शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

उल्हासनगरातील जीन्स कारखानदारांना राज्यमंत्र्यांचा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 16:55 IST

उल्हासनगर : जीन्स कारखानदारांची चालिया हॉल येथे बैठक घेऊन १५ दिवसांत तोडगा काढण्याचा दिलासा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला.

उल्हासनगर : जीन्स कारखानदारांची चालिया हॉल येथे बैठक घेऊन १५ दिवसांत तोडगा काढण्याचा दिलासा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला. तर नोव्हेंबरमध्ये शिवसेनेने जीन्स कारखानदारांची बैठक घेऊन दिलासा देण्याचे आश्वासन दिले. तोच कित्ता भाजपाने गिरवून शिवसेनेवर कुरघोडी केलीे.शहरातील वालधुनी नदीला प्रदूषित केल्याचा ठपका सामाजिक संघटनेसह न्यायालयाने जीन्स कारखान्यावर ठेवला. सर्वाच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महापालिका व वीज मंडळाने कारखान्यांचे वीज व पाणीपुरवठा खंडित केला आहे. कारखाने गेल्या एका महिन्यांपासून बंद झाले असून हजारो कामगार बेकार होऊन त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले. जीन्स वॉश कारखाने बंद झाल्यावर, वालधुनी नदी स्वच्छ झाली का? असा प्रश्न जीन्स कारखानदारांनी केला आहे. कारखाने बंद असल्याने परिसरात अवकळा आली असून कारखानदार शिवसेना-भाजपच्या नेत्यांचे घराचे उंबरठे झिजवित असल्याचे चित्र आहे.गेल्या महिन्यात आमदार बालाजी किणीकर, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, जीन्स वॉश कारखाना संघटनेचे अध्यक्ष परशुराम पाटील यांच्या पुढाकाराने जीन्स वॉश कारखान्याची बैठक खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतली होती. खासदार श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर यांच्या मागणीनुसार पर्यावरण मंत्री रामदास कदम, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेटमंत्र्यांना बैठकीत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडे साकडे घातले होते. मुख्यमंत्र्यानी मुख्य सचिवांना स्थानिक जिल्हाधिकारी यांच्यासह प्रदूषण मंडळ, एमआयडीसी आदीची बैठक घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून, सर्वांचे लक्ष निर्णयाकडे लागले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर