शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

समोरच्याला युती व्हावी यापेक्षा भीती जास्त वाटते, आमदार राजू पाटील यांचा उध्दव ठाकरेंना टोला

By प्रशांत माने | Updated: July 6, 2023 20:02 IST

'तेव्हा आमचे नगरसेवक फोडले, आता तुम्ही अडचणीत आला म्हणून युती करायची का?'

डोंबिवली: मराठी माणसाची इच्छा असली तरी समोरच्याची इच्छा असली पाहिजे. समोरच्याला युती व्हावी यापेक्षा भीती जास्त वाटते, असा टोला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी नाव न घेता उध्दव ठाकरेंना लगावला. आम्ही आतापर्यंत कोणाशीही युती केली नाही, यापुढे करू नये असे माझे वैयक्तीक मत असल्याकडेही पाटील यांनी यावेळी लक्ष वेधले.

गुरूवारी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी एकमेकांची भेट घेतली. यावर मनसे आणि ठाकरे गटात युतीची चर्चा रंगत आहे. याबाबत आमदार पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी युतीबाबत भाष्य करताना उध्दव ठाकरेंना लक्ष केले. युतीबाबत बोलताना पाटील म्हणाले माझी अजिबात इच्छा नाही. ते अडचणीत असल्यावर आम्ही युती करावी? आमचे राज ठाकरे अडचणीत असताना तुम्ही आमचे नगरसेवक फोडले, आता तुमच्यावर वेळ आली म्हणून आम्ही युती करायची का? असा सवाल ही पाटील यांनी केला.

आजच्या राजकीय परिस्थितीला उध्दव ठाकरे जबाबदारशिंदे गटाचे आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात, या चर्चेवरदेखील पाटील यांनी भाष्य केले. या त्यांच्या पक्षांतर्गत बाबी आहेत, त्याबद्दल आम्हाला माहीती नाही. मात्र या गोष्टीची सुरूवात उध्दव ठाकरे यांच्यापासून झाली. लोकांनी दिलेला कौल मान्य करून, लोकांच्या मताला मान देऊन, हिश्शासाठी भांडत बसले नसते आणि सरकार बनवले असते तर या गोष्टीच उदभवल्या नसत्या. त्यामुळे एकटया फडणवीसांना दोष देऊन फायदा नाही. लोकांनी जो कौल दिला होता त्या विरोधात सगळं घडलं. त्याचे भोग त्यांच्यासोबत जनताही भोगत आहे, असे पाटील म्हणाले.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaju Patilराजू पाटीलMNSमनसेShiv Senaशिवसेना