शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA: भारताला मोठा धक्का! शुबमन गिल दुसऱ्या कसोटीतून बाहेर, अनुभवी खेळाडूला कर्णधारपद
2
भारतीय नौदलाची INS सुकन्या अन् पाकिस्तानचं PNS सैफ युद्धनौका समोरासमोर, त्यानंतर...
3
कोलकाताला भूकंपाचे हादरे, ५.२ रिश्टर स्केलची तीव्रता, लोक घाबरून घराबाहेर पडले...
4
दिल्ली ब्लास्ट: जहाल भाषणे, बाँब बनवण्याचे धडे... अटक केलेल्या दहशतवाद्यांच्या फोनमध्ये काय काय सापडले?
5
Anil Ambani Stocks: अनिल अंबानींच्या कंपन्यांच्या शेअर्सची बिकट स्थिती, ६०% पेक्षा अधिक आपटले; तुमच्याकडे आहेत का?
6
'माफियांचा खरा चेहरा...', दिव्या खोसला कुमारने मुकेश भट यांच्यासोबतचं कॉल रेकॉर्डिंग केलं लीक
7
मुंबई महानगरपालिकेत भाजपा मुसंडी मारणार? १००हून अधिक जागा जिंकणार, अंतर्गत सर्व्हेतून दावा
8
IND vs SA 2nd Test : MS धोनीच्या एलिट क्लबमध्ये सामील होणार रिषभ पंत! जाणून घ्या त्याचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड!
9
पगार मिळताच अकाउंट होते खाली? '५०-३०-२०' नियमाचा वापर करून ६ महिन्यांत फरक पाहा
10
"मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही, आमचा निर्णय..."; नेते संदीप देशपांडेंनी मांडली स्पष्ट भूमिका
11
नोटांचे बंडल, सोन्याचे दागिने...; बंगाल, झारखंडमध्ये कोळसा व्यापाऱ्यांच्या घरांवर ईडीचे छापे
12
"सुनील तटकरे लवकरच भाजपमध्ये जातील, हे त्रिवार सत्य आहे", एकनाथ शिंदेंच्या नेत्याचा खळबळजनक दावा
13
खेडमध्ये वैभव खेडेकरांच्या पदरी निराशा; पत्नीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आली वेळ, काय घडलं?
14
"देवाच्या कृपेने वाचलो...", बिग बॉस विजेत्या शिव ठाकरेच्या घरी लागलेल्या आगीत ट्रॉफीही जळाल्या
15
वाद चिघळणार! ठाण्यात शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण; भाजपाच्या माजी नगरसेवकावर आरोप
16
Spiritual: आयुष्याच्या अखेरीस प्रत्येकाची पडते शनी महाराजांशी गाठ; मार्गशीर्षात करा 'हे' बदल!
17
अल फलाह विद्यापीठाचे पुढे काय होणार? डॉक्टरकीचं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला!
18
जपानवर मोठे आर्थिक संकट? ३० वर्षांचा 'येन कॅरी ट्रेड' मोडीत; जागतिक बाजारात मोठा उलटाफेर होण्याची भीती!
19
TATA ची 'ही' कंपनी ५० टक्के कर्मचाऱ्यांची कपात करणार, यापूर्वी TCS मधून १२ हजार कर्मचाऱ्यांना दिलेला नारळ
20
मतविभाजनाची भीती! ठाकरे गटाकडून काँग्रेसची मनधरणी, बड्या नेत्याची वर्षा गायकवाडांशी चर्चा 
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदरमध्ये मीटर प्रमाणे भाडे नाकारणाऱ्या, जास्त भाडे घेणाऱ्या रिक्षा चालकांवर वाहतूक पोलीस व आरटीओची धडक कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 08:54 IST

Police, RTO Action On Rikshaw Drivers रिक्षा चालकाने मीटर प्रमाणे भाडे नाकारले वा जास्त भाडे मागितले तर थेट वाहतूक पोलिस किंवा स्थानिक पोलिसां कडे तक्रार करण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे . 

लोकमत न्यूज नेटवर्क 

मीरारोड - भाईंदर मध्ये रिक्षा चालक मीटर प्रमाणे भाडे नाकारून मनमानी भाडे वसूल करत असल्याचे वृत्त लोकमत ने दिल्या नंतर वाहतूक पोलीस आणि आरटीओ ने तीन दिवसात तब्बल २४५ रिक्षांवर कारवाई केली . रिक्षा चालकाने मीटर प्रमाणे भाडे नाकारले वा जास्त भाडे मागितले तर थेट वाहतूक पोलिस किंवा स्थानिक पोलिसां कडे तक्रार करण्याचे आवाहन देखील पोलिसांनी केले आहे . 

 

भाईंदर मध्ये मीटर प्रमाणे भाडे आकारणे कायद्याने बंधनकारक आहे . तरी देखील रिक्षा चालक मीटर प्रमाणे भाडे नेण्यास नकार देतात . तसेच मनमर्जी नुसार अवास्तव भाडे सांगतात . प्रवाशांची अडवणूक करून त्यांची लूट करणाऱ्या रिक्षा चालकां विरुद्ध संताप व्यक्त होत होता . शेअर भाडे मंजूर असले तरी त्यात देखील जास्त भाडे घेतात . 

 

या बाबतचे वृत्त लोकमत ने दिल्या नंतर मीरा भाईंदर - वसई विरारचे पोलीस आयुक्त सदानंद दाते ह्यांनी त्याची गांभीर्याने दखल घेतली . दाते ह्यांनी आदेश दिल्या नंतर वाहतूक शाखेचे वरिष्ठ निरीक्षक शेखर डोंबे सह वाहतूक पोलीस आणि आरटीओ ह्यांनी शहरात ६ ते ८ ऑक्टॉबर असे तीन दिवस कारवाईची विशेष मोहीम राबवली . 

 

ह्या तीन दिवसात पोलिसांनी भाईंदर पूर्व व पश्चिम , काशिमीरा नाका , सावरकर चौक ( गोल्डन नेस्ट ) आदी ठिकठिकाणी नाकाबंदी करून तपासणी केली .  मीटर प्रमाणे रिक्षा भाडे नाकारणे  , जास्त भाडे घेणे , विना परवाना रिक्षा - टॅक्सी चालवणे , अवैद्य प्रवासी वाहतूक , बेशिस्त वाहन चालक, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे आदी प्रकरणी तीन दिवसात एकूण १३०४ केस करण्यात आल्या . त्या मध्ये २४५ रिक्षांवर कारवाई केली गेली . 

६ रोजी भाईंदर पूर्व व पश्चिम भागात ८५ रिक्षा व इतर वाहने मिळून  ४४५ केस केल्या . ७ रोजी काशिमीरा नाका येथे ६१ रिक्षांवर कारवाई करून ४२५  केस केल्या . तर ८ ऑक्टॉबर रोजी भाईंदर पूर्व - पश्चिम, सावरकर चौक (गोल्डन नेस्ट) व  काशिमीरा नाका येथे ९९ रिक्षां सह ४३४ केस करण्यात आल्या 

 

पोलीस आणि आरटीओ ची कारवाई शहरात सुरूच राहणार असून रिक्षा चालकांनी मीटर प्रमाणे भाडे नाकारू नये आणि जास्त भाडे घेऊ नये अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा डोंबे ह्यांनी दिला आहे . नागरिकांनी देखील मीटर प्रमाणे भाडे नाकारणाऱ्या, जास्त भाडे मागणाऱ्या रिक्षा - टॅक्सी चालकांची तक्रार स्थानिक पोलीस आणि वाहतूक पोलिसां कडे करावी असे आवाहन डोंबे ह्यांनी केले आहे . पोलीस कारवाईचे नागरिकां कडून स्वागत होत असून कारवाईत सातत्य असावे अशी अपेक्षा व्यक्त केली आहे . 

 

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसMira Bhayanderमीरा-भाईंदरPoliceपोलिस