शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

मोदींचा पुढचा विजय संघासाठी घातक - कुमार केतकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2018 03:04 IST

आगामी लोकसभा निवडणुकीतील मोदींचा विजय हा संघासाठी घातक ठरेल, असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांत संघाची मते बदलली आहेत.

बदलापूर  -आगामी लोकसभा निवडणुकीतील मोदींचा विजय हा संघासाठी घातक ठरेल, असे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच गेल्या काही दिवसांत संघाची मते बदलली आहेत. भविष्यात नागपूरच्या रेशीमबागेचे महत्त्व कमी होण्याची भीती निर्माण झाल्यानेच संघाने आपल्या मतांमध्ये बदल केल्याचे मत खा. कुमार केतकर यांनी व्यक्त केले.बदलापूरमधील संवेग फाउंडेशनच्या वतीने ज्येष्ठ कवी राजीव जोशी लिखित ‘कापूस’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त केतकर बदलापुरात आले होते. यावेळी केतकर यांनी राजकीय विषयांवर भाष्य केले. केतकर म्हणाले की, गेल्या काही दिवसांत मुस्लिमांबाबत सरसंघचालकांची बदललेली मते ही मोदींमुळे बदलली असून येत्या निवडणुकीतील मोदींचा विजय हा संघासाठी धोकादायक ठरणारा असेल, अशी भीती संघाला वाटत आहे. मोदींनंतर भाजपाचे काय होईल, मोदींनंतर संघालाही महत्त्व नसले, तर संघाचे काय होईल, अशी भीतीही संघाला वाटत आहे. त्यामुळेच काँग्रेसमधल्या हिंदुत्ववाद्यांना जवळ करण्यासाठी सरसंघचालक अशी वक्तव्ये करून वातावरणनिर्मिती करत आहेत. ही त्यांची धोरणात्मक आणि ढोंगात्मक चाल असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. येत्या निवडणुकीत मोदींना काँग्रेसपेक्षा भाजपामधूनच मोठा विरोध होणार असल्याचे भाकीत त्यांनी वर्तवले. केतकर यांनी मोदींच्या परदेशवारीवरही टीका केली. इतक्या दौऱ्यांनंतर काय साध्य केले, हे सांगण्याची आता वेळ आली आहे. दौºयांमुळे ना देशात परदेशी गुंतवणूक आली ना जागतिक संघटनांचे सदस्यपद मिळाले. त्यामुळे दौरे कशासाठी होते, असा प्रश्न उपस्थित होतो. जवाहरलाल नेहरू, रवींद्रनाथ टागोरांना परदेशात असलेल्या महत्त्वामुळे मोदींची महत्त्वाकांक्षा वाढली. त्यांना नेहरू-टागोरांची जागा मिळवायची आहे, मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवर तसे महत्त्व मिळत नसल्यानेच दौरे वाढत असल्याची बोचरी टीका त्यांनी केली. यावेळी ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर, धनंजय गांगल, संदीप काळे, ग्रंथसखाचे श्याम जोशी, श्रीधर पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ