शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

एमएमआरडीएच अपघातास जबाबदार?

By admin | Updated: September 25, 2015 02:20 IST

वर्षभरापूर्वी बांधलेल्या रस्त्यावर खड्डे पडल्याने आणि त्याची योग्य ती दुरुस्ती न केल्याने झालेल्या अपघातात रिटा प्रसाद

अंबरनाथ : वर्षभरापूर्वी बांधलेल्या रस्त्यावर खड्डे पडल्याने आणि त्याची योग्य ती दुरुस्ती न केल्याने झालेल्या अपघातात रिटा प्रसाद या महिलेच्या मृत्यू प्रकरणी दुचाकी चालविणाऱ्या तिच्या मुलीवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या या निर्णयावर टीका होऊ लागल्याने खड्ड्यांमुळेच हा अपघात घडला का, याची चाचपणी करुन संबंधीतांवरही गुन्हा दाखल करण्याची तयारी पोलिसांनी चालविली आहे. २६ जुलै रोजी अंबरनाथ डंपिंग ग्राऊंडसमोरील रस्त्यावर हा अपघात झाला. रिटा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर तब्बल सव्वा महिन्याने रविवारी शिवाजीनगर पोलिसांनी गाडी चालविणारी त्यांची मुलगी प्रितीवरच गुन्हा दाखल केला. तर पिडीत कुटुंबियांनी या अपघातास एमएमआरडीए आणि ठेकेदारांना जबाबदार धरुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी उचलून धरली आहे. अंबरनाथमधील सामाजिक संस्थानीदेखील त्यासाठी पुढाकार घेतला आहे. तीन वर्षांपूर्वी एमएमआरडीएने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कल्याण-कर्जत महामार्ग ताब्यात घेतला आहे. त्याचे चौपदरीकरण करण्याचे कामही एमएमआरडीनेच केले. मात्र अनेक ठिकाणी ते काम अर्धवटच ठेवले. ज्या रस्त्यावार अपघात झाला त्याची यापूर्वीही दुरवस्था झाली होती. दोन वर्षांपूर्वी त्याचे काम केल्यानंतरही पहिल्याच पावसात त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. डंपिंग ग्राऊंड समोरील रस्ता काँक्रिटचा केल्यावर उर्वरीत रस्ता पुन्हा डांबरीकरण करुन तो अर्धवटच ठेवला. या रस्त्यावर खड्डे पडणार याची माहिती असतांनाही एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी काँक्रिटीकरण पूर्ण केले नाही. त्यातच पावसाळ्यात डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी ही ठेकेदाराची होती. मात्र ती न झाल्याने खड्डे तसेच राहिले आहेत. त्याचाच फटका प्रसाद कुटुंबियांना बसला. (प्रतिनिधी)