शहरं
Join us  
Trending Stories
1
उबाठा म्हणजे युज ॲण्ड थ्रो पार्टी, त्यांचा जीव मुंबई महानगरपालिकेच्या तिजोरीत; एकनाथ शिंदे यांची टीका
2
Pahalgam Terror Attack: कलमा पढायला सांगितलं, पँट काढली अन्...! पहलगाममध्ये दहशतवाद्यांचा उन्माद; धर्म विचारून २७ जणांची हत्या
3
हा देशाच्या एकता व अखंडतेवर हल्ला, पहलगाम हल्ल्याचा संघाकडून निषेध
4
हॉस्टेलच्या रूममध्येच 'ती'ने संपविले जीवन; सोलापुरातील धक्कादायक घटना
5
KL राहुलचं एकमद कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
लग्नानंतर सातव्या दिवशीच नौदलाच्या अधिकाऱ्याची दहशतवाद्यांकडून हत्या; हनिमूनसाठी गेले होते विनय नरवाल
7
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; TRF च्या टेरर मॉड्यूलने चिंता वाढली
8
चोरीच्या आरोपातून दोन तरूणांना बैलबंडीला जुंपले; व्हीडिओ व्हायरल, १० जणांवर गुन्हा दाखल
9
IPL 2025 LSG vs DC : लखनौच्या संघासमोर केएल राहुलचा रुबाब; सिक्सर मारत संपवली मॅच
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

समोरच्याला युती व्हावी यापेक्षा भीती जास्त वाटते, आमदार राजू पाटील यांचा उध्दव ठाकरेंना टोला

By प्रशांत माने | Updated: July 6, 2023 20:02 IST

'तेव्हा आमचे नगरसेवक फोडले, आता तुम्ही अडचणीत आला म्हणून युती करायची का?'

डोंबिवली: मराठी माणसाची इच्छा असली तरी समोरच्याची इच्छा असली पाहिजे. समोरच्याला युती व्हावी यापेक्षा भीती जास्त वाटते, असा टोला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी नाव न घेता उध्दव ठाकरेंना लगावला. आम्ही आतापर्यंत कोणाशीही युती केली नाही, यापुढे करू नये असे माझे वैयक्तीक मत असल्याकडेही पाटील यांनी यावेळी लक्ष वेधले.

गुरूवारी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी एकमेकांची भेट घेतली. यावर मनसे आणि ठाकरे गटात युतीची चर्चा रंगत आहे. याबाबत आमदार पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी युतीबाबत भाष्य करताना उध्दव ठाकरेंना लक्ष केले. युतीबाबत बोलताना पाटील म्हणाले माझी अजिबात इच्छा नाही. ते अडचणीत असल्यावर आम्ही युती करावी? आमचे राज ठाकरे अडचणीत असताना तुम्ही आमचे नगरसेवक फोडले, आता तुमच्यावर वेळ आली म्हणून आम्ही युती करायची का? असा सवाल ही पाटील यांनी केला.

आजच्या राजकीय परिस्थितीला उध्दव ठाकरे जबाबदारशिंदे गटाचे आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात, या चर्चेवरदेखील पाटील यांनी भाष्य केले. या त्यांच्या पक्षांतर्गत बाबी आहेत, त्याबद्दल आम्हाला माहीती नाही. मात्र या गोष्टीची सुरूवात उध्दव ठाकरे यांच्यापासून झाली. लोकांनी दिलेला कौल मान्य करून, लोकांच्या मताला मान देऊन, हिश्शासाठी भांडत बसले नसते आणि सरकार बनवले असते तर या गोष्टीच उदभवल्या नसत्या. त्यामुळे एकटया फडणवीसांना दोष देऊन फायदा नाही. लोकांनी जो कौल दिला होता त्या विरोधात सगळं घडलं. त्याचे भोग त्यांच्यासोबत जनताही भोगत आहे, असे पाटील म्हणाले.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaju Patilराजू पाटीलMNSमनसेShiv Senaशिवसेना