शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
2
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
3
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
4
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
5
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
6
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
7
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
8
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
9
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
10
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
11
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
12
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
13
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
14
'ही' आहेत भारतातील टॉप १० हिट गाणी, नंबर १ वाचून थक्क व्हाल!
15
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान
16
कोण आहे मिस्ट्री गर्ल?; सोनमशी होते कनेक्शन; राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण
17
सातपाटी किनाऱ्यावर १७ वर्षीय मुलाचा समुद्रात बुडून मृत्यू, पाच मित्र बचावले!
18
'खमेनी यांना काही झाले तर...', शियांच्या सर्वात मोठ्या धार्मिक नेत्याचा इराकमधून ट्रम्प यांना इशारा
19
बायको बॉयफ्रेंडसोबत पळाली, नवऱ्याने खाणं-पिणं केलं बंद, झाला मृत्यू; दीड महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
20
परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत...

राज्यात धरणांच्या उद्देशालाच फासला हरताळ, पोपटराव पवार यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 03:48 IST

राज्यात शेतीला पाणी पुरवण्यासाठी धरणे बांधण्यात आली; मात्र या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. धरणातील पाणी नागरीवस्तीला पुरवले जात आहे. सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

कल्याण - राज्यात शेतीला पाणी पुरवण्यासाठी धरणे बांधण्यात आली; मात्र या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. धरणातील पाणी नागरीवस्तीला पुरवले जात आहे. सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याचे नियोजन अत्यंत गरजेचे असून परदेशात माझ्या पाणीनियोजनाची दखल घेत आहेत. याउलट, आपल्या देशात स्थिती असल्याची खंत हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केली.उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळातर्फे कल्याणमध्ये आयोजित ग्लोबल खान्देश महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी पवार यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काढलेल्या ग्रंथदिंडीमध्ये खान्देशी पारंपरिक वेशभूषा करून महिला, मुले सहभागी झाली होती.रविवार, ३ फेबु्रवारीपर्यंत चालणारा हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे. या महोत्सवात हिवरे बाजारचा कायापालट करणारे पोपटराव पवार यांचा ‘खान्देशभूषण’ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार नरेंद्र पवार, संस्थेचे अध्यक्ष विकास पाटील, ए.जी. पाटील, अनिल बोरनारे, आर.डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील धरणाचे पाणी आज शहराकडे वळले आहे. मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे येथील लोकवस्तीला धरणातील अर्धे पाणी खर्च होत आहे. पाण्याचे जतन करून ते जपून वापरले पाहिजे. त्यासाठी नियोजन सांगण्यासाठी मी अनेक परदेश दौरे केले. तेथील नागरिक त्याचे अनुकरण करतात; मात्र आपल्याकडे त्याबाबत उदासीनता आहे. महाराष्ट्रात पाणी फाउंडेशनचे काम सुरू झाले आहे. सचिन तेंडुलकर, आमीर खान यांनीही पाणीबचतीसाठी काम सुरू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना आणली. हे सर्व प्रयत्न कौतुकास्पदच आहेत; मात्र शहरी भागाने पाणी वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उत्तर महाराष्ट्रात बोअरवेल १५०० फुटांच्या खाली गेल्या आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात जलसंधारणाची कामे करण्याची गरज आहे. शहरातील कॉर्पोरेट कंपन्यांनी आपला सीएसआर निधी ग्रामीण भागाकडे वळवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.पवार म्हणाले की, आमच्या हिवरे गावास दरवर्षी ७०० ते ८०० लोक भेट देतात. परदेशी लोकही येतात. मसुरीला एक संस्था आयएएस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असते. त्याठिकाणी मी १५ वर्षांपासून अतिथी व्याख्याता म्हणून जात आहे. त्यामुळे आयएएस अधिकारीही पाणीनियोजनाबाबत जनजागृती करत आहेत. माझेही पाणीनियोजनाबाबत १० ते १२ परिसंवाद होतात. महाराष्ट्रातील पाणीटंचाई पाहता नियोजनाची सर्वाधिक गरज आहे.महोत्सवामुळे दलालदूर राहतात!खान्देशी महोत्सवामुळे खाद्यशेती उद्योगाला चालना मिळते. महोत्सवामुळे दलाल दूर राहत असल्याने शेतकºयांना अधिक नफा मिळवता येत आहे, असे पवार म्हणाले. तसेच शेतकºयांनी जोडधंदे सुरू करण्याची गरज असून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकºयांचे अनुकरण करण्याची गरज आहे. त्यामुळेच शेतकºयांच्या आत्महत्यांना आळा बसेल. इस्राएल आणि मॉरिशस या देशांतील शेती तंत्रज्ञान विकसित आहे. आपल्याकडेही ते विकसित केले पाहिजे, असे पवारम्हणाले.

टॅग्स :thaneठाणे