शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मते मिळविण्यासाठी मनसेला करावी लागणार प्रयत्नांची पराकाष्ठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 19:43 IST

चार मतदारसंघांत अनेक जण इच्छुक : युतीची डोकेदुखी वाढणार

- अजित मांडकेठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली होती. परंतु, लाव रे तो व्हिडीओमुळे मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांची चांगलीच क्रेझ निर्माण झाली होती. त्यानंतर, आता उशिराने का होईना, पक्षाने राज्यात विधानसभेच्या १०० जागा लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, यामध्ये ठाण्यातील चारही जागा लढविण्याचा पक्षाचा विचार असून त्यासाठी काही मोजक्याच इच्छुकांची नावे समोर आली आहेत. ती श्रेष्ठींकडे पाठविली आहेत. असे असले तरी काहींनी आतापासूनच सोशल मीडियावर प्रचारसुद्धा सुरू केल्याचे दिसत आहे. परंतु, पक्षाला चारही मतदारसंघांमध्ये मते मिळविण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.ठाण्यात मनसेचा एकही नगरसेवक नसला तरी त्यांची पारंपरिक अशी सुमारे एक लाखांच्या आसपास मते आहेत. ती मते आता मिळविण्यासाठी मनसेचा प्रयत्न असणार आहे. लोकसभा निवडणुकीतून मनसेने माघार घेतली होती. मागील लोकसभा निवडणुकीचा विचार केल्यास मनसेच्या अभिजित पानसे यांना ४८ हजार ८६३ मते मिळाली होती. त्यामुळे ही मते आता निर्णायक ठरणार आहेत. त्यानंतर, झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये ठाणे शहर विधानसभेतून निलेश चव्हाण यांना आठ हजार ३८१ मते मिळाली होती. परंतु, आता त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तर, कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून सेजल कदम यांना आठ हजार ५७८ मते मिळाली होती. तर, ओवळा-माजिवडा मतदारसंघातून सुधाकर चव्हाण यांना २० हजार ५६८ मते मिळाली होती. ठाण्यात मनसेचा तसा बऱ्यापैकी बोलबाला आहे.

दरम्यान, त्यानंतर झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये मनसेची चांगलीच घसरण झाल्याचे दिसून आले. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत तर मनसेला भोपळाही फोडता आला नव्हता. त्यानुसार, पक्षाची आताच्या घडीला या मतदारसंघात अंदाजे एक लाखांच्या आसपास मते असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या मतांमध्ये वाढ करण्याबरोबरच शिवसेना आणि भाजपला त्यांना कांटें की टक्कर देण्यासाठी तगडे उमेदवार पक्षाला द्यावे लागणार आहेत. दुसरीकडे आता मनसेकडून विधानसभा निवडणूक लढविण्याची लगबग सुरूझाली आणि इच्छुकांची भाऊगर्दीही या पक्षात काही प्रमाणात का होईना दिसत आहे.

शुक्रवारी सायंकाळपर्यंत ठाण्यातील चारही मतदारसंघांतून काही प्रमुख नावे श्रेष्ठींकडे गेल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह महेश कदम यांची नावे पुढे आली आहेत. तर, कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून मनसेचे शहराध्यक्ष रवींद्र मोरे आणि राजश्री नाईक, तर ओवळा-माजिवडा मतदारसंघातून संदीप पाचंगे, पुष्कर विचारे आणि प्रसाद सुर्वे आणि कळवा-मुंब्रा या विधानसभा मतदारसंघातून सुशांत सूर्यराव, महेश साळवी यांची नावे श्रेष्ठींकडे गेली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे आता कोणाच्या पारड्यात पक्ष उमेदवारी देणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ठाण्यात आंदोलनाच्या माध्यमातूनच मनसेचा चेहरा दिसला आहे. मात्र, महापालिकेत त्यांचे प्रतिनिधित्व दिसून आले नाही. त्यामुळे मतांची बेगमी मिळविण्यासाठी मनसेला राज ठाकरे यांचा करिष्मा किंवा प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

टॅग्स :MNSमनसेthaneठाणेShiv SenaशिवसेनाAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019