शहरं
Join us  
Trending Stories
1
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
2
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
3
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
4
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
5
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
6
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
7
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
8
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
9
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
10
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
11
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
12
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
13
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप
14
भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... 
15
Sleep Tourism : नव्या ट्रेंडची भुरळ! फक्त शांत झोपेसाठी लोक करताहेत लांबचा प्रवास; काय आहे स्लीप टूरिझ्म?
16
अष्टमीच्या नैवेद्याला कांदा, लसूण न घालता करा काळ्या वाटण्याची चमचमीत उसळ, पुऱ्या आणि शिरा; खास टिप्स!
17
'सैयारा'नंतर अहान पांडेला लागला मोठा जॅकपॉट, दोन दिग्गज दिग्दर्शकाच्या सिनेमात लागली वर्णी
18
Tamil Nadu Stampede : "माझ्या डोळ्यांसमोरच जमावाने आईला चिरडलं, मी मदतीसाठी..."; महिलेने सांगितलं काय घडलं?
19
टीम इंडियाची ट्रॉफी पाकिस्तानच्या मोहसिन नक्वी यांनी चोरली; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस
20
५० रुपये प्रति तास या हिशोबाने भाड्याने मिळतायेत 'Friend'; केरळमधील अजब ट्रेंडनं वाढवलं टेन्शन

मीरा भाईंदरमध्ये मीटर प्रमाणे भाडे नाकारणाऱ्या, जास्त भाडे घेणाऱ्या रिक्षा चालकांवर वाहतूक पोलीस व आरटीओची धडक कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 08:54 IST

Police, RTO Action On Rikshaw Drivers रिक्षा चालकाने मीटर प्रमाणे भाडे नाकारले वा जास्त भाडे मागितले तर थेट वाहतूक पोलिस किंवा स्थानिक पोलिसां कडे तक्रार करण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे . 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - भाईंदर मध्ये रिक्षा चालक मीटर प्रमाणे भाडे नाकारून मनमानी भाडे वसूल करत असल्याचे वृत्त लोकमत ने दिल्या नंतर वाहतूक पोलीस आणि आरटीओ ने तीन दिवसात तब्बल २४५ रिक्षांवर कारवाई केली . रिक्षा चालकाने मीटर प्रमाणे भाडे नाकारले वा जास्त भाडे मागितले तर थेट वाहतूक पोलिस किंवा स्थानिक पोलिसां कडे तक्रार करण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे . 

 

भाईंदर मध्ये मीटर प्रमाणे भाडे आकारणे कायद्याने बंधनकारक आहे . तरी देखील रिक्षा चालक मीटर प्रमाणे भाडे नेण्यास नकार देतात . तसेच मनमर्जी नुसार अवास्तव भाडे सांगतात . प्रवाशांची अडवणूक करून त्यांची लूट करणाऱ्या रिक्षा चालकां विरुद्ध संताप व्यक्त होत होता . शेअर भाडे मंजूर असले तरी त्यात देखील जास्त भाडे घेतात . 

 

या बाबतचे वृत्त लोकमत ने दिल्या नंतर मीरा भाईंदर - वसई विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते ह्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली . दाते ह्यांनी आदेश दिल्या नंतर वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक शेखर डोंबे सह वाहतूक पोलीस आणि आरटीओ ह्यांनी शहरात ६ ते ८ ऑक्टॉबर असे तीन दिवस कारवाईची विशेष मोहीम राबवली . 

 

ह्या तीन दिवसात पोलिसांनी भाईंदर पूर्व व पश्चिम , काशिमीरा नाका , सावरकर चौक ( गोल्डन नेस्ट ) आदी ठिकठिकाणी नाकाबंदी करून तपासणी केली .  मीटर प्रमाणे रिक्षा भाडे नाकारणे  , जास्त भाडे घेणे , विना परवाना रिक्षा - टॅक्सी चालवणे , अवैद्य प्रवासी वाहतूक , बेशिस्त वाहन चालक, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे आदी प्रकरणी तीन दिवसात एकूण १३०४ केस करण्यात आल्या . त्या मध्ये २४५ रिक्षांवर कारवाई केली गेली . 

६ रोजी भाईंदर पूर्व व पश्चिम भागात ८५ रिक्षा व इतर वाहने मिळून  ४४५ केस केल्या . ७ रोजी काशिमीरा नाका येथे ६१ रिक्षांवर कारवाई करून ४२५  केस केल्या . तर ८ ऑक्टॉबर रोजी भाईंदर पूर्व - पश्चिम, सावरकर चौक (गोल्डन नेस्ट) व  काशिमीरा नाका येथे ९९ रिक्षां सह ४३४ केस करण्यात आल्या 

 

पोलीस आणि आरटीओ ची कारवाई शहरात सुरूच राहणार असून रिक्षा चालकांनी मीटर प्रमाणे भाडे नाकारू नये आणि जास्त भाडे घेऊ नये अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा डोंबे ह्यांनी दिला आहे . नागरिकांनी देखील मीटर प्रमाणे भाडे नाकारणाऱ्या, जास्त भाडे मागणाऱ्या रिक्षा - टॅक्सी चालकांची तक्रार स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसां कडे करावी असे आवाहन डोंबे ह्यांनी केले आहे . पोलीस कारवाईचे नागरिकां कडून स्वागत होत असून कारवाईत सातत्य असावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे . 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसMira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिस