शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
2
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
3
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
4
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
5
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
6
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
7
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
8
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
9
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
10
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
11
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
12
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
13
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
14
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
15
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
16
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
17
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
18
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
19
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
20
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!

राज्यमंत्री चव्हाण यांनी केली भाजपा नगरसेवकांची कानउघाडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2018 05:44 IST

कार्यक्रमाची वेळ पाळा : रस्त्यावर फिरा, जनसंपर्क वाढवा

अनिकेत घमंडीडोंबिवली : केडीएमसी भाजपाचे कधी नव्हे ते ४२ नगरसेवक निवडून आले आहेत. ३० नगरसेवकांना पहिल्यांदाच संधी मिळाली आहे. लोकांनी दिलेल्या संधीचे सोने करा, जनसंपर्क वाढवा, रस्त्यावर फिरा, नागरिकांशी चर्चा करा, लोकांना दिलेली वेळ पाळा, अशा शब्दांत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांनी नगरसेवकांची कानउघाडणी केली.

सावित्रीबाई फुले रंगमंदिरात चव्हाण यांनी नगरसेवकांच्या कार्यपद्धतीबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली. तुमच्या मतदारसंघातील तसेच शहरातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावा, जनताभिमुख व्हा, असे चव्हाण म्हणाले. त्यांनी डोंबिवलीतील नगरसेवकांच्या कामांचे प्रगतीपुस्तक वाचून दाखवले. नागरिकांनी संधी दिली, याचा अर्थ आपण कसेही वागावे, असा होत नसून जबाबदारीने वागणे अत्यावश्यक आहे, असे नमूद करून चव्हाण म्हणाले की, गुजरातमधील स्टॅच्यू आॅफ युनिटीच्या कार्यक्रमालाही ठिकठिकाणांहून विद्यार्थी आले होते. परंतु, कल्याण-डोंबिवलीतून नगरसेवक गेले नाहीत. भाजपा जनताभिमुख कार्यक्रम घेत आहे. त्यामुळे जरी महापालिकेची निवडणूक जिंकणे सोपे झाले असले, तरी आता प्रत्येक नगरसेवकाने त्याच्या वॉर्डात किती सकारात्मक कामे केली, हे तपासणेही महत्त्वाचे आहे. मतदार एकदा निवडून देतात, पण त्यानंतर त्यांच्या विश्वासाला पात्र ठरणे, हे संबंधित नगरसेवकांचे काम आहे.साधी वेळ पाळणे, हे देखील अनेकांना जमत नाही, जनसंपर्क नाही, असे चालणार नाही. यापुढे नागरिकांच्या तक्रारी तातडीने सोडवा, अन्यथा पक्षस्तरावर त्याची गांभीर्याने नोंद घेतली जाईल, असे त्यांनी स्पष्ट बजावले.रस्ते, पाणी, वीज, स्वच्छतेच्या समस्या सोडवाकल्याण-डोंबिवलीमध्ये भाजपाप्रेमींमुळे पक्षाचा बालेकिल्ला अभेद्य आहे. नागरिकांच्या रस्ते, पाणी, वीज, स्वच्छता या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करा. स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता, महावितरणच्या अधिकारी-कर्मचाºयांकडून विद्युतसमस्या, अभियंत्यांकडून रस्ते आणि पाण्याचे समसमान वितरण अशा नियोजनाच्या माध्यमातून काम करणे आवश्यक आहे. यासाठी आपला जनसंपर्क, अभ्यास आणि आत्मीयता सर्वाधिक महत्त्वाची असल्याचे चव्हाण म्हणाले. यापुढे प्रत्येक नगरसेवकाने काय काम केले, त्याचा लेखाजोखा स्वत: ठेवावा. पक्षपातळीवर आमचे लक्ष निश्चितच आहे. एकदा चूक निदर्शनास आणत आहे. त्यातूनही सुधारणा न झाल्यास मात्र नंतर जे परिणाम होतील, त्याला सामोरे जा, अशी तंबी त्यांनी दिली. 

टॅग्स :thaneठाणेBJPभाजपा