शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

परप्रांतीय कामगारांना मनसैनिकांचा चोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 04:26 IST

अंबरनाथमधील एएसबी कंपनीत तीन मराठी कामगारांना नोकरीवरून काढल्याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी कंपनीत काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांना मंगळवारी चोप दिला.

अंबरनाथ  - अंबरनाथमधील एएसबी कंपनीत तीन मराठी कामगारांना नोकरीवरून काढल्याप्रकरणी मनसेच्या कार्यकर्त्यांनी कंपनीत काम करणाऱ्या परप्रांतीय कामगारांना मंगळवारी चोप दिला. मनसेचा लढा हा कंपनी व्यवस्थापन आणि अधिकाºयांच्या विरोधात असताना निष्पाप कामगारांना मारहाण केल्याने रोष व्यक्त होत आहे.एएसबी कंपनीत गेल्या आठवड्यात तीन मराठी कामगारांना कामावरून काढण्यात आले होते. जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या कार्यकर्त्यांनी गेल्या आठवड्यात कंपनीत जाऊन याबाबत चर्चादेखील केली होती. या चर्चेनंतर कंपनी व्यवस्थापनाला तीन दिवसांची मुदत देण्यात आली होती. मंगळवारी पोलीस ठाण्यातही यासंदर्भात चर्चा झाली. मात्र कंपनी व्यवस्थापन वेळकाढूपणा करत असल्याचा आरोप करून कंपनीला धडा शिकवण्याचा इशारा मनसे नेत्यांनी दिला. त्यानंतर कंपनीचा राग मनसेने तेथील परप्रांतीय कामगारांवर काढला. मनसेच्या या गुंडशाहीवर कामगारांनी नाराजी व्यक्त केली. यासंदर्भात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया उशिरापर्यंत सुरु होती.

टॅग्स :MNSमनसेnewsबातम्या