शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

मीरारोड : चेणे नदीवर होणार ३ बंधारे ; ३ दशलक्ष लिटर मिळणार पाणी 

By धीरज परब | Updated: April 5, 2023 15:22 IST

मीरा भाईंदर पालिकेसाठी पाण्याचा स्वतःचा स्तोत्र निर्माण करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.

मीरारोड -  घोडबंदर मार्गावर पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात वाहून जाणारे चेणे येथील लक्ष्मी नदीचे पाणी ३ बंधारे बांधून अडवण्याचे व पाण्याची टाकी बांधून त्या पाण्याचा उपयोग परिसरातील नागरिकांसाठी करण्याच्या कामाचे भूमिपूजन मंगळवारी करण्यात आले. मीरा भाईंदर पालिकेसाठी पाण्याचा स्वतःचा स्तोत्र निर्माण करण्याचा हा पहिलाच प्रयत्न आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या डोंगरां मधून येणारी लक्ष्मी नदी पावसाळ्यात दुथडी भरून वाहते. पावसाचे पाणी हे नजीकच्या खाडी व समुद्रात वाहून वाया जाते. सदर पाणी अडवून त्याचा वापर परिसरातील नागरिकांना व्हावा अशी मागणी त्यांनी राज्य शासनाकडे चालवली होती. याबाबत मंत्र्यांकडे ३ वेळा बैठका झाल्या. अखेर कोल्हापुर पॅटर्न प्रमाणे  ३ सिमेंट गेटेड  काँक्रिट बंधारे मंजूर करण्यात आले. वन विभागाने प्रशासकीय मान्यता दिली. जल संधारण विभाग हे काम करणार आहे. सुमारे १ कोटी ६२ लाख खर्च येणार आहे. 

सदर पाणी पुरवठा योजनेसाठी जागा आरक्षित करण्याचा प्रस्ताव महापालिकेने ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. भूसंपादन पूर्ण करून तेथे पाण्याची टाकी व वितरण व्यवस्था तयार केली जाईल. टाकी व पंप रुम आदींसाठी पालिका अडीज कोटी खर्च करणार आहे. बंधाऱ्यात अडवलेले पाणी आजूबाजूच्या लोकांना दिले जाणार आहे. 

आमदार प्रताप सरनाईक, महापालिका आयुक्त दिलीप ढोलेजल संधारण विभागाचे मिलिंद पालवे आदींच्या हस्ते कामाचे भूमिपूजन झाले. यावेळी शहर अभियंता दिपक खांबित, शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर, उत्तर प्रदेश संपर्क प्रमुख विक्रमप्रताप सिंह आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. ६ महिन्यात ही कामे पूर्ण करून ३ दशलक्ष लिटर पाणी आसपासचे आदिवासीभूमिपुत्र शेतकरी यांना मिळणार आहे . बंधाऱ्यां मुळे जंगलातील वन्यजीवांना पाण्यासाठी नागरी भागात भटकावे लागणार नाही असे आ. सरनाईक यांनी सांगितले . 

पर्यटन व रोजगाराच्या अनुषंगाने लक्ष्मी नदी किनारा विकास करण्याची संकल्पना आहे. चेणे पूल पासून ते येऊर डोंगरा पर्यंत रिव्हर फ्रंट योजना आहे. यासाठी सल्लागार कंपनीने डिजाईन तयार केले आहे. एकूण १०० कोटींचा प्रकल्प आहे. त्यातील ५० कोटी राज्य सरकारने मंजूर केले आहेत. नदी किनारी उद्यान आदी विकसित केले जाईल.  रिव्हर फ्रंट विकासचे काम पावसाळ्यानंतर सुरु होईल अशी माहिती आ.  सरनाईक यांनी दिली. 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरpratap sarnaikप्रताप सरनाईक