शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

मीरा भाईंदरमध्ये सेल्फी पॉईंटच्या बांधकामांवर महापालिकेची लाखोंची उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 17:33 IST

रस्ते व पदपथ वर कोणत्याही स्वरूपाची बांधकामे करता येत नाहीत.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या मनमानी व उधळपट्टी कारभाराने अनेक समस्या रहात आल्या आहेत . आता तर आधीच रस्ते अरुंद असताना त्या रस्त्यांवर चक्क सेल्फी पॉईंटच्या नावाखाली नियमांचे उल्लंघन करून महापालिकाचा सर्वत्र मनमानीपणे बांधकाम करत सुटली आहे . रहदारीला अडथळा ठरणाऱ्या ह्या सेल्फी पॉईंटच्या बांधकामांवर लाखोंची उधळपट्टी चालली असून हि बांधकामे पाडा अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

रस्ते व पदपथ वर कोणत्याही स्वरूपाची बांधकामे करता येत नाहीत. न्यायालयाचे देखील तसे आदेश असून मीरारोडच्या विजय पार्क भागातील रस्त्यावर पोलीस चौकीचे नगरसेवक व पालिका निधीचे बांधकाम देखील न्यायालयात प्रदीप जंगम यांनी केलेल्या याचिके नंतर रद्द करण्याची नामुष्की पालिकेवर आली होती. परंतु तरी देखील काही नेते  व नगरसेवक आणि पालिका प्रशासन सुधारायचे नाव घेत नाहीत . मुळातच शहरातील रस्ते,या नाके व पदपथ अतिक्रमणाने व्यापलेले आहेत . लोकांना चालायला जागा नाही तर वाहतुकीची प्रचंड कोंडी नित्याची झाली आहे . जाहिरात फलक नियंत्रण अधिनियमा नुसार मनाई असताना देखील महापालिकेने ठेकेदारांच्या फायद्यासाठी पदपथ व रस्त्यांवर होर्डिंग उभारून दिले आहेत. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देणाऱ्या पालिकेने दुसरीकडे भाईंदर पूर्व रेल्वे स्थानक बाहेरील रस्ता हा विकास आराखड्या नुसार रुंद झाला नसताना येथे पालिकेने चक्क रस्त्यातच सुअभिकरणाचे काही कोटीचे बांधकाम चालवले आहे . भाईंदर पश्चिमेला देखील तसेच काम सुरु आहे .

भाईंदर फाटक येथील रस्त्यावर दोन्ही बाजूला पुतळे उभारून रस्ताच जवळपास नष्ट करून टाकला आहे. त्यातच आता काही नगरसेवकांचे चमकोगिरीचे लाड पुरवण्यासाठी शहरात रस्ता, नाके व पदपथवर  चक्क सेल्फी पॉईंटच्या नावाखाली बांधकामे चालवली आहेत . या बांधकामां साठी सर्रास नगरसेवक, प्रभाग समिती आदी निधीचा वापर करून उधळपट्टी चालवली आहे . 

आधीच रस्ते व पदपथ अरुंद असून वाढत्या लोकसंख्या व वाहनां मुळे चालायला जागा नसते. वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असते. तो त्रास कमी म्हणून की काय आता काही नगरसेवकांच्या चमकोगिरीच्या हव्यासाला पालिका प्रशासनाने खतपाणी घालत नियमबाह्यपणे भर रस्ता, पदपथ व नाक्यांवर सेल्फी पॉईंटची बांधकामे चालवली आहेत. 

ह्या बांधकामां मुळे आधीच अरुंद असलेले रस्ते - नाके व पदपथचा कोंडमारा झाला आहे. नागरिकांच्या त्रासात व वाहतूक कोंडीत मोठी भर पडली आहे. सेल्फी पॉईंट वर गर्दी जमल्यास ताप वाढून अपघात आणि भांडणे वाढण्याची शक्यता आहे. मुळात रहदारी व वर्दळीच्या ठिकाणी रस्ता - पदपथ वर सेल्फी पॉइंटच्या बांधकामांसाठी वाहतूक पोलिसांनी देखील परवानग्या दिल्या की नाही ? पोलिसांनी सदर कामे रोखली का नाही ? असे प्रश्न केले जात आहेत. 

सदर कामां बाबत तक्रारी आल्या असून आपल्या कार्यकाळात या कामाना मंजुरी दिलेली नाही. आयुक्तां कडे कामे रद्द करण्यास प्रस्ताव देऊ. दीपक खांबीत ( कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग ) 

आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी स्थिती महापालिकेची आणि नगरसेवकांची आहे. लोकांना चालायला जागा नाही आणि प्रचंड वाहतूक कोंडी असताना नगरसेवक व पालिकेला हे असले प्रकार करण्याची लाज कशी वाटत नाही ? रस्ते - पदपथ वरील सर्व सेल्फी पॉईंट तोडून गुन्हे दाखल झाले पाहिजेत. खर्च नगरसेवक - अधिकारी यांच्या कडून वसूल करा. जनतेच्या घामाचा पैसा आहे यांच्या घरचा नाही. प्रमोद देठे ( नागरिक ) 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक