शहरं
Join us  
Trending Stories
1
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
2
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
3
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
4
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
5
बॉक्सर नीरजनं विचालं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
6
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
7
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
8
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
9
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
10
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
11
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
12
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
13
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
14
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
15
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
16
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
17
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
18
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
19
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
20
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमंत्री चव्हाण यांनी केली भाजपा नगरसेवकांची कानउघाडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 05:44 IST

कार्यक्रमाची वेळ पाळा : रस्त्यावर फिरा, जनसंपर्क वाढवा

अनिकेत घमंडीडोंबिवली : केडीएमसी भाजपाचे कधी नव्हे ते ४२ नगरसेवक निवडून आले आहेत. ३० नगरसेवकांना पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. लोकांनी दिलेल्या संधीचे सोने करा, जनसंपर्क वाढवा, रस्त्यावर फिरा, नागरिकांशी चर्चा करा, लोकांना दिलेली वेळ पाळा, अशा शब्दांत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी नगरसेवकांची कानउघाडणी केली.

सावित्रीबाई फुले रंगमंदिरात चव्हाण यांनी नगरसेवकांच्या कार्यपद्धतीबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली. तुमच्या मतदारसंघातील तसेच शहरातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावा, जनताभिमुख व्हा, असे चव्हाण म्हणाले. त्यांनी डोंबिवलीतील नगरसेवकांच्या कामांचे प्रगतीपुस्तक वाचून दाखवले. नागरिकांनी संधी दिली, याचा अर्थ आपण कसेही वागावे, असा होत नसून जबाबदारीने वागणे अत्यावश्यक आहे, असे नमूद करून चव्हाण म्हणाले की, गुजरातमधील स्टॅच्यू आॅफ युनिटीच्या कार्यक्रमालाही ठिकठिकाणांहून विद्यार्थी आले होते. परंतु, कल्याण-डोंबिवलीतून नगरसेवक गेले नाहीत. भाजपा जनताभिमुख कार्यक्रम घेत आहे. त्यामुळे जरी महापालिकेची निवडणूक जिंकणे सोपे झाले असले, तरी आता प्रत्येक नगरसेवकाने त्याच्या वॉर्डात किती सकारात्मक कामे केली, हे तपासणेही महत्त्वाचे आहे. मतदार एकदा निवडून देतात, पण त्यानंतर त्यांच्या विश्वासाला पात्र ठरणे, हे संबंधित नगरसेवकांचे काम आहे.साधी वेळ पाळणे, हे देखील अनेकांना जमत नाही, जनसंपर्क नाही, असे चालणार नाही. यापुढे नागरिकांच्या तक्रारी तातडीने सोडवा, अन्यथा पक्षस्तरावर त्याची गांभीर्याने नोंद घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट बजावले.रस्ते, पाणी, वीज, स्वच्छतेच्या समस्या सोडवाकल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपाप्रेमींमुळे पक्षाचा बालेकिल्ला अभेद्य आहे. नागरिकांच्या रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करा. स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता, महावितरणच्या अधिकारी-कर्मचाºयांकडून विद्युतसमस्या, अभियंत्यांकडून रस्ते आणि पाण्याचे समसमान वितरण अशा नियोजनाच्या माध्यमातून काम करणे आवश्यक आहे. यासाठी आपला जनसंपर्क, अभ्यास आणि आत्मीयता सर्वाधिक महत्त्वाची असल्याचे चव्हाण म्हणाले. यापुढे प्रत्येक नगरसेवकाने काय काम केले, त्याचा लेखाजोखा स्वत: ठेवावा. पक्षपातळीवर आमचे लक्ष निश्चितच आहे. एकदा चूक निदर्शनास आणत आहे. त्यातूनही सुधारणा न झाल्यास मात्र नंतर जे परिणाम होतील, त्याला सामोरे जा, अशी तंबी त्यांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणेBJPभाजपा