शहरं
Join us  
Trending Stories
1
"मतदार याद्यांमधले घोळ आम्हीही दाखवले, पण..."; महापालिका निवडणुकांच्या घोषणेवर CMचे विधान
2
Municipal Election 2026 Dates: 'महा'संग्रामाचा शंखनाद! BMCसह राज्यातील २९ महापालिकांसाठी १५ जानेवारीला मतदान, १६ जानेवारीला निकाल
3
"विविहित महिलांनी घरात...", विजयाच्या नशेत केरळच्या सीपीएम नेत्याचं वादग्रस्त विधान; उडाला गोंधळ
4
"हा प्रकार केवळ बेजबाबदारपणा नसून..."; उद्धवसेनेचं राज्य निवडणूक आयुक्तांना खरमरीत पत्र
5
पंतप्रधान मोदींमुळेच CBSE च्या पुस्तकात छत्रपतींचा २१ पानांचा जाज्वल्य इतिहास - देवेंद्र फडणवीस
6
सलग दुसऱ्या आठवड्याची सुरुवात घसरणीने! 'या' ३ कारणांमुळे बाजारात चांगली रिकव्हरी
7
IPL 2026 Mock Auction : CSK ची थट्टा? KKR नं ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लावली ३०.५० कोटींची विक्रमी बोली!
8
भारतीय ऑटो बाजारातील सर्वात मोठी बातमी! फोक्सवॅगनची हजारो कर्मचाऱ्यांना व्हीआरएसची ऑफर, फोर्डच्याच वाटेवर?
9
पुतिन मायदेशी परतताच भारताने तयार केली ३०० वस्तूंची यादी, काय आहे केंद्र सरकारचा प्लॅन
10
१६ डिसेंबर पासून सुरु होत आहे धनुर्मास; आहार, आरोग्य, लक्ष्मी उपासनेसाठी महत्त्वाचा महिना!
11
Shaheen Afridi: शाहीन आफ्रिदीचा अपमान; बिग बॅश लीगमध्ये गोलंदाजी करण्यापासून रोखलं! नेमकं प्रकरण काय?
12
भारताच्या निर्यातीला मोठा 'बूस्ट'! नोव्हेंबरमध्ये १९.३७% ची वाढ; व्यापार तुटीतही मोठा दिलासा
13
MNS: मनपा निवडणुकीच्या घोषणेपूर्वी मोठा राडा! आयोगाच्या कार्यालयात मनसेची तोडफोड, काय घडलं?
14
याला म्हणतात ढासू स्टॉक...! पॉवर कंपनीचा शेअर बनला रॉकेट, 30% नं वधारला; दिलाय 6500% चा बंपर परतावा, करतोय मालामाल
15
"मुलाचे कान धरू शकतो, सूनेचे धरू शकत नाही; मी उद्धव ठाकरेंना कॉल करून..."; विनोद घोसाळकरांच्या डोळ्यात पाणी
16
'मनरेगा' बंद! मोदी सरकार आणणार 'विकसित भारत-जी राम जी' योजना; राज्यांवर पडणार अतिरिक्त भार
17
"मी पोहून आलो, सकाळी घरी..."; बॉन्डी बीचवर हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्याचा आईला कॉल
18
लेडी सेहवागची कमाल! वर्ल्ड कपमध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री; एका मॅचमधील धमाक्यासह जिंकला ICC पुरस्कार
19
ना स्वतःचे विमानतळ, ना चलन, ना भाषा..; तरीदेखील 'हा' आहे युरोपमधील सर्वात श्रीमंत देश
20
Astrology: नवीन वर्षात नवीन वास्तूमध्ये प्रवेश करण्यासाठी २०२६ मधील तारखा आणि शुभ मुहूर्त 
Daily Top 2Weekly Top 5

मोदींकडे विकासाचे मुद्देच नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2019 00:03 IST

ठाणे लोकसभेचे राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारासाठी रविवारी वाशीत राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस व इतर घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.

नवी मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देशाच्या विकासाचे मुद्दे नसल्याने हिंदुत्वाचा आधार घेतला जात असल्याची टीका माजी मंत्री गणेश नाईक यांनी केली आहे. त्यावरून वर्धा येथील मोदींचे हिंदुत्वावरील भाषण म्हणजे सत्यनारायणाच्या पूजेला चिकणचा प्रसाद ठेवल्यासारखे होते, असेही ते म्हणाले. तर छगन भुजबळ यांच्यावर सरकारने केलेल्या अन्यायाबाबत असंतोष व्यक्त करत, ‘हिम्मत असेल तर माझी चौकशी लावा’ असेही आव्हान मुख्यमंत्र्यांना केले.

ठाणे लोकसभेचे राष्टÑवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचारासाठी रविवारी वाशीत राष्टÑवादी काँग्रेस, काँग्रेस व इतर घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना माजी मंत्री गणेश नाईक यांनी सेना-भाजपवर सडकून टीका केली. मागील लोकसभेपूर्वी केलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्यात मोदी सरकार अपयशी ठरले आहे. शिवाय मोदींकडे प्रगतीचे मुद्देही नसल्याने हिंदुत्वाचा आधार घेऊन अपयश लपवण्याचा प्रयत्न होत असल्याचीही टीका त्यांनी केली. मोदी हे देशाचे नेतृत्व करत आहेत की केवळ गुजरातचे, याबाबतही शंका उपस्थित केली.

चार वर्षांत शिवसेना व भाजपचा वाद म्हणजे अफजल खान शिवाजी महाराजांच्या पाठीत खंजीर खुपसत असल्याचे चित्र तयार केले जात होते. मात्र, तेच प्रतिशिवाजी महाराज व अफजल खान आता एकमेकांना मिठ्या मारत आहेत. त्यामुळे यांचा धर्म खरा की खोटा, याबाबत शंका असल्याचीही टीका त्यांनी केली. तर सरकारच्या स्मार्ट सिटीच्या संकल्पनेला पहिल्यांदा आपण विरोध केल्यानंतर राज ठाकरे यांनीही विरोध दर्शवला. मात्र, शिवसेनेच्या प्रतिशिवाजीला तीन दिवसांनी जाग आल्याचाही टोला त्यांनी मारला.

सध्या नेहरू आणि गांधी घराण्याला बदनाम करण्याचे काम भाजप सरकार करत आहे, त्याकरिता वड्रांसारखी प्रकरणे बाहेर काढून जनतेमध्ये संभ्रम पसरवला जात असल्याचाही आरोप केला. राष्टÑवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्यावर गुन्हा दाखल झाला तेव्हा ते परदेशात असतानाही चौकशीला सामोरे जायला परत आले. या वेळी सरकारने त्यांच्याकडे माणुसकीच्या दृष्टीने न पाहता सूडबुद्धीने त्रास देण्याचे काम केले; परंतु मुख्यमंत्र्यांमध्ये हिम्मत असेल तर माझी चौकशी लावून दाखवा, असे आव्हानही नाईक यांनी केले. या वेळी कार्यक्रमास लोकसभेचे उमेदवार आनंद परांजपे, काँग्रेसचे निरीक्षक तारीख फारुखी, महापौर जयवंत सुतार, आमदार संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक, जिल्हाध्यक्ष अनंत सुतार, माधुरी सुतार, अनिल कौशिक, नीला लिमये आदी उपस्थित होते.सोमय्यांची अवस्था डेंगळेंसारखी : ब्रिटिशांविरोधात पेशव्यांनी पुकारलेल्या युद्धात त्रिंबक डेंगळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांनी ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडले होते. कालांतराने पेशव्यांसाठीच त्यांना ब्रिटिशांना शरण जावे लागले. सध्या अशीच अवस्था किरीट सोमय्या यांची झाली असल्याची टीका गणेश नाईक यांनी केली. सोमय्या यांनीही सरकारच्या सांगण्यावर अनेकांची प्रकरणे बाहेर काढली. मात्र, ऐन वेळी सोमय्या यांनाच सरकारला शरण जावे लागले. यावरून नाईक यांनी किरीट सोमय्या यांची तुलना डेंगळे यांच्या परिस्थितीशी केली.रघुराम राजन देशाचे भावी अर्थमंत्री : गरिबांना प्रति वर्षी ७२ हजार रुपये देण्याची घोषणा काँग्रेसने त्यांच्या घोषणापत्रात केली आहे. या संकल्पनेमागे आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन हे असल्याचा गौप्यस्फोट माजी मंत्री गणेश नाईक यांनी केला. त्यामुळे राहुल गांधी पंतप्रधान झाल्यावर राजन हे देशाचे अर्थमंत्री होण्याचीही शक्यता नाकारता येत नसल्याचेही ते म्हणाले. तर यंदा मोदींचा पराभव निश्चित असून, यानंतर त्यांना इतर मोदींप्रमाणे नेपाळ मार्गे विदेशात पळ काढावा लागेल असा टोलाही गणेश नाईकयांनी मारला.‘राफेल’सारखाच ‘जेट’ घोटाळासरकारने तोट्यात असलेली खासगी जेट कंपनी ८५ हजार कोटींना विकत घेतली. राफेल सारखाच सरकारचा हा दुसरा घोटाळा ठरणार आहे. हा घोटाळा बाहेर काढण्याचे काम आपण करणार असल्याचेही गणेश नाईक यांनी आपल्या भाषणात सांगितले.

टॅग्स :thane-pcठाणे