शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

समोरच्याला युती व्हावी यापेक्षा भीती जास्त वाटते, आमदार राजू पाटील यांचा उध्दव ठाकरेंना टोला

By प्रशांत माने | Updated: July 6, 2023 20:02 IST

'तेव्हा आमचे नगरसेवक फोडले, आता तुम्ही अडचणीत आला म्हणून युती करायची का?'

डोंबिवली: मराठी माणसाची इच्छा असली तरी समोरच्याची इच्छा असली पाहिजे. समोरच्याला युती व्हावी यापेक्षा भीती जास्त वाटते, असा टोला मनसेचे आमदार राजू पाटील यांनी नाव न घेता उध्दव ठाकरेंना लगावला. आम्ही आतापर्यंत कोणाशीही युती केली नाही, यापुढे करू नये असे माझे वैयक्तीक मत असल्याकडेही पाटील यांनी यावेळी लक्ष वेधले.

गुरूवारी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी एकमेकांची भेट घेतली. यावर मनसे आणि ठाकरे गटात युतीची चर्चा रंगत आहे. याबाबत आमदार पाटील यांना विचारणा केली असता त्यांनी युतीबाबत भाष्य करताना उध्दव ठाकरेंना लक्ष केले. युतीबाबत बोलताना पाटील म्हणाले माझी अजिबात इच्छा नाही. ते अडचणीत असल्यावर आम्ही युती करावी? आमचे राज ठाकरे अडचणीत असताना तुम्ही आमचे नगरसेवक फोडले, आता तुमच्यावर वेळ आली म्हणून आम्ही युती करायची का? असा सवाल ही पाटील यांनी केला.

आजच्या राजकीय परिस्थितीला उध्दव ठाकरे जबाबदारशिंदे गटाचे आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात, या चर्चेवरदेखील पाटील यांनी भाष्य केले. या त्यांच्या पक्षांतर्गत बाबी आहेत, त्याबद्दल आम्हाला माहीती नाही. मात्र या गोष्टीची सुरूवात उध्दव ठाकरे यांच्यापासून झाली. लोकांनी दिलेला कौल मान्य करून, लोकांच्या मताला मान देऊन, हिश्शासाठी भांडत बसले नसते आणि सरकार बनवले असते तर या गोष्टीच उदभवल्या नसत्या. त्यामुळे एकटया फडणवीसांना दोष देऊन फायदा नाही. लोकांनी जो कौल दिला होता त्या विरोधात सगळं घडलं. त्याचे भोग त्यांच्यासोबत जनताही भोगत आहे, असे पाटील म्हणाले.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaju Patilराजू पाटीलMNSमनसेShiv Senaशिवसेना