शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे! जयंत पाटील यांच्या निलंबनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, ठाण्यात जोरदार निदर्शने

By अजित मांडके | Updated: December 22, 2022 18:28 IST

Thane News: राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्याकडून "दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे, ही नवीन घोषणा देण्यात आली.

- अजित मांडकेठाणे -  मुख्यमंत्र्यांनी केलेला जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश होऊ नये, यासाठी पटलावर नसलेले विषय सभागृहात आणून निर्वाचित लोकप्रतिनिधींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सत्ताधारी करीत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे, असा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्याकडून "दिल्लीचे मिंधे, एकनाथ शिंदे, ही नवीन घोषणा देण्यात आली.

विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्यामुळे जयंत पाटील आक्रमक झाले होते. पण यावेळी बोलत असताना त्यांनी विधानसभा अध्यक्षांना असंसदीय शब्द वापरला. त्यानंतर सभागृहात मोठा गदारोळ झाला आणि जयंत पाटलांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली. यानंतर जयंत पाटील यांच्या निलंबनाचा प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्यांचं निलंबन करण्यात आले. त्य निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी "तख्त बदल दो, ताज बदल दो ; गद्दारो  का राज बदल दो, निर्लज्ज सरकारचा निषेध असो, ईडी सरकार मुर्दाबाद,  पन्नास खोके -एकदम ओके, लोकशाहीचा गळा घोटणार्या सरकारचा निषेध  असो" अशा घोषणा देत जोरदार निदर्शने केली.  यावेळेस कार्यकर्त्यांकडून चक्क खोके आणले होते.

या प्रसंगी आनंद परांजपे यांनी, हे सरकार आपल्या बहुमताचा गैरवापर करीत आहे. महापुरूषांवरील अश्लाघ्य टीकेला आणि त्यांच्या बदनामीला हे सरकार सहज घेत आहे. महापुरूषांची बदनामी होत असताना हे सरकार शांत होते. मात्र, आता जो विषय पटलावर नाही; त्या विषयावर चर्चा घडवून मुख्यमंत्र्यांनी केलेला भ्रष्टाचार दडपून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. या संदर्भात दाखल केलेले प्रतिज्ञापत्र आमचे नेते डाॅ.जितेंद्र आव्हाड हे सभागृहात मांडणार होते. त्यामुळेच सत्ताधाऱ्यांनी 14 वेळा सभागृह बंद पाडले. सत्ताधारी पक्षातील 14 सदस्य सभागृहात बाजू मांडत असताना विरोधकांच्या एकाही सदस्याला बाजू मांडण्याची संधी दिली जात नाही. त्या विरोधात माईक बंद असताना केलेले भाष्य इतिवृत्तात आणून जयंत पाटील यांचे निलंबन केले जात असेल तर ही हुकूमशाहीची नांदी आहे. लोकशाहीचा गळा  घोटण्याचा हा प्रयत्न आम्ही सहन करणार नाही; त्या विरोधात आम्ही संघर्ष करू, असा इशारा दिला.

टॅग्स :thaneठाणेNCPराष्ट्रवादी काँग्रेसEknath Shindeएकनाथ शिंदेJayant Patilजयंत पाटील