शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

मोदी जीवावर उदार होऊन पाकला गेले

By admin | Updated: December 28, 2015 02:36 IST

मराठी साहित्य संमेलन आणि त्याच्या व्यासपीठावरील राजकारण्यांचा वावर, हा नेहमीच वादविषय ठरला असताना ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल

मुरलीधर भवार, कल्याणमराठी साहित्य संमेलन आणि त्याच्या व्यासपीठावरील राजकारण्यांचा वावर, हा नेहमीच वादविषय ठरला असताना ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तान भेटीवरून त्यांच्यावर होणाऱ्या टीकेचा समाचार घेत त्यांच्या मदतीला सरसावले. मोदी हे जीवावर उदार होऊन पाकिस्तानला गेले ते पाहा, असा सल्ला त्यांनी टीकाकारांना दिला.मोदी यांनी पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अचानक पाकिस्तानला भेट दिली. ही भेट पूर्वनियोजित होती किंवा कसे, यावरून तसेच ही भेट एका उद्योगपतीच्या विनंतीवरून घेतली गेली किंवा कसे, यावरून उलटसुलट चर्चा सुरू असताना सबनीस यांनी या वादात उडी घेतली आहे.सबनीस म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी भारत-पाक संबंध सुधारावेत, यासाठी पाकिस्तानला दिलेल्या भेटीकडे कलुषित नजरेने पाहणे अयोग्य आहे. मोदी जीवावर उदार होऊन पाकिस्तानला गेले. त्या ठिकाणी त्यांच्या जीवास घातपातही होण्याची शक्यता होती. त्यामुळे मोदींची ही भेट विवेकी राष्ट्रवादीचे लक्षण आहे.कल्याण सार्वजनिक वाचनालयाने आयोजित केलेल्या पु.भा. भावे व्याख्यानमालेनिमित्त अध्यक्ष सबनीस कल्याण वाचनालयात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आधीच्या सरकारमधील सिंचन घोटाळा व विद्यमान सरकारमधील चिक्की घोटाळा हे आर्थिक भ्रष्टतेचे भाग असून, जोपर्यंत हे घोटाळे थांबत नाहीत, तोपर्यंत विस्कटलेला सांस्कृतिक नकाशा नीट होणार नाही, अशा शब्दांत सबनीस यांनी सत्ताधारी व विरोधकांना टोले लगावले. देशात असहिष्णुता निर्माण झालेली आहे, याबद्दल वादच नाही. ती मी मान्य करतो. असहिष्णुता धार्मिक स्वरूपाची आहे. त्यामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्यादेखील निंदनीय आणि निषेधार्ह आहेत. महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण करण्याकरिता काही समाज, गट गोडसे यांचे मंदिर उभारणार असतील तर त्याला माझा विरोध आहे. हा भ्रष्ट वैचारिकतेचा दाखला आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला गोडसे ब्राह्मण होते म्हणून त्या जातीला दोषी व गुन्हेगार ठरविणे, हेदेखील न्यायाला धरून नाही.