शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

भिवंडीतील पद्मावती इस्टेटमधील अनधिकृत बांधकामांवर एमएमआरडीएची कारवाई; १७० कुटुंबांवर बेघर होण्याची आली वेळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 20:18 IST

Bhiwandi News : भिवंडी तालुक्यातील कशेळी येथील पद्मावती इस्टेट या रहिवासी संकुलनात असलेल्या ९ अनधिकृत इमारतींवर एमएमआरडीए प्रशासनाकडून सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून तोडू कारवाई करण्यात आली आहे.

- नितिन पंडीत भिवंडी  -  तालुक्यातील कशेळी येथील पद्मावती इस्टेट या रहिवासी संकुलनात असलेल्या ९ अनधिकृत इमारतींवर एमएमआरडीए प्रशासनाकडून सोमवारी सकाळी दहा वाजल्यापासून तोडू कारवाई करण्यात आली आहे. बांधकाम विकासक व जागा मालक यांच्यातील वाद थेट मुंबई उच्च न्यायालयात गेल्याने उच्च न्यायालयाच्या निर्देशाने या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिल्या नंतर हि तोडू कारवाई करण्यात आली आहे . तर दुसरीकडे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे या इमारतींवर कारवाई झाल्याचा आरोप येथील रहिवासींनी केला आहे. विशेष म्हणजे सध्या कोरोना संकट असतानाही अशा परिस्थितीत पद्मावती इस्टेट येथील इमारतींवर झालेल्या तोडू कारवाईमुळे या ठिकाणी राहणाऱ्या सुमारे १७० कुटुंबांवर बेघर होण्याची वेळ आली आहे . दरम्यन कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी नारपोली पोलीस ठाण्याच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बांधकाम विकासक रसिक शाह यांनी कशेळी ग्राम पंचायत हद्दीत पद्मावती इस्टेट या ठिकाणी निवासी संकुल बांधले असून शासनाची आवश्यक ती कोणतीही परवानगी न घेता अनधिकृतपणे याठिकाणी निवासी इमारती बांधल्या आहेत . त्यातच बांधकाम विकासक रसिक शाह व जमीन मालक सुनिता मदरानी व इतर यांनी विकासकाला विरोधात जन हिट याचिका दाखल केली होती. या याचिकेवर २७ एप्रिल २०२१ रोजी सुनावणी करत असताना एमएमआरडीए च्या महानगर आयुक्त आर.ए.राजीव यांना न्यायालयाच्या समोर हजर राहण्याचे आदेश दिले होते. त्या नुसार एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर.ए.राजीव हे २९ एप्रिल रोजीच्या सुनावणीस  हजर झाले. त्यावेळी मुंबई उच्च न्यायालयाने भिवंडी मधील बेकायदा इमारतीच्या बांधकामांवर एमएमआरडीए कोणतीही कारवाई करत नसल्याने फटकारले. तसेच मुंबई उच्च न्यायालयाने अनधिकृत इमारती कशा बांधल्या जाऊ शकतात? अशा अनधिकृत इमारतींवर एमएमआरडीएने कोणती कारवाई केली किंवा त्यासंदर्भात कोणती कारवाई प्रस्तावित आहे? तसेच बांधकाम होत असताना डोळे झाक करत असलेल्या प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली किंवा प्रस्तावित आहे? भविष्यात असे अनधिकृत बांधकाम रोखण्यासाठी एमएमआरडीए काय पावले उचलणार आहेत? या बाबत एमआरडीएने  ६ मे २०२१ रोजी च्या तारखेला उत्तर दाखल करावे, असे आदेश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिले. त्यावर एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर.ए.राजीव यांनी सदरचे अनधिकृत बांधकाम दिनांक ६ मे २०२१ रोजी च्या तारखेच्या आत तोडण्यात येईल, असे निवेदन दिले असल्याची माहिती समोर येत आहे .  एमएमआरडीए कडून त्यानंतर येथे राहणाऱ्या नागरिकांना कोणत्याही सूचना न देता सोमवारी सकाळी थेट इमारती तोडण्याची कारवाई झाल्याने या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मात्र सध्या सर्वत्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. या संसर्गजन्य आजारापासून संरक्षण करण्यात नागरिक तसेच इमारतीतील रहिवासी गुंतलेले असल्याने हि तोडू कारवाई करण्यासाठी एमएमआरडीएच्या आयुक्तांनी पुढाकार घेतल्याने या तोडू कारवाई दरम्यान नागरिकांनी एकच हाहाकार माजविला होता . या तोडू कारवाईमुळे येथील रहिवाश्यांच्या संसार कोरोना संकटात रस्त्यावर आल्याने आता आसरा घायचा कुठे असा यक्ष प्रश्न येथील रहिवाशींना पडला आहे . 

टॅग्स :bhiwandiभिवंडी