शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी सत्तेसाठी कधीच हापापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
2
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
3
बलुचिस्तानात मोठा खेला...! सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग; भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला
4
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
5
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
6
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
7
Sita Navami 2025: संततीप्राप्तीसाठी सीता नवमीचे व्रत कसे व कधी करावे ते जाणून घ्या!
8
भयंकर! ४ वर्षे पालकांनी ३ मुलांना घरात ठेवलेलं कोंडून; कारण ऐकून बसेल मोठा धक्का
9
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
10
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
11
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
12
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या
13
“तेव्हा मी केंद्रात होतो, फडणवीस नाही”; जातनिहाय जनगणनेवर पृथ्वीराज चव्हाण स्पष्टच बोलले
14
Tata Motors नं Q4 निकाल आणि डिविडेंडपूर्वी घेतला मोठा निर्णय; ५०० कोटी रुपयांचं आहे प्रकरण
15
"...तर पाकिस्तान हल्ला करेल!"; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची भारताला पोकळ धमकी
16
Tarot Card: 'पेराल ते उगवेल' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
17
गर्लफ्रेंडसोबत चायनीज खाताना आईने लेकाला रंगेहाथ पकडलं; रस्त्यात चपलेने मारलं, धू-धू धुतलं
18
'या' कंपनीनं लाँच केला १८० दिवसांचा प्लान; SonyLIV सारख्या OTT चं मिळणार सबस्क्रिप्शन, काय आहे खास?
19
Leopard in Marathi: परीकडे बघून राधा अन् समृद्धी हसली; तिघींची गट्टी जमली
20
क्रिकेटवेडी, बोल्ड फोटो अन् शुबमनसोबत रिलेशनशीपची चर्चा; अवनीत कौर नेमकी आहे तरी कोण?

मध्यमवर्गीयांना फायदा नाही

By admin | Updated: March 3, 2015 01:39 IST

मध्यमवर्गीयांना काहीच फायदा नसून फक्त पायाभूत सोयीसुविधांवर जास्त लक्ष देण्यात आल्याचे मत नियोजन आयोगाचे माजी सदस्य व अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले.

मुंबई : यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांना काहीच फायदा नसून फक्त पायाभूत सोयीसुविधांवर जास्त लक्ष देण्यात आल्याचे मत नियोजन आयोगाचे माजी सदस्य व अर्थतज्ज्ञ डॉ. नरेंद्र जाधव यांनी व्यक्त केले. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीच्या वतीने अर्थसंकल्पावर नि:पक्षपातीपणे व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून डॉ.जाधव बोलत होते. अर्थसंकल्प हा देशाला नवीन आकार देण्याचे काम करतो म्हणून यामध्ये सर्व बाबींचा समावेश करणे आवश्यक असते. मात्र यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये असे दिसत नाही. आर्थिक शिस्त लावण्याचे काम एक वर्ष लांबणीवर पडलेले आहे, शिवाय एका बाजूला गुंतवणूक वाढवण्यासाठी प्रयत्न केले गेले पण दुसरीकडे बचतवाढीसाठी कुठलीच तरतूद नाही. कृषिप्रधान देशात शेती व शेतकऱ्यांवर अन्याय झालेला दिसून येतो. शिक्षण व कौशल्यविकासाच्या बाबतीत निराशा केली गेली आहे. काळा पैसा व बेनामी मालमत्तेसंदर्भात कडक कायदे घोषित केले, पण याच्या अंमलबजावणीच्या बाबतीत साशंकता असल्याचेही स्पष्ट केले. दलित आदिवासींकरिता तीस कोटींची घोषणा केली गेली, पण मागच्या वर्षीच्या तुलनेत तेरा हजार कोटींनी हा आकडा कमी आहे. हे दाखवण्यात आले नाही. या दलित आदिवासींच्या हक्काच्या निधीतून व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तीचे तीनशे कोटी रुपयांची कपात करून कॉर्पोरेट व संरक्षण क्षेत्रासाठी रान मोकळे करून देण्यात आल्याचेही या वेळी त्यांनी स्पष्ट केले. यासह अर्थसंकल्पावर अनेक सकारात्मक व नकारात्मक बाबींवर जाधव यांनी आपले विचार व्यक्त केले. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांची निराशाच्कृषिप्रधान देशात शेती व शेतकऱ्यांवर अन्याय झालेला दिसून येतो. शिक्षण व कौशल्यविकासाच्या बाबतीत निराशा केली गेली आहे.