शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

एमएमआरडीएच अपघातास जबाबदार?

By admin | Updated: September 25, 2015 02:20 IST

वर्षभरापूर्वी बांधलेल्या रस्त्यावर खड्डे पडल्याने आणि त्याची योग्य ती दुरुस्ती न केल्याने झालेल्या अपघातात रिटा प्रसाद

अंबरनाथ : वर्षभरापूर्वी बांधलेल्या रस्त्यावर खड्डे पडल्याने आणि त्याची योग्य ती दुरुस्ती न केल्याने झालेल्या अपघातात रिटा प्रसाद या महिलेच्या मृत्यू प्रकरणी दुचाकी चालविणाऱ्या तिच्या मुलीवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या या निर्णयावर टीका होऊ लागल्याने खड्ड्यांमुळेच हा अपघात घडला का, याची चाचपणी करुन संबंधीतांवरही गुन्हा दाखल करण्याची तयारी पोलिसांनी चालविली आहे. २६ जुलै रोजी अंबरनाथ डंपिंग ग्राऊंडसमोरील रस्त्यावर हा अपघात झाला. रिटा यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यानंतर तब्बल सव्वा महिन्याने रविवारी शिवाजीनगर पोलिसांनी गाडी चालविणारी त्यांची मुलगी प्रितीवरच गुन्हा दाखल केला. तर पिडीत कुटुंबियांनी या अपघातास एमएमआरडीए आणि ठेकेदारांना जबाबदार धरुन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी उचलून धरली आहे. अंबरनाथमधील सामाजिक संस्थानीदेखील त्यासाठी पुढाकार घेतला आहे. तीन वर्षांपूर्वी एमएमआरडीएने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कल्याण-कर्जत महामार्ग ताब्यात घेतला आहे. त्याचे चौपदरीकरण करण्याचे कामही एमएमआरडीनेच केले. मात्र अनेक ठिकाणी ते काम अर्धवटच ठेवले. ज्या रस्त्यावार अपघात झाला त्याची यापूर्वीही दुरवस्था झाली होती. दोन वर्षांपूर्वी त्याचे काम केल्यानंतरही पहिल्याच पावसात त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे अधिकाऱ्यांनी या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचा निर्णय घेतला. डंपिंग ग्राऊंड समोरील रस्ता काँक्रिटचा केल्यावर उर्वरीत रस्ता पुन्हा डांबरीकरण करुन तो अर्धवटच ठेवला. या रस्त्यावर खड्डे पडणार याची माहिती असतांनाही एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी काँक्रिटीकरण पूर्ण केले नाही. त्यातच पावसाळ्यात डांबरी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले. याची दुरुस्ती करण्याची जबाबदारी ही ठेकेदाराची होती. मात्र ती न झाल्याने खड्डे तसेच राहिले आहेत. त्याचाच फटका प्रसाद कुटुंबियांना बसला. (प्रतिनिधी)