शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

मोदींचा पुढचा विजय संघासाठी घातक - कुमार केतकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 03:04 IST

आगामी लोकसभा निवडणुकीतील मोदींचा विजय हा संघासाठी घातक ठरेल, असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांत संघाची मते बदलली आहेत.

बदलापूर  -आगामी लोकसभा निवडणुकीतील मोदींचा विजय हा संघासाठी घातक ठरेल, असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांत संघाची मते बदलली आहेत. भविष्यात नागपूरच्या रेशीमबागेचे महत्त्व कमी होण्याची भीती निर्माण झाल्यानेच संघाने आपल्या मतांमध्ये बदल केल्याचे मत खा. कुमार केतकर यांनी व्यक्त केले.बदलापूरमधील संवेग फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ कवी राजीव जोशी लिखित ‘कापूस’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त केतकर बदलापुरात आले होते. यावेळी केतकर यांनी राजकीय विषयांवर भाष्य केले. केतकर म्हणाले की, गेल्या काही दिवसांत मुस्लिमांबाबत सरसंघचालकांची बदललेली मते ही मोदींमुळे बदलली असून येत्या निवडणुकीतील मोदींचा विजय हा संघासाठी धोकादायक ठरणारा असेल, अशी भीती संघाला वाटत आहे. मोदींनंतर भाजपाचे काय होईल, मोदींनंतर संघालाही महत्त्व नसले, तर संघाचे काय होईल, अशी भीतीही संघाला वाटत आहे. त्यामुळेच काँग्रेसमधल्या हिंदुत्ववाद्यांना जवळ करण्यासाठी सरसंघचालक अशी वक्तव्ये करून वातावरणनिर्मिती करत आहेत. ही त्यांची धोरणात्मक आणि ढोंगात्मक चाल असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. येत्या निवडणुकीत मोदींना काँग्रेसपेक्षा भाजपामधूनच मोठा विरोध होणार असल्याचे भाकीत त्यांनी वर्तवले. केतकर यांनी मोदींच्या परदेशवारीवरही टीका केली. इतक्या दौऱ्यांनंतर काय साध्य केले, हे सांगण्याची आता वेळ आली आहे. दौºयांमुळे ना देशात परदेशी गुंतवणूक आली ना जागतिक संघटनांचे सदस्यपद मिळाले. त्यामुळे दौरे कशासाठी होते, असा प्रश्न उपस्थित होतो. जवाहरलाल नेहरू, रवींद्रनाथ टागोरांना परदेशात असलेल्या महत्त्वामुळे मोदींची महत्त्वाकांक्षा वाढली. त्यांना नेहरू-टागोरांची जागा मिळवायची आहे, मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर तसे महत्त्व मिळत नसल्यानेच दौरे वाढत असल्याची बोचरी टीका त्यांनी केली. यावेळी ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर, धनंजय गांगल, संदीप काळे, ग्रंथसखाचे श्याम जोशी, श्रीधर पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ