शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदरमध्ये दुकानात शुकशुकाट, फेरीवाल्यांची मात्र दिवाळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 00:45 IST

मीरा भाईंदर शहरातील बहुसंख्य लोकवस्ती सर्वसामान्य  वर्गाची आहे. यातच, शहरात फळ - भाजी विक्रेत्या फेरीवाल्यांसोबतच कपडे, चादरी, चप्पल, स्टेशनरीपासून बहुतांश गृहोपयोगी वस्तूंची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांची संख्याही प्रचंड वाढली आहे.

मीरा रोड - मीरा भाईंदरमध्ये मुख्य रस्त्यांवर असलेल्या दुकानांमध्ये शुकशुकाट असताना दुसरीकडे फेरीवाल्यांकडे मात्र खरेदीसाठी मोठी गर्दी होत असल्याने दुकानदार हवालदिल झाले आहेत. दुकानाचे भाडे, खर्च , पगार भागवायचा तरी कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मीरा भाईंदर शहरातील बहुसंख्य लोकवस्ती सर्वसामान्य  वर्गाची आहे. यातच, शहरात फळ - भाजी विक्रेत्या फेरीवाल्यांसोबतच कपडे, चादरी, चप्पल, स्टेशनरीपासून बहुतांश गृहोपयोगी वस्तूंची विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांची संख्याही प्रचंड वाढली आहे. शिवाय भाईंदरमध्ये बेकायदेशीरपणे भरणारा रविवार बाजार आणि सोमवार बाजार रहदारी व वाहतुकीला प्रचंड अडथळा ठरूनही महापालिका आणि नगरसेवक मात्र कारवाई ऐवजी संरक्षण देत आहेत. 

वाढत्या फेरीवाल्यांच्या जाचा मुळे केवळ रहदारी व वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली नसून मुख्य रस्त्यांवरील दुकानदारांनासुद्धा यंदा मोठा फटका बसल्याचे समोर आले आहे. कोरोना संसर्गामुळे लॉक डाऊन आणि बिघडलेले आर्थिक गणित पाहता यंदा दिवाळी चांगली जाईल अशी आशा दुकानदार बाळगून बसले होते. परंतु फेरीवाल्यां मुळे दुकानदारांच्या आशा धुळीस मिळाल्या. 

दिवाळी सणात दुकानात अपेक्षे प्रमाणे फारसे ग्राहक वळलेच नाहीत. दुकाने ओस तर फेरीवाल्यांकडे मात्र रस्त्यांवर खरेदीसाठी मोठी गर्दी होती. काहींची दुकाने मालकीची आहेत त्यांना भाडे भरायची गरज नसली तरी बहुसंख्य दुकानदार भाड्याने दुकाने घेऊन व्यवसाय करत आहेत. भाडे भरण्यासह दुकानांचा खर्च, कर्मचाऱ्यांचा पगार आदी विचारात घेता त्या तुलनेत व्यवसाय होत नाही. 

लोकांना फेरीवाल्यांकडे खरेदी करणे स्वस्त वाटत असल्याने दुकानांकडे ते वळत नाहीत. फेरीवाल्यांना दुकानदारांसारखा खर्च नसतो शिवाय लोक वस्तू चांगली निघाली नाही तरी फेरीवल्याकडे तिचा परतावा मागण्यास जात नाहीत, असे नंदकिशोर बडगुजर म्हणाले. 

भाड्याच्या दुकानात कपड्याचा व्यवसाय करणारे एस बाबूजी म्हणाले, दुकान भाड्याने घेऊन कायदेशीर व्यवसाय करणाऱ्यांना कोणी वाली राहिलेला नाही. माफक दरातले कपडे असूनदेखील फेरीवाल्यां मुळे आमचा व्यवसाय होत नाही. मग दुकान थाटण्या पेक्षा महापालिका, राजकारणी आदींना हप्ता देऊन फेरीवाला व्हायचे का? असा प्रश्नही त्यांनी केला.

 

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदरMarketबाजार