शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

राज्यमंत्री चव्हाण यांनी केली भाजपा नगरसेवकांची कानउघाडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 05:44 IST

कार्यक्रमाची वेळ पाळा : रस्त्यावर फिरा, जनसंपर्क वाढवा

अनिकेत घमंडीडोंबिवली : केडीएमसी भाजपाचे कधी नव्हे ते ४२ नगरसेवक निवडून आले आहेत. ३० नगरसेवकांना पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. लोकांनी दिलेल्या संधीचे सोने करा, जनसंपर्क वाढवा, रस्त्यावर फिरा, नागरिकांशी चर्चा करा, लोकांना दिलेली वेळ पाळा, अशा शब्दांत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी नगरसेवकांची कानउघाडणी केली.

सावित्रीबाई फुले रंगमंदिरात चव्हाण यांनी नगरसेवकांच्या कार्यपद्धतीबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली. तुमच्या मतदारसंघातील तसेच शहरातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावा, जनताभिमुख व्हा, असे चव्हाण म्हणाले. त्यांनी डोंबिवलीतील नगरसेवकांच्या कामांचे प्रगतीपुस्तक वाचून दाखवले. नागरिकांनी संधी दिली, याचा अर्थ आपण कसेही वागावे, असा होत नसून जबाबदारीने वागणे अत्यावश्यक आहे, असे नमूद करून चव्हाण म्हणाले की, गुजरातमधील स्टॅच्यू आॅफ युनिटीच्या कार्यक्रमालाही ठिकठिकाणांहून विद्यार्थी आले होते. परंतु, कल्याण-डोंबिवलीतून नगरसेवक गेले नाहीत. भाजपा जनताभिमुख कार्यक्रम घेत आहे. त्यामुळे जरी महापालिकेची निवडणूक जिंकणे सोपे झाले असले, तरी आता प्रत्येक नगरसेवकाने त्याच्या वॉर्डात किती सकारात्मक कामे केली, हे तपासणेही महत्त्वाचे आहे. मतदार एकदा निवडून देतात, पण त्यानंतर त्यांच्या विश्वासाला पात्र ठरणे, हे संबंधित नगरसेवकांचे काम आहे.साधी वेळ पाळणे, हे देखील अनेकांना जमत नाही, जनसंपर्क नाही, असे चालणार नाही. यापुढे नागरिकांच्या तक्रारी तातडीने सोडवा, अन्यथा पक्षस्तरावर त्याची गांभीर्याने नोंद घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट बजावले.रस्ते, पाणी, वीज, स्वच्छतेच्या समस्या सोडवाकल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपाप्रेमींमुळे पक्षाचा बालेकिल्ला अभेद्य आहे. नागरिकांच्या रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करा. स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता, महावितरणच्या अधिकारी-कर्मचाºयांकडून विद्युतसमस्या, अभियंत्यांकडून रस्ते आणि पाण्याचे समसमान वितरण अशा नियोजनाच्या माध्यमातून काम करणे आवश्यक आहे. यासाठी आपला जनसंपर्क, अभ्यास आणि आत्मीयता सर्वाधिक महत्त्वाची असल्याचे चव्हाण म्हणाले. यापुढे प्रत्येक नगरसेवकाने काय काम केले, त्याचा लेखाजोखा स्वत: ठेवावा. पक्षपातळीवर आमचे लक्ष निश्चितच आहे. एकदा चूक निदर्शनास आणत आहे. त्यातूनही सुधारणा न झाल्यास मात्र नंतर जे परिणाम होतील, त्याला सामोरे जा, अशी तंबी त्यांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणेBJPभाजपा