शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

Sandeep Deshpande : शिवसेनेला हनुमान चालीसा केव्हापासून डिवचायला लागली?; संदीप देशपांडेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 19:37 IST

आम्ही संपलेलो नाही. शिवसेना प्रमुखांचे विचार तुम्ही संपवायला निघाला आहात. हिंदुत्व संपवलं आहे : संदीप देशपांडे

"राम नवमी होती, तेव्हा विभाग अध्यक्षांनी रामरथ तयार करायचा आणि प्रत्येक ठिकाणी फिरवायचा असं ठरवलं होतं. रामनवमीच्या मिरवणुकांच्या इथे तो रथ जाईल. एका चांगल्या भावनेनं तो रथ तयार करण्यात आला. मुंबईमध्ये शिवाजी पार्क येथे गडकरी चौक आहे. गडकरी चौक हा फार पूर्वीपासून आहे आणि शिवसेना भवन हे १९६६ पासून आहे. त्या गडकरी चौकात रामरथाचं पूजन केलं आणि उद्घाटन केलं आणि त्यानंतर तो फिरणार होता. त्यावेळी लगेच पोलीस पाठवले आणि रामरथ जप्त केला. विभाग अध्यक्षांनाही ताब्यात घेतलं," असं मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले. राज ठाकरे यांच्या उत्तर सभेदरम्यान ते बोलत होते.

"या घटनेनंतर मी त्या ठिकाणी गेलो. त्यांना काय गुन्हा घडला अशी विचारणा केली. त्यावेळी शिवसेनेला डिवचण्यासाठी हनुमान चालीसा लावली असं सांगितलं. शिवसेना हनुमान चालीसा लावल्यावर कधीपासून डिवचायला लागली?," असा सवाल देशपांडे यांनी केला. "मी एखादवेळेस हे समजू शकतो, की कोणत्या अन्य धर्माचं काही केलं म्हणून शिवसेना डिवचली गेली. पण हनुमान चालीसा म्हटलं, मारुती स्त्रोत्रानं शिवसेना डिवचत असेल तर तो भगवा रंग बाजूला ठेवून दुसरा रंग परिधान करावा. त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही," असंही ते म्हणाले.

"शिवसेनाप्रमुखांचे विचार संपवताय""आम्ही संपलेलो नाही. शिवसेना प्रमुखांचे विचार तुम्ही संपवायला निघाला आहात. हिंदुत्व संपवलं आहे. म्हणून तुम्ही डिवचले जात आहात. आमच्या घरासमोर हनुमान चालीसा लावा आम्ही नाही डिवचलं जात. जर तुम्ही डिवचले जात असाल तर शिवसेना प्रमुखांचे विचार हा तुमच्याकडून संपत चाललाय. आम्हाला संपलेला पक्ष म्हणणाऱ्यांचा पक्ष संपतोय हे महापालिकेच्या निवडणुकांदरम्यान दिसेल," असंही त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :Sandeep Deshpandeसंदीप देशपांडेShiv SenaशिवसेनाAditya Thackreyआदित्य ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे