शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

राजभाषा मराठीचा अवमान केल्यास कार्यक्रम उधळून लावण्याचा मनसेचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 18:43 IST

मीरारोड : मीरा भाईंदर महापालिकेत भाजपा सत्तेवर आल्यापासून राजभाषा मराठीची गळचेपी होत असून प्रशासन देखील मराठीला दैनंदिन व्यवहार व जाहीर  कार्यक्रमात डावलत असल्याचा आरोप करत मराठीचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी मनसेने केली आहे . पालिका आयुक्तांना निवेदन देतानाच  यापुढे पालिकेकडून राजभाषेचा अवमान झाल्यास तो राजद्रोह समजून तुमचे कार्यक्रम उधळून लावू असा इशारा देखील मनसेने दिला ...

मीरारोड : मीरा भाईंदर महापालिकेत भाजपा सत्तेवर आल्यापासून राजभाषा मराठीची गळचेपी होत असून प्रशासन देखील मराठीला दैनंदिन व्यवहार व जाहीर  कार्यक्रमात डावलत असल्याचा आरोप करत मराठीचा अवमान करणाऱ्या अधिकाऱ्यांना निलंबित करा अशी मागणी मनसेने केली आहे . पालिका आयुक्तांना निवेदन देतानाच  यापुढे पालिकेकडून राजभाषेचा अवमान झाल्यास तो राजद्रोह समजून तुमचे कार्यक्रम उधळून लावू असा इशारा देखील मनसेने दिला आहे . 

महापालिकेत महापौर यांच्या सह अनेक नगरसेवकांना मराठी येत नसल्याचा मुद्दा मराठी एकीकरण समितीने उपस्थित करत आंदोलन केले होते . पालिकेचा कारभार मराठीतून चालत नसल्या बद्दल तक्रारी करत समितीने थेट भाजपा प्रदेश नेत्यांना देखील निवेदन देत मराठी महापौर द्या अशी मागणी चालवली होती . 

वास्तविक मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा असून शासनाने देखील मराठीचा वापर कामकाजात करण्या बद्दल वेळोवेळी आदेश दिलेले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये देखील मराठी भाषेचा वापर करणे बंधनकारक आहे. तसे असताना महासभेत तसेच अन्य समित्यांच्या बैठकीत सर्रास महापौरांपासून अनेक नगरसेवक मराठी ऐवजी अन्य भाषेचा वापर करतात . काही नगरसेवक तर मराठी येत असताना देखील अन्य भाषेत बोलतात . 

पालिका प्रशासन देखील आपल्या दैनंदिन कामकाजात मराठी भाषेला डावलत आहे.  आरोग्यविभागाकडून छापण्यात आलेली पत्रके असो किंवा पालिका क्रीडा संकुलात लावण्यात आलेले फलक व जाहिरात पत्रके असो. ती देखील मराठी ऐवजी इंग्रजी, हिंदी भाषेत आहेत. नागरिकांना माहिती देण्यासाठी पालिकेच्या कर विभाग, पाणी पुरवठा विभाग आदींची वाहने शहरात आवाहन करताना व माहिती देताना फिरतात. पण पालिकेचे जाहीर आवाहन देखील गुजराती, हिंदी भाषेत केले जाते .

नुकत्याच झालेल्या महिला बालकल्याण समितीच्या जागतिक महिला दिन कार्यक्रमात देखील चक्क हिंदी भाषेत स्वागताचे प्रवेशद्वार  लावले होते. व्यासपीठावर देखील महिला दिन हे इंग्रजी भाषेत लिहले होते. कार्यक्रमात तर पूर्णपणे मराठीचा वापरच केला जात नाही. आमदार, नगरसेवक देखील हिंदीचा सर्रास वापर करतात . 

राजभाषा  मराठीची सातत्याने गळचेपी महापालिकेत केली जात असून या मागे केवळ मराठी बद्दलचा द्वेष व राजकीय स्वार्थ असल्याचा आरोप  मनसे शहर अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांनी केलाय . राजभाषा मराठीचा अवमान म्हणजे राजद्रोह असून मराठीचा अवमान करणारे तसेच शासन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या पालिका अधिकारी - कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करा अशी मागणी करण्यात आली . 

मनसे  शिष्ट मंडळाने आयुक्त  बी. जी पवार यांना भेटून निवेदन दिले.  आयुक्तांनी चौकशी करून जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई करू असे आश्वासन दिले आहे .  या वेळी  नरेंद्र पाटोळे , हेमंत सावंत , शशी मेंडन ,  सचिन पोफळे , प्रमोद देठे , रॉबर्ट डिसोझा आदी उपस्थित होते . राजभाषा मराठीचा पालिकेच्या सर्व कामकाज, कार्यक्रम आदीं मध्ये शंभर टक्के वापर झाला पाहिजे . पण पालिके कडूनच राजभाषेचा अवमान होण्याचे प्रकार गंभीर आहेत. या पुढे पालिकेकडून मराठीचा अवमानका  वा मुद्दाम गळचेपी केल्यास पालिकेचे कार्यक्रम उधळून लावू असा असा इशारा देखील मनसेने दिला आहे. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर