शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

मोदींचा पुढचा विजय संघासाठी घातक - कुमार केतकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 03:04 IST

आगामी लोकसभा निवडणुकीतील मोदींचा विजय हा संघासाठी घातक ठरेल, असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांत संघाची मते बदलली आहेत.

बदलापूर  -आगामी लोकसभा निवडणुकीतील मोदींचा विजय हा संघासाठी घातक ठरेल, असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांत संघाची मते बदलली आहेत. भविष्यात नागपूरच्या रेशीमबागेचे महत्त्व कमी होण्याची भीती निर्माण झाल्यानेच संघाने आपल्या मतांमध्ये बदल केल्याचे मत खा. कुमार केतकर यांनी व्यक्त केले.बदलापूरमधील संवेग फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ कवी राजीव जोशी लिखित ‘कापूस’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त केतकर बदलापुरात आले होते. यावेळी केतकर यांनी राजकीय विषयांवर भाष्य केले. केतकर म्हणाले की, गेल्या काही दिवसांत मुस्लिमांबाबत सरसंघचालकांची बदललेली मते ही मोदींमुळे बदलली असून येत्या निवडणुकीतील मोदींचा विजय हा संघासाठी धोकादायक ठरणारा असेल, अशी भीती संघाला वाटत आहे. मोदींनंतर भाजपाचे काय होईल, मोदींनंतर संघालाही महत्त्व नसले, तर संघाचे काय होईल, अशी भीतीही संघाला वाटत आहे. त्यामुळेच काँग्रेसमधल्या हिंदुत्ववाद्यांना जवळ करण्यासाठी सरसंघचालक अशी वक्तव्ये करून वातावरणनिर्मिती करत आहेत. ही त्यांची धोरणात्मक आणि ढोंगात्मक चाल असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. येत्या निवडणुकीत मोदींना काँग्रेसपेक्षा भाजपामधूनच मोठा विरोध होणार असल्याचे भाकीत त्यांनी वर्तवले. केतकर यांनी मोदींच्या परदेशवारीवरही टीका केली. इतक्या दौऱ्यांनंतर काय साध्य केले, हे सांगण्याची आता वेळ आली आहे. दौºयांमुळे ना देशात परदेशी गुंतवणूक आली ना जागतिक संघटनांचे सदस्यपद मिळाले. त्यामुळे दौरे कशासाठी होते, असा प्रश्न उपस्थित होतो. जवाहरलाल नेहरू, रवींद्रनाथ टागोरांना परदेशात असलेल्या महत्त्वामुळे मोदींची महत्त्वाकांक्षा वाढली. त्यांना नेहरू-टागोरांची जागा मिळवायची आहे, मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर तसे महत्त्व मिळत नसल्यानेच दौरे वाढत असल्याची बोचरी टीका त्यांनी केली. यावेळी ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर, धनंजय गांगल, संदीप काळे, ग्रंथसखाचे श्याम जोशी, श्रीधर पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ