शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

बदलापूर भुयारी गटार योजनेच्या कामाचा नगरविकास राज्यमंत्र्यांनी मागविला अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 19:05 IST

भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झालेले नसतांनाही या ठेकेदाराला 27 कोटी 90 लाखांचे बील अदा केला आहे.या योजनेच्या पूर्णत्वाचा दाखला जुन 2017 मध्ये शासनाने मागविला होता. मात्र योजनेच्या पूर्णत्वाचा दाखला दिलेला नासतांनाही पालिकेने त्या ठेकेदाराचे बील अदा करण्याची घाई केलेली आहे.या प्रकरणात नगरविकास राज्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

ठळक मुद्देकाम पूर्ण झालेले नसतांनाही ठेकेदाराला 27 कोटी 90 लाखांचे बील अदाकॅप्टन आशिष दामले यांनी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे तक्रारयोजनेच्या पूर्णत्वाचा दाखला नासतांनाही ठेकेदाराला बील अदा करण्याची घाई

बदलापूर - बदलापूर शहरातील भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झालेले नसतांनाही या ठेकेदाराला 27 कोटी 90 लाखांचे बील अदा केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात राष्ट्रावदीचे गटनेते कॅप्टन आशिष दामले यांनी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत शासनाने या भुयारी गटार योजनेच्या कामाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या भुयारी गटार योजनेच्या झालेल्या कामाचा सविस्तर अहवाल आयआयटीकडुन करण्यात आले होते. त्या अहवालातील तरतुदींकडे पालिकेने दुर्लक्ष करुन हे बील अदा केल्याचा आरोप दामले यांनी केला आहे.            कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेच्या भुयारी गटार योजनेचे काम 2010 मध्ये मंजुर करण्यात आले होते. 150 कोटींची ही योजना पूर्ण करित असतांना त्या योजनेवर तब्बल 225 कोटी रुपये खर्च करण्यात आला. येवढा मोठा खर्च होऊन देखील प्रत्यक्षात मात्र या याजनेचे काम अद्यापही अपूर्णच आहे. योजनेचा खर्च वाढत गेला असला तरी प्रत्यक्षात काम मात्र अपूर्णच ठेवण्यात आले. अनेक ठिकाणी अदयापही भुयारी गटाराचे पाईप टाकण्यात आलेले नाही. या योजनेच्या पूर्णत्वाचा दाखला जुन 2017 मध्ये शासनाने मागविला होता. मात्र योजनेच्या पूर्णत्वाचा दाखला दिलेला नासतांनाही पालिकेने त्या ठेकेदाराचे बील अदा करण्याची घाई केलेली आहे. या भुयारी गटार योजनेच्या कामाची तांत्रिक तपासणी आयआयटीकडुन करण्यात आली आहे. त्यात त्यांनी योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी काही सुचना देखील दिल्या आहेत. या सुचनांचे पालन करुन काम पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी ही पालिकेची आहे. मात्र पालिका प्रशासनाला काम करुन घेण्यापेक्षा त्या ठेकेदाराचे अकडलेले बील अदा करण्याची घाई सर्वाधिक होती. तब्बल 27 कोटी 90 लाखांचे बील अदा करुन पालिकेने ठेकेदाराला झुकते माप दिले आहे. भुयारी गटार योजनेचे काम करित असतांना ठेकेदाराने प्रत्येकवेळी कामात विलंब केला आहे. त्या बिलंबाचा आर्थिक लाभही मिळविला आहे. मुदत संपलेल्यावर प्रत्येकवेळी पालिकेकडुन मुदतवाढ मिळविण्याचा यशस्वी प्रय} या ठेकेदाराने केला आहे. 225 कोटी खर्च करुन देखील प्रत्यक्षात भुयारी गटार योजनेतुन मलनिस:रण प्रकल्पावर पाणीच जात नसल्याचे समोर आले आहे. हा प्रकार येवढय़ावरच थांबलेला नसुन शहरातील 70 टक्के जोडण्या अद्याप करुन घेण्यात आलेले नाही. त्यामुळे या योजनेचा लाभ अजुनही नागरिकांना मिळत नसल्याचा आरोप दामले यांनी केला आहे. शासनाने योजना पूर्णत्वाचा दाखला मागविलेला असतांनाही या ठेकेदाराला बील अदा करण्यात आले आहे. योजना पूर्ण झालेली नसतांना त्यांना बील अदा केलेच कसे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. शासनाच्या आदेशाचे विपर्यास करुन नियमबाह्य पध्दतीने कोटय़ावधीची बिले अदा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाची तक्रार नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांच्याकडे केली असुन त्यांनी या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले अहोत. त्यामुळे भुयारी गटार योजनेचे दिलेले बील हे प्रशासनाला अडचणीचे ठरत आहे. 

 ‘‘ योजनेचे काम पूर्ण नसतांनाही त्या ठेकेदाराला येवढी मोठी रक्कम अदा करणो हे चुकीचे आहे. ठेकेदाराकडुन काम पूर्ण करुन घेण्याची गरज होती. ते न करता बील अदा करण्याची घाई प्रशासनाने केली आहे. ठेकेदाराला संरक्षण देण्याचे काम पालिका प्रशासन करित आहे.     - कॅप्टन आशिष दामले. गटनेते, बदलापूर

‘‘ भुयारी गटार योजनेची कोणतीच चौकशी लावण्यात आलेली नाही. कामाचा अहवाल शासनाने मागविला असुन तो अहवाल आम्ही शासनाकडे पाठविला आहे. तसेच ठेकेदाराला त्याचे बील नियमानुसार अदा करण्यात आलेले आहे.     - प्रकाश बोरसे, मुख्याधिकार. कुळगांव-बदलापूर नगरपरिषद 

टॅग्स :thaneठाणेbadlapurबदलापूरState Governmentराज्य सरकार