शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; कोण मारणार बाजी?
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
4
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
5
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
6
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
7
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
8
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
9
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
10
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
11
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
12
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
13
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
14
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
15
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
16
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
17
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
18
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
19
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
20
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात धरणांच्या उद्देशालाच फासला हरताळ, पोपटराव पवार यांची खंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 03:48 IST

राज्यात शेतीला पाणी पुरवण्यासाठी धरणे बांधण्यात आली; मात्र या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. धरणातील पाणी नागरीवस्तीला पुरवले जात आहे. सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.

कल्याण - राज्यात शेतीला पाणी पुरवण्यासाठी धरणे बांधण्यात आली; मात्र या उद्देशालाच हरताळ फासला जात आहे. धरणातील पाणी नागरीवस्तीला पुरवले जात आहे. सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाण्याचे नियोजन अत्यंत गरजेचे असून परदेशात माझ्या पाणीनियोजनाची दखल घेत आहेत. याउलट, आपल्या देशात स्थिती असल्याची खंत हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी व्यक्त केली.उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळातर्फे कल्याणमध्ये आयोजित ग्लोबल खान्देश महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी पवार यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काढलेल्या ग्रंथदिंडीमध्ये खान्देशी पारंपरिक वेशभूषा करून महिला, मुले सहभागी झाली होती.रविवार, ३ फेबु्रवारीपर्यंत चालणारा हा महोत्सव सर्वांसाठी खुला आहे. या महोत्सवात हिवरे बाजारचा कायापालट करणारे पोपटराव पवार यांचा ‘खान्देशभूषण’ पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार नरेंद्र पवार, संस्थेचे अध्यक्ष विकास पाटील, ए.जी. पाटील, अनिल बोरनारे, आर.डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील धरणाचे पाणी आज शहराकडे वळले आहे. मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे येथील लोकवस्तीला धरणातील अर्धे पाणी खर्च होत आहे. पाण्याचे जतन करून ते जपून वापरले पाहिजे. त्यासाठी नियोजन सांगण्यासाठी मी अनेक परदेश दौरे केले. तेथील नागरिक त्याचे अनुकरण करतात; मात्र आपल्याकडे त्याबाबत उदासीनता आहे. महाराष्ट्रात पाणी फाउंडेशनचे काम सुरू झाले आहे. सचिन तेंडुलकर, आमीर खान यांनीही पाणीबचतीसाठी काम सुरू केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलयुक्त शिवार योजना आणली. हे सर्व प्रयत्न कौतुकास्पदच आहेत; मात्र शहरी भागाने पाणी वाचवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. उत्तर महाराष्ट्रात बोअरवेल १५०० फुटांच्या खाली गेल्या आहेत. त्यामुळे उत्तर महाराष्ट्रात जलसंधारणाची कामे करण्याची गरज आहे. शहरातील कॉर्पोरेट कंपन्यांनी आपला सीएसआर निधी ग्रामीण भागाकडे वळवण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.पवार म्हणाले की, आमच्या हिवरे गावास दरवर्षी ७०० ते ८०० लोक भेट देतात. परदेशी लोकही येतात. मसुरीला एक संस्था आयएएस अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत असते. त्याठिकाणी मी १५ वर्षांपासून अतिथी व्याख्याता म्हणून जात आहे. त्यामुळे आयएएस अधिकारीही पाणीनियोजनाबाबत जनजागृती करत आहेत. माझेही पाणीनियोजनाबाबत १० ते १२ परिसंवाद होतात. महाराष्ट्रातील पाणीटंचाई पाहता नियोजनाची सर्वाधिक गरज आहे.महोत्सवामुळे दलालदूर राहतात!खान्देशी महोत्सवामुळे खाद्यशेती उद्योगाला चालना मिळते. महोत्सवामुळे दलाल दूर राहत असल्याने शेतकºयांना अधिक नफा मिळवता येत आहे, असे पवार म्हणाले. तसेच शेतकºयांनी जोडधंदे सुरू करण्याची गरज असून पश्चिम महाराष्ट्रातील शेतकºयांचे अनुकरण करण्याची गरज आहे. त्यामुळेच शेतकºयांच्या आत्महत्यांना आळा बसेल. इस्राएल आणि मॉरिशस या देशांतील शेती तंत्रज्ञान विकसित आहे. आपल्याकडेही ते विकसित केले पाहिजे, असे पवारम्हणाले.

टॅग्स :thaneठाणे