शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राफेलमधून सफर; २० मिनिटे पाहिली, भारताच्या नव्या योद्ध्याची ताकद...
2
दिवाळीत एसटीने केली ३०१ कोटी रुपयांची कमाई, २७ ऑक्टोबरला केला एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम 
3
स्वच्छतेतून समृद्धीकडे! मोदी सरकारने कमालच केली; ३ आठवड्यात कचऱ्यातून कमावले तब्बल ३८७ कोटी
4
लवकरच 'ट्रू कॉलर'ची सुट्टी! ट्राय अन् डॉटने घेतला मोठा निर्णय; बनावट कॉल, फसवणुकीला लगाम लागणार 
5
माणुसकीला काळिमा! पत्नीनेच ५५ वर्षीय पतीच्या प्रायव्हेट पार्टवर केला वार; कारण ऐकून बसेल धक्का
6
दाऊद इब्राहिमचा विश्वासू दानिश ‘चिकना’ला गोव्यातून अटक; ड्रग्स सिंडिकेटवर NCBची मोठी कारवाई
7
रतन टाटांची 'टाटा' राहिली का? त्यांच्या 'या' पहिल्या खास व्यक्तीला बाहेरचा रस्ता दाखविला; कोण आहेत मिस्त्री?
8
"आता कर्ज घ्यावं लागेल..."; पाकिस्तानमध्ये एका टोमॅटोची किंमत ७५ रुपये, का वाढली महागाई?
9
"श्रेयस अय्यरची सर्जरी झालीच नाही," BCCIनी दिली वेगळीच माहिती, ताज्या अपडेटमध्ये नेमकं काय?
10
Bigg Boss 19: ये बात! महाराष्ट्रीयन भाऊने करुन दाखवलंच, प्रणित मोरे बनला 'बिग बॉस'च्या घरातील नवा कॅप्टन
11
मुलगा शिवसेनेचा आमदार! नारायण राणे म्हणतात, बाळासाहेब होते तोपर्यंतच शिवसेना होती, आजची...
12
Lenskart IPO: 'व्हॅल्युएशन'चा आकडा एवढा मोठा की वाचायला 'लेन्स'ची गरजच नाही; पण गुंतवणूकदारांना ते झेपेल का?
13
'त्या' भारतीय नागरिकाला आता होऊ शकते १० वर्षांची कैद अन् २.५ लाख डॉलर्सचा दंड! नेमकं प्रकरण काय?
14
निवडणुकांचा पत्ता नाही अन् शरद पवार गटाचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार जाहीर; जयंत पाटील मैदानात
15
विवाह मुहूर्त: २०२५-२६ मध्ये ४९ दिवस विवाह मुहूर्त; खरोखरच करावी लागणार लगीन 'घाई'
16
कॅनडात भारतीय वंशाच्या उद्योगपतीची गोळ्या झाडून हत्या; लॉरेन्स बिश्नोई टोळीने घेतली जबाबदारी
17
निवडणूक बिहारमध्ये, चर्चा महाराष्ट्राच्या एकनाथ शिंदेंची; एनडीएला डिवचण्यासाठी विरोधकांकडून 'शिंदे मॉडेल'चा उल्लेख
18
आधी सिनेमातून काढलं अन् आता...; 'कल्कि'च्या मेकर्सची दीपिकाविरोधात पुन्हा खेळी; चाहते संतापले
19
सगळं संपलं असं वाटतंय? हातातून सर्व निसटून जातंय? स्वामींचे ‘हे’ शब्द नक्कीच प्रेरणा देतील!
20
प्रकट दिन २०२५: स्वामी अन् शंकर महाराजांची भेट कशी झाली? ब्रह्मांडनायक गुरुचा अद्भूत शिष्य

मनमानीमुळे घसरले मनसेचे इंजीन; ठाण्यात पक्षातील खदखद चव्हाट्यावर, बहिष्काराचे सत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 03:21 IST

एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडव्याला दणदणीत मेळावा घेत पक्षवाढीसाठी नेते-पदाधिकारी, कार्यकर्त्यांत जोम निर्माण करण्याचा प्रयत्न केला असतानाच ठाण्यात मात्र वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराच्या रुळावरुन मनसेचे इंजिन घसरल्याने नेते-कार्यकर्त्यांचे डबे परस्परांवर आदळू लागले आहेत.

ठाणे : एकीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पाडव्याला दणदणीत मेळावा घेत पक्षवाढीसाठी नेते-पदाधिकारी, कार्यकर्त्यांत जोम निर्माण करण्याचा प्रयत्न केला असतानाच ठाण्यात मात्र वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराच्या रुळावरुन मनसेचे इंजिन घसरल्याने नेते-कार्यकर्त्यांचे डबे परस्परांवर आदळू लागले आहेत. वरिष्ठ पदाधिकाºयांकडून डावलले जात असल्याचा आरोप जुने-जाणते, अनुभवी पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून केला जात आहे. त्यामुळे पक्षातील खदखद समोर आली आहे.वरिष्ठ पदाधिकाºयांचा मनमानी कारभार, महत्त्वाचे आंदोलन-बैठकांना न बोलावणे आणि आमच्या सूचना राज ठाकरे यांच्यापर्यंत न पोहोचविता मध्येच त्या गुंडाळल्या जाणे, अशा अनेक प्रसंगांचे दाखले देत ठाण्यातील मनसेच्या कार्यकारिणीवर जुन्या मनसैनिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. हे सर्व आरोप चुकीचे आहेत. जे नाराज आहेत त्यांची आम्ही समजूत काढू. परंतु त्यांनीही संघटनात्मक कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्यावा, असे स्पष्ट मत पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी ‘लोकमत’कडे मांडले.२०१७ च्या महापालिका निवडणुकीत मनसेच्या दारूण पराभवानंतर उभारी घेत राज ठाकरे यांनी पक्षाला नवसंजीवनी देण्यासाठी गुढीपाडव्याला सभा घेतली. हे प्रयत्न वरिष्ठ पातळीवर सुरू असले, तरी स्थानिक पातळीवर मात्र संघटना खिळखिळी झाल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. सर्वांना बरोबर घेऊन पदाधिकारी चालत नाहीत. उलट मर्जीतले पदाधिकारी- कार्यकर्त्यांना घेऊन काम करत असल्याचा आरोप या नाराज गटाकडून केला जात आहे. आमची नाराजी पक्षाविरोधात नसून ठाण्यातील वरिष्ठ पदाधिकाºयांच्या विरोधात असल्याची भूमिका त्यांनी घेतली. पक्षात गेली १२ वर्षांपासून मनसैनिक काम करीत आहेत. परंतु वरिष्ठ पदाधिकारी जुन्या मनसैनिकांना पूर्णपणे डावलत आहेत. आमच्या सूचना कधीही राज ठाकरेंपर्यंत पोहोचविल्या जात नाहीत. शहरातील नियुक्त्या करताना कोणाला विश्वासात घेतले जात नाही. जुन्या मनसैनिकांचा वापर फक्त आंदोलनातील गर्दी दाखविण्यासाठी होतो. महत्त्वाचे आंदोलन असो की, बैठका यातून जुने पदाधिकारी- कार्यकर्त्यांना वगळले जाते. मूळात त्याची कल्पनाही दिली जात नाही. पक्षात सध्या आयाराम गयारामांना प्राधान्य दिले जाते. आम्हाला फक्त नाममात्र पदाधिकारी म्हणून ठेवण्यात आले आहे. पदाप्रमाणे काम करण्याचे अधिकारही दिले जात नाहीत. कोपरी-पाचपाखाडी या विधानसभा मतदारसंघात एकापेक्षा अधिक महत्त्वाची पदे गरज नसताना देण्यात आली आहेत, अशा एक ना अनेक आरोपांच्या फैरी झाडत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.वांद्रे येथे गेल्या आठवड्यात राज यांनी घेतलेल्या बैठकीत पक्षातील पदाधिकारी-कार्यकर्त्यांकडून सूचना मागविण्यात आल्या. या बैठकीबाबत ठाण्यातील वरिष्ठ पदाधिकाºयांनी आम्हाला कळविलेही नाही. तो राग होता म्हणूनच १५ मार्चला जय भगवान हॉल येथे झालेल्या मनसे पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या बैठकीवर या नाराजांनी बहिष्कार टाकल्याचेही या पदाधिकाºयांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. ठाण्यातील मनसेत सध्या ‘हम करे सो कायदा’ या उक्तीप्रमाणे काम सुरू आहे. शहरात संघटना बांधणी होत नाही आणि ती पदाधिकाºयांनाच नको असल्याचा गंभीर आरोप ठाणे शहर सचिव पदाच्या दर्जाच्या नाराज मनसैनिकांनी केला आहे.थेट राज ठाकरेंना कनेक्ट व्हा! : पक्षप्रमुख राज ठाकरे यांच्याकडे सूचना देण्यासाठी ‘कनेक्ट राज ठाकरे’ हे नेटवर्क उपलब्ध आहे. त्यामुळे जे नाराज आहेत ते त्यांच्या सूचना या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतात. या नाराज कार्यकर्त्यांना आम्ही कोणत्याही निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेत नाही असे वाटत असेल; तर यापुढे त्यांना नक्की सहभागी करुन घेतले जाईल. परंतु या नाराज पदाधिकाºयांकडून माझी माफक अपेक्षा आहे, की त्यांनी संघटनेचे कार्यक्रम, आंदोलन असेल तर त्यात सहभागी व्हावे. संघटना वाढविण्यासाठी तुम्ही काम करणार नसाल, तर ते संघटनेसाठी निश्चितच हिताचे नाही. नाराज पदाधिकाºयांची आम्ही समजूत काढू. राज ठाकरे यांचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहे, त्यांना ते सन्मानाने भेटू शकतात. - अविनाश जाधव, ठाणे जिल्हा अध्यक्ष

टॅग्स :MNSमनसेthaneठाणे