शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
रशिया अन् युक्रेनमध्ये युद्धबंदी होणार! १५ मे रोजी इस्तंबूलमध्ये मोठी बैठक; पुतिन यांनी झेलेन्स्कींना निमंत्रण पाठवले
3
बलुचिस्तानमध्ये बीएलएने पाकिस्तानी सैन्याला पळवले; सरकारी आस्थापन, पोलिसांवर हल्ले
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:आज अचानक धनलाभ संभवतो; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
"चितेच्या राखेत जग सिंदूर मागत आहे"; पहलगाम हल्ल्यानंतर १९ दिवसांनी बिग बींनी सोडलं मौन, काय म्हणाले?
6
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
7
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
8
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
9
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
10
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
11
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
12
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
13
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
14
राजस्थानच्या सीमाभागात लोक २ दिवस जागेच; २ जिल्ह्यांत ब्लॅकआउट, लोकांना घरात राहायच्या सूचना
15
ऑपरेशन सिंदूर: १९७१ नंतर प्रथमच तिन्ही सैन्यदलांनी पाकिस्तानला घडवली चांगलीच अद्दल
16
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
17
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
18
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
19
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
20
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा

मीरा-भार्इंदरची २० टक्के पाणीकपात रद्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2019 01:10 IST

मीराभाईंदर शहरासाठी मंजूर असलेल्या ७५ दशलक्ष लीटर पाणी योजनेतील ४० दशलक्ष लीटरच पाणी शहराला मिळत असल्याने उर्वरीत ३५ दशलक्ष लीटर पाणी १० जुलैपासून देण्याचा निर्णय उद्योगमंत्री सुभाष देसाई व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या संयुक्त बैठकीत झाल्याची माहिती महापौर डिंपल मेहता व आ. नरेंद्र मेहता यांनी दिली.

मीरारोड - मीराभाईंदर शहरासाठी मंजूर असलेल्या ७५ दशलक्ष लीटर पाणी योजनेतील ४० दशलक्ष लीटरच पाणी शहराला मिळत असल्याने उर्वरीत ३५ दशलक्ष लीटर पाणी १० जुलैपासून देण्याचा निर्णय उद्योगमंत्री सुभाष देसाई व जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्या संयुक्त बैठकीत झाल्याची माहिती महापौर डिंपल मेहता व आ. नरेंद्र मेहता यांनी दिली. या शिवाय जुलै पासून २० टक्के पाणीकपात रद्द केली जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.शहराच्या वाढत्या लोकसंख्येनुसार पाण्याची तीव्र टंचाई असल्याने नवीन नळजोडण्या देणे बंद करण्यात आले होते. काँग्रेस आघाडी शासनात उद्योगमंत्री असताना नारायण राणे यांनी एमआयडीसीच्या कोट्यातून मीरा भार्इंदर करीता ७५ दशलक्ष लीटर पाणी राखीव ठेवले होते. भाजप-सेना युती शासन काळात योजना पूर्ण होऊन २०१७ पासून एमआयडीसीचे ७५ पैकी ४० दशलक्ष लीटर पाणी मिळू लागले. त्यामुळे नळजोडण्या देण्यास पुन्हा सुरुवात करण्यात आली.परंतु उर्वरीत ३५ दशलक्ष लीटर पाणी बारवी धरणाची उंची वाढल्यानंतर पुनर्वसन आदी मुद्द्यांमुळे मिळत नव्हते. पुनर्वसनाचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. त्यामुळे पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी आ. मेहतांनी उद्योगमंत्री व जलसंपदामंत्री यांची संयुक्त बैठक घेण्याची विनंती केली होती. मंगळवारी देसाई व महाजन यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. आ. मेहतांसह महापौर डिंपल मेहता, आयुक्त बालाजी खतगावकर, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे आदी उपस्थित होते. महापौर व आमदार यांनी देसाई व महाजन यांचे आभार मानले आहेत.

टॅग्स :Mira Bhayanderमीरा-भाईंदर