शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
5
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
6
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
7
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
8
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
9
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
10
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
11
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
12
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
13
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
14
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
15
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
16
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
17
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
18
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
19
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
20
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज

टोलदरवाढीविरोधात आता मनसेचे खळखट्याक; राज ठाकरे उद्या भेट देणार, जाधव यांची माहिती

By अजित मांडके | Updated: October 7, 2023 16:04 IST

टोलदरवाढी विरोधात मनसेने पुकारलेल्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मनसे आणखी आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे.

ठाणे : टोलदरवाढी विरोधात मनसेने पुकारलेल्या आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी मनसे आणखी आक्रमक झाल्याचे दिसून आले आहे. सरकारकडून अपेक्षा नव्हती. लोकांच्या मागणी खातर आम्ही गांधीगिरीच्या मार्गाने आंदोलन करीत होतो. मात्र आता बस झाले, यापुढे आम्ही भगतसिंग होऊन रस्त्यावर उतरु असा इशारा मनसेचे ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली. त्याची सुरवात पुढील आठवड्यापासून हे आंदोलन सुरु केले जाईल. स्वर्गीय आनंद दिघे यांनी याच टोलविरोधात आवाज उठविला होता. दिघे यांच्यासाठी टोल बंद करावा, टोलदरवाढ बंद करावी अशी मागणी देखील त्यांनी केली.

ठाण्यात मनसेच्या वतीने टोलदरवाढी विरोधात मागील महिन्यापासून आंदोलन उभारण्यात आले आहे. तर मागील तीन दिवसापासून टोलदरवाढी विरोधात मनसेने आमरण उपोषण सुरु केले आहे. परंतु या आंदोलनाची दखल अद्यापही प्रशासनाने घेतली नसल्याचेच दिसून आले. त्यामुळे आपली पुढील भमिका स्पष्ट करण्यासाठी शनिवारी याच ठिकाणी एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जाधव यांनी आपली भुमिका स्पष्ट केली. मनसे नुसते आक्रमकपणे आंदोलन करते अशी जनतेची भावना होती, त्यामुळे त्यांच्यासाठी हा गांधी सप्ताह साजरा केला. मुख्यमंत्र्यांनी विनंती आहे की, त्यांनी २०१६ साली न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यांनी टोलनाक्यावर धाव घेऊन स्वत: ते म्हणाले होते, की हा टोलचा झोल बंद करा. मात्र अद्यापही हा टोल बंद झालेला दिसत नाही. त्यातही शुक्रवारी एमएमआरडीएच्या प्रतिनिधींनी देखील या टोलबाबत मुख्यमंत्री हे स्वत: भुमिका घेतात असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी याबाबत तत्काळ निर्णय घ्यावा अशी विनंती या माध्यमातून करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

अन्यथा यापूर्वी ज्या पध्दतीने क्लस्टर, धरणाचे, ७५० चौरस फुटांच्या घरांना करमाफी दिली जाणार अशी जी काही आश्वासने दिली होती. ती कोणतीच पूर्ण झालेली नाही. त्यामुळे टोलचे आश्वासन देखील खोटे होते का? असेच आता ठाणेकरांना वाटू लागले आहे. त्यामुळे टोलबाबत तत्काळ  निर्णय घ्यावा अशी मागणी त्यांनी केली. १९९९ मध्ये धर्मवीर आनंद दिघे यांनी याची सुरवात केली होती. तेव्हा टोल सुरु होण्यापूर्वीच त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. त्यामुळे त्यांच्यासाठी हा टोल बंद करावा अशी मागणी त्यांनी केली. ठाणेकरांना एकही गोष्ट अद्याप मुख्यमंत्र्यांनी दिलेली नाही. भिंतीचे रंग उडाले, डिस्को लाईट बंद पडल्या आहेत. आम्हाला डिस्को लाईट नको आम्हाला चांगले धोरण द्या, आरोग्य सेवा द्या, शिक्षणाच्या चांगल्या संधी उपलब्ध करुन द्या अशी मागणीही त्यांनी या आंदोलनाच्या माध्यमातून केली. परंतु आता बस झाली गांधीगारी आता भगतसिंग होणार असून त्याची सुरवात पुढील आठवड्यापासून केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

राज ठाकरे घेणार भेट

मागील तीन दिवसापासून सुरु असलेल्या या आंदोलनाला रविवारी मनसेचे प्रमुख राज ठाकरे हे सकाळी १० वाजता भेट देणार आहेत. त्यावेळी आंदोलनकर्त्यांबरोबरच येथील स्थानिक रहिवासी, गृहसंकुलातील रहिवासी भेट देणार असल्याचेही जाधव यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता राज ठाकरे रविवारी टोल बाबत काय भुमिका घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

टॅग्स :Avinash Jadhavअविनाश जाधवMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेthaneठाणेtollplazaटोलनाकाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार