शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

२७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेकरिता आग्रही- राजू पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 01:31 IST

सर्वपक्षीय संघर्ष समितीच्या बैठकीत दिली ग्वाही

कल्याण : कल्याणडोंबिवलीत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांची स्वतंत्र नगरपालिका स्थापन करण्यात यावी या मागणीसाठी सरकार दरबारी आपण आग्रही असल्याची माहिती मनसे आ. राजू पाटील यांनी सोमवारी दिली.

२७ गावे सर्वपक्षीय संघर्ष समितीच्यावतीने सोमवारी सायंकाळी मानपाडेश्वर मंदिर परिसरात जाहीर सभा बोलवण्यात आली. या सभेत आ. पाटील यांनी पुनरुच्चार केला. यावेळी समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे यांच्यासह पदाधिकारी चंद्रकांत पाटील, अर्जुन चौधरी, शिवराम गायकर, बळीराम तरे, तुळशीराम म्हात्रे, गजानन मांगरुळकर, रंगनाथ ठाकूर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

पाटील म्हणाले की, २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभाध्यक्ष नाना पटोले व कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौड यांची भेट घेतली आहे. त्यांच्याकडे मागणीचे पत्रही दिले आहे. २७ गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीसह गावातील १० गावांकरीता एमएमआरडीए नियोजन प्राधिकरण आहे. उर्वरीत १७ गावांकरीता कल्याण-डोंबिवली महापालिका नियोजन प्राधिकरण आहे. १० गावात कल्याण ग्रोथ सेंटर प्रस्तावित आहे. त्यामुळे या १० दहा गावातील रहिवाशांना बांधकाम परवानगी मिळविणे जिकरीचे होते. या विषयी जातीने लक्ष घालणार आहे.

त्याचबरोबर कल्याण शीळ रस्त्याचा सहा पदरीकरणाच्या कामात व अलिबाग-विरार कॉरीडॉर रस्ते प्रकल्पात बाधितांना योग्य तो मोबदला मिळावा या मागणीशी मी सहमत असून मोदबला मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहे. स्वतंत्र नगरपालिका झाल्यावर बरेचसे प्रश्न आपोआपच सुटतील, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. २७ गाव सर्वपक्षीय संघर्ष समितीतर्फे केल्या जाणाऱ्या आंदोलनात मी रस्त्यावर उतरण्यास तयार आहे, अशी ग्वाही पाटील यांनी यावेळी दिली.

महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाकडे लागले लक्ष

२७ गावे महापालिका हद्दीतून वगळण्याच्या मागणीकरिता उच्च न्यायालयात दाखल केलेल्या तीन याचिका न्यायप्रविष्ट आहेत. तत्कालीन भाजप सरकारने २०१५ पासून समितीला गावे वगळण्यात येतील, असे आश्वासन दिले. न्यायालयात जो निकाल लागेल तो लागेल.मात्र गावे वगळली जातील असे सांगण्यात येत होते. राज्यात सत्ता परिवर्तन झाले. भाजप सरकारने आधी गावे समाविष्ट केली. त्यानंतर ती वगळण्याचे आश्वासन दिले. मात्र शिवसेनेची भूमिका ही गावे वगळण्याची नव्हती. आता महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेच्या सोबत काँग्रेस व राष्ट्रवादी सहभागी आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी सरकारच्या काळात २००२ साली महापालिकेतून ही गावे वगळली होती. त्यामुळे दोन परस्पर विरोधी भूमिका असलेले पक्ष महाविकास आघाडीत असल्याने आत्ता तरी स्वतंत्र नगरपालिकेच्या मागणीकरीता गावे वगळली जाणार की नाही या प्रश्न कायम आहे.

टॅग्स :kalyanकल्याणdombivaliडोंबिवलीRaju Patilराजू पाटीलMNSमनसेmaharashtra vikas aghadiमहाराष्ट्र विकास आघाडी