शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

मीरा भाईंदरमध्ये सेल्फी पॉईंटच्या बांधकामांवर महापालिकेची लाखोंची उधळपट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2021 17:33 IST

रस्ते व पदपथ वर कोणत्याही स्वरूपाची बांधकामे करता येत नाहीत.

मीरारोड - मीरा भाईंदर महापालिकेच्या मनमानी व उधळपट्टी कारभाराने अनेक समस्या रहात आल्या आहेत . आता तर आधीच रस्ते अरुंद असताना त्या रस्त्यांवर चक्क सेल्फी पॉईंटच्या नावाखाली नियमांचे उल्लंघन करून महापालिकाचा सर्वत्र मनमानीपणे बांधकाम करत सुटली आहे . रहदारीला अडथळा ठरणाऱ्या ह्या सेल्फी पॉईंटच्या बांधकामांवर लाखोंची उधळपट्टी चालली असून हि बांधकामे पाडा अशी मागणी जोर धरू लागली आहे. 

रस्ते व पदपथ वर कोणत्याही स्वरूपाची बांधकामे करता येत नाहीत. न्यायालयाचे देखील तसे आदेश असून मीरारोडच्या विजय पार्क भागातील रस्त्यावर पोलीस चौकीचे नगरसेवक व पालिका निधीचे बांधकाम देखील न्यायालयात प्रदीप जंगम यांनी केलेल्या याचिके नंतर रद्द करण्याची नामुष्की पालिकेवर आली होती. परंतु तरी देखील काही नेते  व नगरसेवक आणि पालिका प्रशासन सुधारायचे नाव घेत नाहीत . मुळातच शहरातील रस्ते,या नाके व पदपथ अतिक्रमणाने व्यापलेले आहेत . लोकांना चालायला जागा नाही तर वाहतुकीची प्रचंड कोंडी नित्याची झाली आहे . जाहिरात फलक नियंत्रण अधिनियमा नुसार मनाई असताना देखील महापालिकेने ठेकेदारांच्या फायद्यासाठी पदपथ व रस्त्यांवर होर्डिंग उभारून दिले आहेत. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देणाऱ्या पालिकेने दुसरीकडे भाईंदर पूर्व रेल्वे स्थानक बाहेरील रस्ता हा विकास आराखड्या नुसार रुंद झाला नसताना येथे पालिकेने चक्क रस्त्यातच सुअभिकरणाचे काही कोटीचे बांधकाम चालवले आहे . भाईंदर पश्चिमेला देखील तसेच काम सुरु आहे .

भाईंदर फाटक येथील रस्त्यावर दोन्ही बाजूला पुतळे उभारून रस्ताच जवळपास नष्ट करून टाकला आहे. त्यातच आता काही नगरसेवकांचे चमकोगिरीचे लाड पुरवण्यासाठी शहरात रस्ता, नाके व पदपथवर  चक्क सेल्फी पॉईंटच्या नावाखाली बांधकामे चालवली आहेत . या बांधकामां साठी सर्रास नगरसेवक, प्रभाग समिती आदी निधीचा वापर करून उधळपट्टी चालवली आहे . 

आधीच रस्ते व पदपथ अरुंद असून वाढत्या लोकसंख्या व वाहनां मुळे चालायला जागा नसते. वाहतुकीची प्रचंड कोंडी होत असते. तो त्रास कमी म्हणून की काय आता काही नगरसेवकांच्या चमकोगिरीच्या हव्यासाला पालिका प्रशासनाने खतपाणी घालत नियमबाह्यपणे भर रस्ता, पदपथ व नाक्यांवर सेल्फी पॉईंटची बांधकामे चालवली आहेत. 

ह्या बांधकामां मुळे आधीच अरुंद असलेले रस्ते - नाके व पदपथचा कोंडमारा झाला आहे. नागरिकांच्या त्रासात व वाहतूक कोंडीत मोठी भर पडली आहे. सेल्फी पॉईंट वर गर्दी जमल्यास ताप वाढून अपघात आणि भांडणे वाढण्याची शक्यता आहे. मुळात रहदारी व वर्दळीच्या ठिकाणी रस्ता - पदपथ वर सेल्फी पॉइंटच्या बांधकामांसाठी वाहतूक पोलिसांनी देखील परवानग्या दिल्या की नाही ? पोलिसांनी सदर कामे रोखली का नाही ? असे प्रश्न केले जात आहेत. 

सदर कामां बाबत तक्रारी आल्या असून आपल्या कार्यकाळात या कामाना मंजुरी दिलेली नाही. आयुक्तां कडे कामे रद्द करण्यास प्रस्ताव देऊ. दीपक खांबीत ( कार्यकारी अभियंता, बांधकाम विभाग ) 

आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय अशी स्थिती महापालिकेची आणि नगरसेवकांची आहे. लोकांना चालायला जागा नाही आणि प्रचंड वाहतूक कोंडी असताना नगरसेवक व पालिकेला हे असले प्रकार करण्याची लाज कशी वाटत नाही ? रस्ते - पदपथ वरील सर्व सेल्फी पॉईंट तोडून गुन्हे दाखल झाले पाहिजेत. खर्च नगरसेवक - अधिकारी यांच्या कडून वसूल करा. जनतेच्या घामाचा पैसा आहे यांच्या घरचा नाही. प्रमोद देठे ( नागरिक ) 

टॅग्स :Mira Bhayander Municipal Corporationमीरा-भाईंदर महापालिका निवडणुक