शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
3
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
4
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
5
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
6
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
7
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
8
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
9
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
10
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
11
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
12
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
13
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
14
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
15
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
16
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
17
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
18
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
19
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
20
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार

मोदी जीवावर उदार होऊन पाकला गेले

By admin | Updated: December 28, 2015 02:36 IST

मराठी साहित्य संमेलन आणि त्याच्या व्यासपीठावरील राजकारण्यांचा वावर, हा नेहमीच वादविषय ठरला असताना ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल

मुरलीधर भवार, कल्याणमराठी साहित्य संमेलन आणि त्याच्या व्यासपीठावरील राजकारण्यांचा वावर, हा नेहमीच वादविषय ठरला असताना ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाकिस्तान भेटीवरून त्यांच्यावर होणाऱ्या टीकेचा समाचार घेत त्यांच्या मदतीला सरसावले. मोदी हे जीवावर उदार होऊन पाकिस्तानला गेले ते पाहा, असा सल्ला त्यांनी टीकाकारांना दिला.मोदी यांनी पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अचानक पाकिस्तानला भेट दिली. ही भेट पूर्वनियोजित होती किंवा कसे, यावरून तसेच ही भेट एका उद्योगपतीच्या विनंतीवरून घेतली गेली किंवा कसे, यावरून उलटसुलट चर्चा सुरू असताना सबनीस यांनी या वादात उडी घेतली आहे.सबनीस म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांनी भारत-पाक संबंध सुधारावेत, यासाठी पाकिस्तानला दिलेल्या भेटीकडे कलुषित नजरेने पाहणे अयोग्य आहे. मोदी जीवावर उदार होऊन पाकिस्तानला गेले. त्या ठिकाणी त्यांच्या जीवास घातपातही होण्याची शक्यता होती. त्यामुळे मोदींची ही भेट विवेकी राष्ट्रवादीचे लक्षण आहे.कल्याण सार्वजनिक वाचनालयाने आयोजित केलेल्या पु.भा. भावे व्याख्यानमालेनिमित्त अध्यक्ष सबनीस कल्याण वाचनालयात आले होते. या वेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. आधीच्या सरकारमधील सिंचन घोटाळा व विद्यमान सरकारमधील चिक्की घोटाळा हे आर्थिक भ्रष्टतेचे भाग असून, जोपर्यंत हे घोटाळे थांबत नाहीत, तोपर्यंत विस्कटलेला सांस्कृतिक नकाशा नीट होणार नाही, अशा शब्दांत सबनीस यांनी सत्ताधारी व विरोधकांना टोले लगावले. देशात असहिष्णुता निर्माण झालेली आहे, याबद्दल वादच नाही. ती मी मान्य करतो. असहिष्णुता धार्मिक स्वरूपाची आहे. त्यामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे यांच्या हत्यादेखील निंदनीय आणि निषेधार्ह आहेत. महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसे यांचे उदात्तीकरण करण्याकरिता काही समाज, गट गोडसे यांचे मंदिर उभारणार असतील तर त्याला माझा विरोध आहे. हा भ्रष्ट वैचारिकतेचा दाखला आहे. मात्र, दुसऱ्या बाजूला गोडसे ब्राह्मण होते म्हणून त्या जातीला दोषी व गुन्हेगार ठरविणे, हेदेखील न्यायाला धरून नाही.