी कुटुंबांना चांगला फायदा होतो. त्याच्या पालापाचोळ्याचा खत म्हणून होणारा उपयोग, त्याच्या फुलांपासून बनवल्या जाणाऱ्या गावठी दारूचा औषध म्हणून वापर, फळांची केली जाणारी भाजी, बियांपासून बनणारे खाद्यतेल असे एक ना अनेक उपयोग असल्याने ही झाडे ग्रामीण भागातील आदिवासींसाठी खऱ्या अर्थाने फलदायी ठरत आहेत. विक्रमगड, जव्हार, मोखाडा अशा आदिवासी दुर्गम भागातील जंगलात मोहाचे फलदायी वृक्ष गोरगरीब आदिवासी कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचे साधन बनले आहेत. बहुतांश शेतकरी, शेतमजूर हे शेतीपूरक व्यवसायावर जास्त अवलंबून असतात. शेतकऱ्याला स्वतःचे ऊन, वारा, पाऊस यापासून रक्षण करण्याकरिता मोहाचे झाड तर असतेच, त्यापासून लाकूड तर मिळतेच, पण पावसाळ्यात या झाडाची नवीन फुटलेली पालवी उन्हाच्या उष्णतेने सुकून जाते. या झाडांचा जमिनीवर पडलेला पालापाचोळा शेतीची राबणी करण्याकरिता वापरला जातो. गोरगरीब शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारी रासायनिक खते परवडत नाहीत. महागाईच्या भडक्याचा विचार केला तर बाजारात खाद्यतेलाला प्रतिकिलो १३० ते १५० रुपये भावाप्रमाणे शेतकऱ्यांची वार्षिक २० ते ३० हजार रुपये बचत होत असते. तर फुलांपासून रोजगारही प्राप्त होतो.शेतकरी खरीप हंगामाकरिता शेतीची राबणी करण्यासाठी जंगलातील पालापाचोळा गोळा करून शेतात भाजतात. त्यापासून शेतात पेरलेल्या भाताच्या रोपट्याला उपयुक्त खत मिळते.या झाडाला पिवळ्या रंगाची फुले येतात. उष्णता फुलाला लागली की ती फुले खाली पडतात. ही फुले ग्रामीण भागात सकाळ, दुपारपर्यंतच्या वेळेत वेचून उन्हात सुकवतात. कालांतराने या फुलांना भाव मिळाला तर २० ते ३० रुपये किलोने विकली जातात. मोहाच्या झाडाला काही दिवसानंतर फळे येतात. या भागात या फळांना दोडे (मोहट्या) म्हणतात. त्या सुकवून बारमाही केव्हाही भाजीसाठी वापर केला जातो तर पिकलेल्या दोड्यांमधून पाच ते सहा बिया मिळतात. शिवाय यातील फळांच्या टरफलांपासून शेतात खतही तयार होते. फुलानंतर मोहाच्या झाडाला काही दिवसांनंतर फळे येतात. काही वेळेस कोवळ्या दोड्यापासून स्वादिष्ट भाजीचे साधन म्हणून मोहट्या तयार केल्या जातात. त्या सुकवून बारमाही केव्हाही भाजीसाठी वापर केला जातो. तर पिकलेल्या दोड्यामधून पाच ते सहा बिया मिळतात. मजूर दिवसभर २ ते ३ टोपल्या जमा करतो. त्यानंतर त्या बिया फोडल्या असता, यामधून दोन दले मिळतात. त्यास ग्रामीण भागात लोक डाळंब संबोधतात.