शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

लोकसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादसही महायुतीचे मिशन ४५ प्लस; सुनिल तटकरे यांची माहिती

By जितेंद्र कालेकर | Updated: October 29, 2023 18:51 IST

मराठा आरक्षणाला संपूर्ण पाठिंबा

ठाणे: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप, शिवसेना (शिंदे गट) व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे तिन्ही पक्ष, महाराष्ट्रात मिशन ४५ प्लस ही मोहीम राबविणार आहे. तिन्ही पक्षाचे राज्य आणि केंद्रस्तरीय नेते महाराष्ट्रातील जागा वाटपाचा एकत्रित निर्णय घेतील. तसेच मराठा समाजाला कायद्याच्या आधारावर आरक्षण देण्यास संपूर्ण पाठिंबा असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी ठाण्यात रविवारी व्यक्त केले.

राष्ट्रवादीच्या मध्यवर्ती कार्यालयात कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी ते ठाण्यात आले होते. यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकतेर् मोठया प्रमाणात उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणुक तिन्ही पक्ष एकत्रित लढणार आहेत. योग्यवेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस व अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्यस्तरीय टीम, जसे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष म्हणून आपण स्वत:, केंद्रीय नेते प्रफुल्ल पटेल तसेच दोन्ही पक्षातील केंद्रस्तरीय नेते हे एकत्रित बसून महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागेबाबत निर्णय घेतील. दिवाळीपूर्वी आपण स्वत: तर दिवाळीनंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यातून जनतेशी संवाद साधला जाणार आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. कायद्याच्या कक्षात, न्यायालयीन निर्णयाच्या आधारावर आरक्षण मिळायलाच हवे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या व तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकारमध्ये मी मंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले होते. तसेच अल्पसंख्याक समाजालाही ५ टक्के आरक्षण दिले होते. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या घटनात्मक बाबींवर हे आरक्षण टीकले नाही, नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली राणे समितीने संपूर्ण राज्यातील मराठा समाजाची सांख्यिकी माहिती जमा केली होती. यानंतर देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे सरकारनेही आरक्षणासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. आजही जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या मागणीला जाहीर पाठिंबा आहे. इतरही समाजाची आरक्षणाची मागणी आहे. त्याचेही आम्ही समर्थन करतो, असेही तटकरे यांनी सांगितले.

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसlok sabhaलोकसभा