शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

उल्हासनगरातील जीन्स कारखानदारांना राज्यमंत्र्यांचा दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2017 16:55 IST

उल्हासनगर : जीन्स कारखानदारांची चालिया हॉल येथे बैठक घेऊन १५ दिवसांत तोडगा काढण्याचा दिलासा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला.

उल्हासनगर : जीन्स कारखानदारांची चालिया हॉल येथे बैठक घेऊन १५ दिवसांत तोडगा काढण्याचा दिलासा राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिला. तर नोव्हेंबरमध्ये शिवसेनेने जीन्स कारखानदारांची बैठक घेऊन दिलासा देण्याचे आश्वासन दिले. तोच कित्ता भाजपाने गिरवून शिवसेनेवर कुरघोडी केलीे.शहरातील वालधुनी नदीला प्रदूषित केल्याचा ठपका सामाजिक संघटनेसह न्यायालयाने जीन्स कारखान्यावर ठेवला. सर्वाच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महापालिका व वीज मंडळाने कारखान्यांचे वीज व पाणीपुरवठा खंडित केला आहे. कारखाने गेल्या एका महिन्यांपासून बंद झाले असून हजारो कामगार बेकार होऊन त्यांचे कुटुंब रस्त्यावर आले. जीन्स वॉश कारखाने बंद झाल्यावर, वालधुनी नदी स्वच्छ झाली का? असा प्रश्न जीन्स कारखानदारांनी केला आहे. कारखाने बंद असल्याने परिसरात अवकळा आली असून कारखानदार शिवसेना-भाजपच्या नेत्यांचे घराचे उंबरठे झिजवित असल्याचे चित्र आहे.गेल्या महिन्यात आमदार बालाजी किणीकर, शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, जीन्स वॉश कारखाना संघटनेचे अध्यक्ष परशुराम पाटील यांच्या पुढाकाराने जीन्स वॉश कारखान्याची बैठक खासदार श्रीकांत शिंदे यांनी घेतली होती. खासदार श्रीकांत शिंदे, आमदार बालाजी किणीकर यांच्या मागणीनुसार पर्यावरण मंत्री रामदास कदम, उद्योगमंत्री सुभाष देसाई यांची भेट घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॅबिनेटमंत्र्यांना बैठकीत मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्याकडे साकडे घातले होते. मुख्यमंत्र्यानी मुख्य सचिवांना स्थानिक जिल्हाधिकारी यांच्यासह प्रदूषण मंडळ, एमआयडीसी आदीची बैठक घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून, सर्वांचे लक्ष निर्णयाकडे लागले आहे.

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर