शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

Sandeep Deshpande : शिवसेनेला हनुमान चालीसा केव्हापासून डिवचायला लागली?; संदीप देशपांडेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2022 19:37 IST

आम्ही संपलेलो नाही. शिवसेना प्रमुखांचे विचार तुम्ही संपवायला निघाला आहात. हिंदुत्व संपवलं आहे : संदीप देशपांडे

"राम नवमी होती, तेव्हा विभाग अध्यक्षांनी रामरथ तयार करायचा आणि प्रत्येक ठिकाणी फिरवायचा असं ठरवलं होतं. रामनवमीच्या मिरवणुकांच्या इथे तो रथ जाईल. एका चांगल्या भावनेनं तो रथ तयार करण्यात आला. मुंबईमध्ये शिवाजी पार्क येथे गडकरी चौक आहे. गडकरी चौक हा फार पूर्वीपासून आहे आणि शिवसेना भवन हे १९६६ पासून आहे. त्या गडकरी चौकात रामरथाचं पूजन केलं आणि उद्घाटन केलं आणि त्यानंतर तो फिरणार होता. त्यावेळी लगेच पोलीस पाठवले आणि रामरथ जप्त केला. विभाग अध्यक्षांनाही ताब्यात घेतलं," असं मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले. राज ठाकरे यांच्या उत्तर सभेदरम्यान ते बोलत होते.

"या घटनेनंतर मी त्या ठिकाणी गेलो. त्यांना काय गुन्हा घडला अशी विचारणा केली. त्यावेळी शिवसेनेला डिवचण्यासाठी हनुमान चालीसा लावली असं सांगितलं. शिवसेना हनुमान चालीसा लावल्यावर कधीपासून डिवचायला लागली?," असा सवाल देशपांडे यांनी केला. "मी एखादवेळेस हे समजू शकतो, की कोणत्या अन्य धर्माचं काही केलं म्हणून शिवसेना डिवचली गेली. पण हनुमान चालीसा म्हटलं, मारुती स्त्रोत्रानं शिवसेना डिवचत असेल तर तो भगवा रंग बाजूला ठेवून दुसरा रंग परिधान करावा. त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही," असंही ते म्हणाले.

"शिवसेनाप्रमुखांचे विचार संपवताय""आम्ही संपलेलो नाही. शिवसेना प्रमुखांचे विचार तुम्ही संपवायला निघाला आहात. हिंदुत्व संपवलं आहे. म्हणून तुम्ही डिवचले जात आहात. आमच्या घरासमोर हनुमान चालीसा लावा आम्ही नाही डिवचलं जात. जर तुम्ही डिवचले जात असाल तर शिवसेना प्रमुखांचे विचार हा तुमच्याकडून संपत चाललाय. आम्हाला संपलेला पक्ष म्हणणाऱ्यांचा पक्ष संपतोय हे महापालिकेच्या निवडणुकांदरम्यान दिसेल," असंही त्यांनी नमूद केलं.

टॅग्स :Sandeep Deshpandeसंदीप देशपांडेShiv SenaशिवसेनाAditya Thackreyआदित्य ठाकरेRaj Thackerayराज ठाकरे