शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
2
दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
3
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
4
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
5
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
6
मी सर्वांसमोर का तिला चुकीच्या पद्धतीने किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
7
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
8
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
9
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
10
'राहुल गांधींचं काम केलं, तुमचं नाही केलं तर लोक म्हणतील...'; नितीन गडकरींनी प्रियंका गांधींना खाऊ घातली स्पेशल डिश
11
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
12
आज होणार धमाका! महिलेच्या शरीरावर कांदबरीतील ओळीचं लिखाण, १८ वर्षीय मुलीचा इतका 'रेट' लावला
13
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
14
संपादकीय : सरकारच्या प्रतिमेचे काय? डागाळलेली प्रतिमा अन् सत्तेची अपरिहार्यता
15
विखुरलेले विरोधक : भाजपचा कॅल्क्युलेटर ऑन! भावनिक लाट ओसरली, आता गणिताची लढाई!
16
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
17
"छापा नाही, केवळ रुटीन व्हेरिफिकेशन...", शिल्पा शेट्टीच्या वकिलांनी छापेमारीचं वृत्त फेटाळलं
18
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
19
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
20
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
Daily Top 2Weekly Top 5

मनसेच्या महामोर्चात आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबे सहभागी होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2019 02:04 IST

राज्यातील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मनसेच्यावतीने १७ मार्च रोजी दुपारी ठाणे महापालिकेवर महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात पाच हजारावर शेतकरी सहभागी होणार आहेत.

ठाणे : राज्यातील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मनसेच्यावतीने १७ मार्च रोजी दुपारी ठाणे महापालिकेवर महामोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात पाच हजारावर शेतकरी सहभागी होणार आहेत.आत्महत्त्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना त्यांच्या शेतातील भाजीपाला, फळे विकण्यासाठी १०० स्टॉल द्यावेत, आंब्याचा स्टॉल लावलेल्या शेतकºयाकडे २० हजारांची मागणाºया नगरसेविकेवर खंडणीचा गुन्हा दाखल करावा, संबंधित शेतकºयास पालिकेने नुकसानभरपाई द्यावी या व इतर मागण्या करण्यात येणार असल्याची माहिती मोर्चाचे आयोजक मनसेचे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.आंब्याचा स्टॉल हटविण्याच्या मुद्द्यावरून गुरुवारी रात्री मनसे-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ मध्ये हाणामारी झाली होती. यामुळे भाजप शेतकºयांच्या विरोधात असल्याचा आरोप करून आम्ही शेतकºयांच्या पाठिशी उभे आहोत यासाठी हा मोर्चा असल्याचे जाधव म्हणाले.यात महाराष्ट्रातील पाच हजार शेतकरी सहभागी होणार असून त्यात आत्महत्त्याग्रस्त शेतकºयांची सात ते आठ कुटुंबे असणार आहेत. मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, अविनाश अभ्यंकर, शिरीष सावंत यांच्यासह महाराष्ट्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. शिवाय अनेक पक्षांनी पाठिंबा दिला असल्याचे त्यांनी सांगितले.शेतकºयांचा आदल्या दिवशी ठाण्यात मुक्काममोर्चात सहभागी होता यावे करिता आदल्या दिवशी शेतकरी ठाण्यात राहायला येणार असून त्यांची निवासी व्यवस्था पक्षाच्या वतीने केली जाणार आहे. मॅटर्निटी होमची जागा संबंधित नगरसेविका हडपत होती तो प्रस्ताव आम्ही रद्द करायला लावला, याचे दु:ख म्हणून त्या नगरसेविकेने हा स्टॉल हटविला, असा आरोपही जाधव यांनी केला.पाणीटंचाईविरोधात आंदोलन१८ मेपासून पाणीटंचाई या विषयावर काम केले जाणार असून एक दिवस टँकर बंद आंदोलन पक्षाच्या वतीने केले जाणार आहे. टँकरमाफियांना अभय देण्यासाठी पाणी सोडले जात नाही, असा आरोप करून एक दिवस पाणी सोडले नाही, तर ठाणेकरांना पाणी मिळणार नाही का? असा प्रश्न जाधव यांनी केला.जिल्हाधिकाºयांनावेळ आहे कुठे ?जिल्हाधिकाºयांना मोर्चाची दखल घेण्यासाठी वेळ नाही. मागच्या आंदोलनाचा अनुभव पाहता त्यांना दिलेल्या निवेदनाची चचार्ही करायला त्यांनी बोलवले नाही असेही जाधव म्हणाले.

टॅग्स :MNSमनसेthaneठाणे