शहरं
Join us  
Trending Stories
1
दहावीत यंदाही मुलींनीच मारली बाजी; पण २ लाख मुली दहावीपर्यंत पोहोचल्याच नाहीत!
2
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
3
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक
4
दीड वर्षाच्या बाळाची जन्मदात्यांनीच केली विक्री; साडेचार लाखांचा सौदा, सहा जणांना अटक
5
दहावी निकाल: मुंबई विभागाचा टक्का वधारला; दोन टक्क्यांनी झाली वाढ, उत्तीर्णतेत मुलींची सरशी
6
समृद्धीचा शेवटचा टप्पा ऑगस्टमध्ये खुला होणार; MSRDC कडून शेवटच्या टप्प्यातील कामे सुरू
7
दहावी निकाल: मुंबई विभागात ८ विद्यार्थ्यांना १०० % गुण; ९० टक्के मिळविणाऱ्यांचे प्रमाणही वाढले
8
ससूनच्या डॉक्टरांनी ३ लाखांसाठी बदलले ‘बाळा’च्या रक्ताचे नमुने; दोन्ही डॉक्टरांना अटक
9
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
10
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
11
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
12
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
13
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
14
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
15
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
16
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
17
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
18
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
19
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
20
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...

उल्हासनगरातील समस्यांबाबत आमदार कुमार आयलानी आक्रमक, उपमुख्यमंत्र्यांना घातले साकडे

By सदानंद नाईक | Published: August 12, 2022 6:48 PM

Ulhasnagar News: उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी, रस्त्याची दुरावस्था, पाणी टंचाई, डम्पिंग ग्राऊंड आदी समस्या वर्षोनुवर्षे सुटत नसेलतर, आमदार पदी का राहावे. अशी भूमिका कुमार आयलानी यांनी घेतली.

- सदानंद नाईकउल्हासनगर : शहरातील धोकादायक इमारतीची पुनर्बांधणी, रस्त्याची दुरावस्था, पाणी टंचाई, डम्पिंग ग्राऊंड आदी समस्या वर्षोनुवर्षे सुटत नसेलतर, आमदार पदी का राहावे. अशी भूमिका कुमार आयलानी यांनी घेतली. तसेच शहरातील समस्या बाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदन देऊन समस्या सोडविण्याची मागणी केली आहे.

उल्हासनगरातील धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आला असून इमारत पुनर्बांधणी बाबत गेल्या वर्षी राज्य शासनाने एक समिती गठीत केली. मात्र निर्णय विना समितीचा अहवाल मुख्यमंत्री यांच्या कार्यालयात धूळ खात पडल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. तसेच शहराच्या हद्दीतुन बारामाही वाहणारी उल्हास नदी असूनही महापालिका एमआयडीसीकडून पाणी विकत घेत आहे. पाणी बिला पोटी महापालिका वर्षाला ३५ कोटी खर्च करीत आहे. तसेच दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही रस्त्याची दुरावस्था झाली. डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्नही असाच अडगळीत पडला आहे. शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही शहरातील समस्या सुटत नसेलतर, आमदार पदी म्हणून राहण्याचा हक्क आपल्याला नसल्याची भूमिका आमदार कुमार आयलानी यांनी घेतली. आयलानी यांच्या आक्रमक भूमिकेने खळबळ उडाली असून येणाऱ्या पावसाळी अधिवेशनात आदी बाबत आवाज उठविणार असल्याची प्रतिक्रिया आयलानी यांनी पत्रकारांना दिली.

गेल्या वर्षी धोकादायक इमारतीचे स्लॅब कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला. तर शेकडो नागरिक बेघर झाले. याबाबत समिती गठीत होऊनही निर्णय न झाल्याने, शहरात नाराजीचा सुरू निर्माण झाला. तसेच रस्त्याची दुरावस्था होऊनही राज्य शासन विशेष निधी देत नाही. डम्पिंग ग्राऊंड ओव्हरफ्लॉ झाल्यावरही उसाटणे येथील डम्पिंगचा प्रश्न गेल्या दोन वर्षापासून सुटत नसल्याची माहिती आमदार आयलानी यांनी पत्रकारांना दिली. आदी प्रमुख मागण्यासह अन्य मागण्याचे निवेदन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले असून या समस्या आमदार पदाच्या कालावधीत सुटत नसेलतर, आमदार पदी राहण्याचा हक्क नसल्याचे, आयलानी म्हणाले. आयलानी यांच्या भूमिकेला शहरवाशियानी पाठिंबा दिला. निर्वासितांचे शहर म्हणून दुर्लक्ष केले जात आहे. अशी भावना शहरवासीयांत निर्माण झाली आहे. 

 आयलानीच्या मागणीने शासनाकडे लक्षआमदार आयलानी यांनी प्रथमच आक्रमक भूमिका घेतल्याने, पाणी टंचाई, डम्पिंग, धोकादायक इमारती व रस्त्याची समस्या सुटणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले. पावसाळी अधिवेशनात आयलानी लक्षवेधी प्रश्नाद्वारे हे मूलभूत प्रश्न उचलणार आहेत.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगरBJPभाजपाMLAआमदारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस