शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

बदलापूर भुयारी गटार योजनेच्या कामाचा नगरविकास राज्यमंत्र्यांनी मागविला अहवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2017 19:05 IST

भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झालेले नसतांनाही या ठेकेदाराला 27 कोटी 90 लाखांचे बील अदा केला आहे.या योजनेच्या पूर्णत्वाचा दाखला जुन 2017 मध्ये शासनाने मागविला होता. मात्र योजनेच्या पूर्णत्वाचा दाखला दिलेला नासतांनाही पालिकेने त्या ठेकेदाराचे बील अदा करण्याची घाई केलेली आहे.या प्रकरणात नगरविकास राज्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे.

ठळक मुद्देकाम पूर्ण झालेले नसतांनाही ठेकेदाराला 27 कोटी 90 लाखांचे बील अदाकॅप्टन आशिष दामले यांनी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे तक्रारयोजनेच्या पूर्णत्वाचा दाखला नासतांनाही ठेकेदाराला बील अदा करण्याची घाई

बदलापूर - बदलापूर शहरातील भुयारी गटार योजनेचे काम पूर्ण झालेले नसतांनाही या ठेकेदाराला 27 कोटी 90 लाखांचे बील अदा केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात राष्ट्रावदीचे गटनेते कॅप्टन आशिष दामले यांनी नगरविकास राज्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीची दखल घेत शासनाने या भुयारी गटार योजनेच्या कामाचा सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. या भुयारी गटार योजनेच्या झालेल्या कामाचा सविस्तर अहवाल आयआयटीकडुन करण्यात आले होते. त्या अहवालातील तरतुदींकडे पालिकेने दुर्लक्ष करुन हे बील अदा केल्याचा आरोप दामले यांनी केला आहे.            कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेच्या भुयारी गटार योजनेचे काम 2010 मध्ये मंजुर करण्यात आले होते. 150 कोटींची ही योजना पूर्ण करित असतांना त्या योजनेवर तब्बल 225 कोटी रुपये खर्च करण्यात आला. येवढा मोठा खर्च होऊन देखील प्रत्यक्षात मात्र या याजनेचे काम अद्यापही अपूर्णच आहे. योजनेचा खर्च वाढत गेला असला तरी प्रत्यक्षात काम मात्र अपूर्णच ठेवण्यात आले. अनेक ठिकाणी अदयापही भुयारी गटाराचे पाईप टाकण्यात आलेले नाही. या योजनेच्या पूर्णत्वाचा दाखला जुन 2017 मध्ये शासनाने मागविला होता. मात्र योजनेच्या पूर्णत्वाचा दाखला दिलेला नासतांनाही पालिकेने त्या ठेकेदाराचे बील अदा करण्याची घाई केलेली आहे. या भुयारी गटार योजनेच्या कामाची तांत्रिक तपासणी आयआयटीकडुन करण्यात आली आहे. त्यात त्यांनी योजनेचे काम पूर्ण करण्यासाठी काही सुचना देखील दिल्या आहेत. या सुचनांचे पालन करुन काम पूर्ण करुन घेण्याची जबाबदारी ही पालिकेची आहे. मात्र पालिका प्रशासनाला काम करुन घेण्यापेक्षा त्या ठेकेदाराचे अकडलेले बील अदा करण्याची घाई सर्वाधिक होती. तब्बल 27 कोटी 90 लाखांचे बील अदा करुन पालिकेने ठेकेदाराला झुकते माप दिले आहे. भुयारी गटार योजनेचे काम करित असतांना ठेकेदाराने प्रत्येकवेळी कामात विलंब केला आहे. त्या बिलंबाचा आर्थिक लाभही मिळविला आहे. मुदत संपलेल्यावर प्रत्येकवेळी पालिकेकडुन मुदतवाढ मिळविण्याचा यशस्वी प्रय} या ठेकेदाराने केला आहे. 225 कोटी खर्च करुन देखील प्रत्यक्षात भुयारी गटार योजनेतुन मलनिस:रण प्रकल्पावर पाणीच जात नसल्याचे समोर आले आहे. हा प्रकार येवढय़ावरच थांबलेला नसुन शहरातील 70 टक्के जोडण्या अद्याप करुन घेण्यात आलेले नाही. त्यामुळे या योजनेचा लाभ अजुनही नागरिकांना मिळत नसल्याचा आरोप दामले यांनी केला आहे. शासनाने योजना पूर्णत्वाचा दाखला मागविलेला असतांनाही या ठेकेदाराला बील अदा करण्यात आले आहे. योजना पूर्ण झालेली नसतांना त्यांना बील अदा केलेच कसे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. शासनाच्या आदेशाचे विपर्यास करुन नियमबाह्य पध्दतीने कोटय़ावधीची बिले अदा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाची तक्रार नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजीत पाटील यांच्याकडे केली असुन त्यांनी या प्रकरणाची चौकशी करुन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले अहोत. त्यामुळे भुयारी गटार योजनेचे दिलेले बील हे प्रशासनाला अडचणीचे ठरत आहे. 

 ‘‘ योजनेचे काम पूर्ण नसतांनाही त्या ठेकेदाराला येवढी मोठी रक्कम अदा करणो हे चुकीचे आहे. ठेकेदाराकडुन काम पूर्ण करुन घेण्याची गरज होती. ते न करता बील अदा करण्याची घाई प्रशासनाने केली आहे. ठेकेदाराला संरक्षण देण्याचे काम पालिका प्रशासन करित आहे.     - कॅप्टन आशिष दामले. गटनेते, बदलापूर

‘‘ भुयारी गटार योजनेची कोणतीच चौकशी लावण्यात आलेली नाही. कामाचा अहवाल शासनाने मागविला असुन तो अहवाल आम्ही शासनाकडे पाठविला आहे. तसेच ठेकेदाराला त्याचे बील नियमानुसार अदा करण्यात आलेले आहे.     - प्रकाश बोरसे, मुख्याधिकार. कुळगांव-बदलापूर नगरपरिषद 

टॅग्स :thaneठाणेbadlapurबदलापूरState Governmentराज्य सरकार