शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
"लॉकेट आणलंय, डोळे बंद कर"; पत्नीने सरप्राइजसाठी डोळे बंद करताच पती झाला राक्षस, केले २० वार!
4
"भाऊ, मी यावेळी राखी बांधू शकणार नाही"; पती आणि सासरच्यांना कंटाळून महिलेने संपवलं जीवन
5
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
6
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! 'हे' ५ स्टॉक खरेदी करण्याचा ब्रोकरेज फर्मचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
7
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
8
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
9
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
10
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
11
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
12
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
13
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
14
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
15
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
16
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
17
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
18
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
19
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर

राज्यात धरणांच्या उद्देशालाच फासला हरताळ, पोपटराव पवार यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 03:48 IST

राज्यात शेतीला पाणी पुरवण्यासाठी धरणे बांधण्यात आली; मात्र या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. धरणातील पाणी नागरीवस्तीला पुरवले जात आहे. सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

कल्याण - राज्यात शेतीला पाणी पुरवण्यासाठी धरणे बांधण्यात आली; मात्र या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. धरणातील पाणी नागरीवस्तीला पुरवले जात आहे. सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याचे नियोजन अत्यंत गरजेचे असून परदेशात माझ्या पाणीनियोजनाची दखल घेत आहेत. याउलट, आपल्या देशात स्थिती असल्याची खंत हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केली.उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळातर्फे कल्याणमध्ये आयोजित ग्लोबल खान्देश महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी पवार यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काढलेल्या ग्रंथदिंडीमध्ये खान्देशी पारंपरिक वेशभूषा करून महिला, मुले सहभागी झाली होती.रविवार, ३ फेबु्रवारीपर्यंत चालणारा हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे. या महोत्सवात हिवरे बाजारचा कायापालट करणारे पोपटराव पवार यांचा ‘खान्देशभूषण’ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार नरेंद्र पवार, संस्थेचे अध्यक्ष विकास पाटील, ए.जी. पाटील, अनिल बोरनारे, आर.डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील धरणाचे पाणी आज शहराकडे वळले आहे. मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे येथील लोकवस्तीला धरणातील अर्धे पाणी खर्च होत आहे. पाण्याचे जतन करून ते जपून वापरले पाहिजे. त्यासाठी नियोजन सांगण्यासाठी मी अनेक परदेश दौरे केले. तेथील नागरिक त्याचे अनुकरण करतात; मात्र आपल्याकडे त्याबाबत उदासीनता आहे. महाराष्ट्रात पाणी फाउंडेशनचे काम सुरू झाले आहे. सचिन तेंडुलकर, आमीर खान यांनीही पाणीबचतीसाठी काम सुरू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना आणली. हे सर्व प्रयत्न कौतुकास्पदच आहेत; मात्र शहरी भागाने पाणी वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उत्तर महाराष्ट्रात बोअरवेल १५०० फुटांच्या खाली गेल्या आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात जलसंधारणाची कामे करण्याची गरज आहे. शहरातील कॉर्पोरेट कंपन्यांनी आपला सीएसआर निधी ग्रामीण भागाकडे वळवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.पवार म्हणाले की, आमच्या हिवरे गावास दरवर्षी ७०० ते ८०० लोक भेट देतात. परदेशी लोकही येतात. मसुरीला एक संस्था आयएएस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असते. त्याठिकाणी मी १५ वर्षांपासून अतिथी व्याख्याता म्हणून जात आहे. त्यामुळे आयएएस अधिकारीही पाणीनियोजनाबाबत जनजागृती करत आहेत. माझेही पाणीनियोजनाबाबत १० ते १२ परिसंवाद होतात. महाराष्ट्रातील पाणीटंचाई पाहता नियोजनाची सर्वाधिक गरज आहे.महोत्सवामुळे दलालदूर राहतात!खान्देशी महोत्सवामुळे खाद्यशेती उद्योगाला चालना मिळते. महोत्सवामुळे दलाल दूर राहत असल्याने शेतकºयांना अधिक नफा मिळवता येत आहे, असे पवार म्हणाले. तसेच शेतकºयांनी जोडधंदे सुरू करण्याची गरज असून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकºयांचे अनुकरण करण्याची गरज आहे. त्यामुळेच शेतकºयांच्या आत्महत्यांना आळा बसेल. इस्राएल आणि मॉरिशस या देशांतील शेती तंत्रज्ञान विकसित आहे. आपल्याकडेही ते विकसित केले पाहिजे, असे पवारम्हणाले.

टॅग्स :thaneठाणे