शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

सुब्रमण्यम स्वामींना मनसेने विचारला जाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 01:45 IST

राज ठाकरे आणि उत्तर भारतीयांचा डीएनए एकच असल्याची वादग्रस्त टीका करणारे सुब्रमण्यम स्वामी यांना शनिवारी व्याख्यानानंतर मनसेने जाब विचारला.

डोंबिवली : राज ठाकरे आणि उत्तर भारतीयांचा डीएनए एकच असल्याची वादग्रस्त टीका करणारे सुब्रमण्यम स्वामी यांना शनिवारी व्याख्यानानंतर मनसेने जाब विचारला. राज ठाकरे परप्रांतीयांच्या मुद्द्यावर राजकारण करत असल्याचे स्वामी यांनी सांगताच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालाचा दाखला देत मनसेने उत्तर भारतातील स्थलांतराचा मुद्दा मांडला. प्रत्येक मुद्द्यावर बोलणाºया स्वामी यांनी परप्रांतीय फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर का मौन बाळगले, अशी विचारणाही करण्यात आली.मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी स्वामी यांना कार्यक्रमाच्या ठिकाणीच गाठले. ठाकरे यांच्यावर टीका करण्याचा अधिकार कोणी दिला, असा प्रश्न विचारला. स्वामी यांच्यासोबत असलेले राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी कदम यांची समजूत काढून त्यांना बाहेर जाण्यास सांगितले आणि संयमाने घ्या, अशी समजूत काढली. एक पाऊल रामराज्याच्या दिशेने या विषयावर व्याख्यानासाठी स्वामी शनिवारी रात्री डोंबिवलीत आले होते. केवळ भाषणात टीका करून स्वामी थांबले नाहीत, तर पत्रकार परिषदेतही त्यांनी वक्तव्य सिद्ध करून दाखविण्याचे आव्हान दिले. ठाकरे यांना डीएनएची कल्पना असल्यानेच ते आती यूपीवाल्यांविरोधात काही बोलत नसल्याचा दावा स्वामी यांनी केला. मराठी माणसाने परप्रांतात घुसखोरी केली. रोजगार ओरबडला आणि कायदे तोडले तर चालेल का, असा सवाल कदम यांनी केला. काश्मीरचा मुद्दा उपस्थित करुन स्वामी यांनी राज्या-राज्यात भांडणे लावण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप कदम यांनी केला.

टॅग्स :MNSमनसे