शहरं
Join us  
Trending Stories
1
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
2
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
3
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
4
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
5
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
6
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
7
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
8
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
9
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
10
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
11
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
12
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
13
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
14
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
15
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
16
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
17
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
18
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
19
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
20
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर

मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 14:50 IST

मुंब्रा स्टेशनवरील लोकल रेल्वे अपघतात मनसे कार्यकर्त्यांना दुखापत झाल्याची माहित अविनाश जाधव यांनी दिली

Mumbai Local Train Accident: मुंबई मध्य रेल्वेच्या मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ दोन फास्ट लोकल ट्रेनमधून पडून भीषण अपघाताची घटना घडली. सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन्ही लोकलमधील फुटबोर्डवरुन प्रवास करणारे प्रवासी एकमेकांना धडकले आणि रेल्वे ट्रॅकवर पडले, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. या दुर्घटनेत चार प्रवाशांचा मृत्यू झाला असून सात ते आठ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर विविध ठाण्यातील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे मुंब्रा स्थानकातील धोकादायक वळणाबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करणारा मनसे कार्यकर्ताही या अपघातात जखमी झाला आहे. त्यामुळेच, या घटनेला रेल्वे प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला. 

सोमवारी सकाळी दिवा-मुंब्रा स्थानकादरम्यान फास्ट लोकलमधून आठ प्रवासी खाली पडले. त्यातील चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृत्यू झालेले प्रवासी हे कसारा आणि सीएसएमटीकडे जाणाऱ्या दोन्ही लोकलमधील होते. ट्रेनमध्ये फुटबोर्डवर लटकून प्रवास करत असलेल्या प्रवाशांच्या बॅग खाली पडल्यानंतर बाजूने जाणाऱ्या ट्रेनमधील प्रवाशांची त्यांना धडक बसली आणि ते खाली पडल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र प्रवासी दरवाज्यात लटकल्याची अफवा असल्याचे मनसे पदाधिकाऱ्याने म्हटलं. कुणाल नावाच्या मनसे पदाधिकाऱ्याने मुंब्रा स्थानकावर असलेल्या धोकादायक सिग्नल आणि वळणाबाबत रेल्वे प्रशासनाला कळवले होते. कुणाल यांच्यासोबत त्यांच्या दोन मित्रांनीही यासाठी पत्रव्यवहार करत या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी पाठपुरावा केला होता. मात्र ते दोघेही या अपघातात जखमी झाले आहेत.

"कळवा रुग्णालयात जेव्हा प्रवाशांना आणलं तेव्हा मी सुरुवातीपासून इथे होतो. त्यांना प्रचंड मार लागला होता. अशा घटना वारंवार घडत आहेत. रोज एक ते दोन प्रवाशांचा रेल्वेतून पडून मृत्यू होतो. त्याबाबतीत आम्ही सतत प्रशासनासोबत बोलत आहोत. प्रशासनासोबत पत्र व्यवहार करत आहोत. आजच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर कुणाल नावाच्या महाराष्ट्र सैनिकाने तीन महिन्यांपूर्वी रेल्वेची पत्रव्यवहार केला होता. त्याच्यासोबतच्या महाराष्ट्र सैनिकांनी तीन महिन्यांपूर्वी रेल्वे ट्रॅकवरील सिग्नल आणि  वळणावर मोठी घटना होऊ शकते यासंदर्भात पत्र दिले होतं. याबाबतीत काम करायला हवं असं या पत्रात म्हटलं होतं. या कामासाठी जी दोन-तीन मुलं पाठपुरावा करत होती त्यातील एकाचे या दुर्घटनेत पाय गेले आहेत. जो मुलगा हे सगळं घडू शकतं असं सांगत होता त्याचेच या अपघातात पाय गेले आहेत," असं अविनाश जाधव यांनी म्हटलं.

दरम्यान या रेल्वे अपघातात राहुल संतोष गुप्ता (वय २८, रा. दिवा), केतन दिलीप सरोज (वय २३, रा. तानाजी नगर, उल्हासनगर), मयूर शाह (वय ५० ), विकी बाबासाहेब मुख्यदल (वय ३४, रेल्वे पोलीस कर्मचारी) यांचा मृत्यू झाला आहे.

टॅग्स :Train Accidentरेल्वे अपघातmumbraमुंब्राMumbai Localमुंबई लोकलthaneठाणेMNSमनसे