शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
5
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
6
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
7
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
8
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
9
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
10
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
11
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
12
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
13
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
14
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
15
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
16
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
17
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
18
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
19
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
20
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार

राज्यात धरणांच्या उद्देशालाच फासला हरताळ, पोपटराव पवार यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 03:48 IST

राज्यात शेतीला पाणी पुरवण्यासाठी धरणे बांधण्यात आली; मात्र या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. धरणातील पाणी नागरीवस्तीला पुरवले जात आहे. सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

कल्याण - राज्यात शेतीला पाणी पुरवण्यासाठी धरणे बांधण्यात आली; मात्र या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. धरणातील पाणी नागरीवस्तीला पुरवले जात आहे. सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याचे नियोजन अत्यंत गरजेचे असून परदेशात माझ्या पाणीनियोजनाची दखल घेत आहेत. याउलट, आपल्या देशात स्थिती असल्याची खंत हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केली.उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळातर्फे कल्याणमध्ये आयोजित ग्लोबल खान्देश महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी पवार यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काढलेल्या ग्रंथदिंडीमध्ये खान्देशी पारंपरिक वेशभूषा करून महिला, मुले सहभागी झाली होती.रविवार, ३ फेबु्रवारीपर्यंत चालणारा हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे. या महोत्सवात हिवरे बाजारचा कायापालट करणारे पोपटराव पवार यांचा ‘खान्देशभूषण’ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार नरेंद्र पवार, संस्थेचे अध्यक्ष विकास पाटील, ए.जी. पाटील, अनिल बोरनारे, आर.डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील धरणाचे पाणी आज शहराकडे वळले आहे. मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे येथील लोकवस्तीला धरणातील अर्धे पाणी खर्च होत आहे. पाण्याचे जतन करून ते जपून वापरले पाहिजे. त्यासाठी नियोजन सांगण्यासाठी मी अनेक परदेश दौरे केले. तेथील नागरिक त्याचे अनुकरण करतात; मात्र आपल्याकडे त्याबाबत उदासीनता आहे. महाराष्ट्रात पाणी फाउंडेशनचे काम सुरू झाले आहे. सचिन तेंडुलकर, आमीर खान यांनीही पाणीबचतीसाठी काम सुरू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना आणली. हे सर्व प्रयत्न कौतुकास्पदच आहेत; मात्र शहरी भागाने पाणी वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उत्तर महाराष्ट्रात बोअरवेल १५०० फुटांच्या खाली गेल्या आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात जलसंधारणाची कामे करण्याची गरज आहे. शहरातील कॉर्पोरेट कंपन्यांनी आपला सीएसआर निधी ग्रामीण भागाकडे वळवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.पवार म्हणाले की, आमच्या हिवरे गावास दरवर्षी ७०० ते ८०० लोक भेट देतात. परदेशी लोकही येतात. मसुरीला एक संस्था आयएएस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असते. त्याठिकाणी मी १५ वर्षांपासून अतिथी व्याख्याता म्हणून जात आहे. त्यामुळे आयएएस अधिकारीही पाणीनियोजनाबाबत जनजागृती करत आहेत. माझेही पाणीनियोजनाबाबत १० ते १२ परिसंवाद होतात. महाराष्ट्रातील पाणीटंचाई पाहता नियोजनाची सर्वाधिक गरज आहे.महोत्सवामुळे दलालदूर राहतात!खान्देशी महोत्सवामुळे खाद्यशेती उद्योगाला चालना मिळते. महोत्सवामुळे दलाल दूर राहत असल्याने शेतकºयांना अधिक नफा मिळवता येत आहे, असे पवार म्हणाले. तसेच शेतकºयांनी जोडधंदे सुरू करण्याची गरज असून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकºयांचे अनुकरण करण्याची गरज आहे. त्यामुळेच शेतकºयांच्या आत्महत्यांना आळा बसेल. इस्राएल आणि मॉरिशस या देशांतील शेती तंत्रज्ञान विकसित आहे. आपल्याकडेही ते विकसित केले पाहिजे, असे पवारम्हणाले.

टॅग्स :thaneठाणे