शहरं
Join us  
Trending Stories
1
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
2
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
3
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
4
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
5
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
6
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
7
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
8
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
9
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
10
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
11
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
12
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
13
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
14
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
15
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
16
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
17
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
18
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
19
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
20
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  

मीरा-भाईंदरला फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाचा विळखा; कोरोना संसर्ग वाढण्याची भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 14:38 IST

 महापालिका प्रशासनासह नगरसेवक -  राजकारणी मात्र चिडीचूप 

मीरा रोड: कोरोना संसर्ग रोखण्यासाठीचे निर्बंध शिथिल होत नाही तोच मीरा भाईंदर मधील रस्ते पदपथांवर फेरीवाल्यांचा विळखा पडला आहे. जेणे करून गर्दी उसळत असून अनेकजण मास्क न घालताच वावरत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे.  नागरिकांना चालणे त्रासाचे झाले असून वाहतुकीची कोंडी होत आहे. परंतु महापालिका प्रशासनासह नगरसेवक मात्र या गंभीर बाबीकडे डोळेझाक करत असल्याचं चित्र आहे.

मीरा-भाईंदर शहरातील गल्लीबोळात पासून मुख्य रस्ते व पदपथ हे फेरीवाल्यांच्या अतिक्रमणाने व्यापलेले आहेत. दिवसेंदिवस शहरातील फेरीवाल्यांची संख्या सपाट्याने वाढलेली आहे. महापालिकेच्या ना फेरीवाला क्षेत्रात तर पालिकेच्या नाकावर टिच्चून सर्रास फेरीवाले रस्ता पदपथ अडवून बसलेले आहेत. 

मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे स्थानक बाहेरील परिसरात १५० मीटर तर रुग्णालय, शैक्षणिक संकुल, धार्मिक स्थळ पासून १०० मीटर अंतराच्या परिक्षेत्रात फेरीवाल्यांना बसण्यास मनाई केलेली आहे. फेरीवाल्यांनी रस्ते पदपथ व्यापल्या ने सर्वसामान्य नागरिकांना रहदारीला प्रचंड अडथळा येतो व फेरीवाल्यांच्या त्रास सहन करावा लागतो. फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे वाहतूक सुद्धा विस्कळीत होऊन वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार नेहमीचे झाले आहेत.

मीरा-भाईंदर महापालिकेकडून मात्र रस्ते - पदपथ व्यापून बसलेल्या या फेरीवाल्यांना पाठीशी घातले जाते. महापालिकेचे फेरीवाला पथक तसेच प्रभाग अधिकारी आदींकडून सुद्धा फेरीवाल्यांवर ठोस कारवाई केली जात नाही. नगरसेवक, राजकारणी  ह्या बेकायदेशीर फेरीवाल्यांच्या विरोधात ठोस भूमिका घेत नाहीत. बाजार वसुली करणाऱ्या ठेकेदाराची वसुली मात्र फेरीवाल्यांच्या वाढत्या संख्येनुसार झपाट्याने वाढत आहे. फेरीवाल्यांना पाठीशी घालण्यामागे हप्तेखोरी हे सर्वात मोठे कारण असल्याचे आरोप सातत्याने होत आले आहेत. 

कोरोनाचा संसर्ग सध्या काही प्रमाणात कमी झाल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. परंतु त्यामुळे शहरातील रस्ते - पदपथ हे पुन्हा फेरीवाल्यांच्या विळख्यात सापडले आहेत. कोरुना संसर्ग पसरू नये म्हणून मास्क घालणे, गर्दी टाळणे आधी नियमांचे पालन काटेकोरपणे करणे आवश्यकता असताना त्याचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. 

अनेक फेरीवाले मास्क न घालताच व्यवसाय करत आहेत. शिवाय फेरीवाल्यांची आणि ग्राहकांची खरेदीसाठी होत असलेली प्रचंड गर्दी पाहता कोरोनाचा संसर्ग पसरण्याची भीती यानिमित्ताने व्यक्त होत आहे.  फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे नागरिकांना चालणे जिकरीचे बनले असून वाहतुकीची कोंडी वाढून ध्वनी व वायू प्रदूषण वाढले आहे. 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक