शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

मोदी सरकार सुरुवातीपासून अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 00:39 IST

भार्इंदर : मोदी सरकारने गेल्या साडेचार वर्षात एकही यशस्वी काम केलेले नाही. ते सरकार स्थापनेच्या पहिल्या दिवसापासूनच अपयशी ठरल्याचा ...

भार्इंदर : मोदी सरकारने गेल्या साडेचार वर्षात एकही यशस्वी काम केलेले नाही. ते सरकार स्थापनेच्या पहिल्या दिवसापासूनच अपयशी ठरल्याचा दावा अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव बी. एम. संदीपकुमार यांनी केला आहे. ते भार्इंदर येथे आले असता त्यांनी शुक्रवारी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी महाराष्ट प्रदेश काँग्रेसचे महासचिव राजेश शर्मा, सहप्रभारी मेहुल व्होरा, माजी आमदार मुझफ्फर हुसेन उपस्थित होते. मोदी सरकारवर घणाघाती हल्ला चढवत संदीपकुमार यांनी मोदींनी केवळ ‘मन की बात’ मध्येच नागरिकांना गुरफटून ठेवल्याचा आरोप करत त्यांनी अद्याप एकही ‘काम की बात’ केली नसल्याचा टोला लगावला. आता या सरकारचे काही महिनेच उरले असताना आतातरी त्यांनी ‘काम की बात’ करावी, जेणेकरून त्याचा फायदा देशासह नागरिकांना होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. मोदींनी ‘मन की बात’ चे व्रत सोडून पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या मुलाच्या कंपनीची उलाढाल चार वर्षांतच कशी काय वाढली, मर्जीतल्या बड्या उद्योगपतींसाठी कमाल जमीन धारणा कायदा का रद्द केला, महागाई कशी वाढली यावर भाष्य करण्याचे आव्हान त्यांनी दिले.

काँग्रेसला येत्या निवडणुकीत जोमाने उतरायचे असल्याने पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षबांधणीची जनसंपर्क मोहीम सुरू करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या मोहिमेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचा दावा त्यांनी केला. या मोहिमेद्वारे केंद्रातील मोदीप्रणित सरकारसह भाजपायुक्त राज्य सरकारच्या अपयशाची माहिती नागरिकांपर्यंत पोहचवली जाणार आहे. पक्षबांधणीसाठी केंद्रस्तरावर काम केले जाणार असून प्रत्येक केंद्रासाठी १० कार्यकर्त्यांची नियुक्ती करून त्यातील प्रत्येकावर २५ घरांच्या संपर्काची जबाबदारी सोपविली जाणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसMira Bhayanderमीरा-भाईंदर