शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

मीरारोड : चेणे नदीवर होणार ३ बंधारे ; ३ दशलक्ष लिटर मिळणार पाणी 

By धीरज परब | Updated: April 5, 2023 15:22 IST

मीरा भाईंदर पालिकेसाठी पाण्याचा स्वतःचा स्तोत्र निर्माण करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.

मीरारोड -  घोडबंदर मार्गावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे चेणे येथील लक्ष्मी नदीचे पाणी ३ बंधारे बांधून अडवण्याचे व पाण्याची टाकी बांधून त्या पाण्याचा उपयोग परिसरातील नागरिकांसाठी करण्याच्या कामाचे भूमिपूजन मंगळवारी करण्यात आले. मीरा भाईंदर पालिकेसाठी पाण्याचा स्वतःचा स्तोत्र निर्माण करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगरां मधून येणारी लक्ष्मी नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहते. पावसाचे पाणी हे नजीकच्या खाडी व समुद्रात वाहून वाया जाते. सदर पाणी अडवून त्याचा वापर परिसरातील नागरिकांना व्हावा अशी मागणी त्यांनी राज्य शासनाकडे चालवली होती. याबाबत मंत्र्यांकडे ३ वेळा बैठका झाल्या. अखेर कोल्हापुर पॅटर्न प्रमाणे  ३ सिमेंट गेटेड  काँक्रिट बंधारे मंजूर करण्यात आले. वन विभागाने प्रशासकीय मान्यता दिली. जल संधारण विभाग हे काम करणार आहे. सुमारे १ कोटी ६२ लाख खर्च येणार आहे. 

सदर पाणी पुरवठा योजनेसाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव महापालिकेने ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. भूसंपादन पूर्ण करून तेथे पाण्याची टाकी व वितरण व्यवस्था तयार केली जाईल. टाकी व पंप रुम आदींसाठी पालिका अडीज कोटी खर्च करणार आहे. बंधाऱ्यात अडवलेले पाणी आजूबाजूच्या लोकांना दिले जाणार आहे. 

आमदार प्रताप सरनाईक, महापालिका आयुक्त दिलीप ढोलेजल संधारण विभागाचे मिलिंद पालवे आदींच्या हस्ते कामाचे भूमिपूजन झाले. यावेळी शहर अभियंता दिपक खांबित, शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर, उत्तर प्रदेश संपर्क प्रमुख विक्रमप्रताप सिंह आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. ६ महिन्यात ही कामे पूर्ण करून ३ दशलक्ष लिटर पाणी आसपासचे आदिवासीभूमिपुत्र शेतकरी यांना मिळणार आहे . बंधाऱ्यां मुळे जंगलातील वन्यजीवांना पाण्यासाठी नागरी भागात भटकावे लागणार नाही असे आ. सरनाईक यांनी सांगितले . 

पर्यटन व रोजगाराच्या अनुषंगाने लक्ष्मी नदी किनारा विकास करण्याची संकल्पना आहे. चेणे पूल पासून ते येऊर डोंगरा पर्यंत रिव्हर फ्रंट योजना आहे. यासाठी सल्लागार कंपनीने डिजाईन तयार केले आहे. एकूण १०० कोटींचा प्रकल्प आहे. त्यातील ५० कोटी राज्य सरकारने मंजूर केले आहेत. नदी किनारी उद्यान आदी विकसित केले जाईल.  रिव्हर फ्रंट विकासचे काम पावसाळ्यानंतर सुरु होईल अशी माहिती आ.  सरनाईक यांनी दिली. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरpratap sarnaikप्रताप सरनाईक