शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

मनसेचे घंटानाद, आरती आंदोलन करून शिवसेनेवर टिकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2018 17:08 IST

पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार तथा महानगरपालिकेतील सत्ताधारी पुर्णपणे अपयशी ठरले असताना केवळ निवडणूकीच्या तोंडावर लोकांच्या भावनांशी खेळ करण्याचा घाट या शिवसेना भाजपने सातत्याने मांडला आहे.

ठळक मुद्देडोंबिवली मनसेने चक्क प्रभु श्रीरामालाच साकडं घातले. डोंबिवली शहर मनसेने बाजीप्रभू चौकातील राममंदिरामध्ये घंटानाद, आरत्या करत शिवसेनेवर टिका केली.भावनिक राजकारण करणाऱ्या डोंबिवली शहराच्या वतीने शहर अध्यक्ष मनोज प्रकाश घरत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

डोंबिवली -  कल्याण डोंबिवली क्षेत्रातील नागरीसुविधांची वाताहत झाली आहे. कोणत्याही प्रकारची पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार तथा महानगरपालिकेतील सत्ताधारी पुर्णपणे अपयशी ठरले असताना केवळ निवडणूकीच्या तोंडावर लोकांच्या भावनांशी खेळ करण्याचा घाट या शिवसेना भाजपने सातत्याने मांडला आहे. त्याचा निषेध म्हणून डोंबिवली मनसेने चक्क प्रभु श्रीरामालाच साकडं घातले. या महापालिकेत २४ वर्षे सत्ता उपभोगूनही येथील जनतेला जो वनवास भोगावा लागला आहे त्याचे काय? असा सवाल करत शनिवारी डोंबिवली शहर मनसेने बाजीप्रभू चौकातील राममंदिरामध्ये घंटानाद, आरत्या करत शिवसेनेवर टिका केली.

भावनिक राजकारण करणाऱ्या डोंबिवली शहराच्या वतीने शहर अध्यक्ष मनोज प्रकाश घरत यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. त्यावेळी महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम, जिल्हाध्यक्ष, गटनेते प्रकाश भोईर, राहुल गणपुले, प्रकाश माने, मंदा पाटील, महापालिका विरोधी पक्षनेते मंदार हळबे, नगरसेविका सरोज भोईर, जिल्हा संघटक राहुल कामत, प्रल्हाद म्हात्रे, सुदेश चुडनाईक, शहर संघटक मनोज राजे, सचिव कोमल पाटील, सागर जेधे , अरुण जांभळे, सुभाष कदम आदींसह महिला सेना विद्यार्थी सेना, सेलचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

टॅग्स :Shiv Senaशिवसेनाthaneठाणेdombivaliडोंबिवली