शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीतील कंपन्यांमुळे डोंबिवलीत प्रदूषणाचा कहर, उग्र वासामुळे झोप उडाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 00:45 IST

एमआयडीसीतील कंपन्यांतून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक पाण्यामुळे शहरातील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. याविरोधात आंदालने, तक्रारी करूनही स्थिती ‘जैसे थे’ असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

डोंबिवली - एमआयडीसीतील कंपन्यांतून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक पाण्यामुळे शहरातील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. याविरोधात आंदालने, तक्रारी करूनही स्थिती ‘जैसे थे’ असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तीन दिवसांपासून कंपन्यांतून सोडले जाणारे प्रदूषित पाणी आणि धुरामुळे रात्री येणाºया उग्र वासामुळे सोनारपाडा, स्टार कॉलनी, तुकारामनगर, आयरे, कोपर आणि ठाकुर्ली परिसरातील रहिवाशांची झोप उडाली आहे.घरोघरी घटस्थापनेची तयारी सुरू असताना कंपन्यांनी गुपचूप प्रदूषित पाणी सोडल्याचा आरोप रहिवाशांनी केला आहे. शुक्रवारपासून रात्री ११ ते पहाटेपर्यंत उग्रवास हा वास येत आहे. यासंदर्भात एमआयडीसीकडे अद्याप कोणीही तक्रार केली नाही. तक्रार केल्यास त्याची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्यामुळे नागरिकांनी दाद कोणाकडे मागायची असा मोठा प्रश्न पडतो.प्रदूषण महामंडळाचे दुर्लक्ष होत असल्याने कंपन्या राजरोस उघड्या नाल्यांमधून रसायनमिश्रित पाणी नाल्यात सोडतात. मध्यंतरी गोळवली भागामध्येही कल्याण-शीळ महामार्गावर निळ्या रंगाचे पाणी रस्त्यावरून वाहत होते. तसेच रस्ता रुंदीकरणासाठी खोदलेल्या खड्ड्यांमध्येही ते जमा झाले होते. टाटा लेनजवळ रस्त्यावर असलेल्या रसायनमिश्रित पाणी साठवण्याच्या टाक्याही ओव्हरफ्लो होऊ न नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. तेव्हा सोशल मीडियावर त्याचे व्हिडीओ, फोटो व्हायरल झाले होते. अशा अनेक घटना सातत्याने घडत असूनही प्रदूषण महामंडळ, एमआयडीसी विभाग या घटनांकडे कोणी तक्रार करत नसल्याचे कारण देत दुर्लक्ष करत आहे. पण, यामुळे डोंबिवली शहरात भोपाळ दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ शकते, याचे गांभीर्यच अधिकाऱ्यांना नाही. सततच्या प्रदूषणामुळे अनेकांना श्वसन, डोळे चुरचुरणे, उलट्या, मळमळणे असा त्रास होत आहे.यासंदर्भात एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता संजय ननावरे म्हणाले की, उघड्या नाल्यांतून रासायनिक सांडपाणी वाहून नेऊ नये यासाठी पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे आगामी काळात अशी समस्या उद्भवणार नाही याची काळजी घेतली जात आहे.‘समस्या दूर करण्यासाठी समिती स्थापन करा’केंद्र सरकारने २००५ मध्ये मार्गदर्शक पुस्तिका काढली होती; मात्र त्यातील नियमावलीची कधी अंमलबजावणीच झालेली नाही. ज्या कंपन्या प्रदूषण करतात, त्या कंपनीमालकांवर फौजदारी गुन्हे दाखल हवेत, अशी मागणी एमआयडीसी परिसरातील रहिवासी प्रफुल देशमुख यांनी केली आहे.केमिकल कंपन्यांमुळे नागरिकांच्या जीवाला धोका आहे, तर अशा कंपन्यांनाना बंधने घालायला हवीत. डिस्प्ले बोर्ड लावून त्यातून प्रदूषणाची तीव्रता किती आहे याची दरदिवशी माहिती देणे आवश्यक आहे. प्रदूषण महामंडळाचे कार्यालय कल्याणमध्ये असल्याने काही घडल्यास डोंबिवली एमआयडीसीत अधिकारी येईपर्यंत होत्याचे नव्हते झालेले असते.कंपन्यांकडून केंद्र सरकारच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होत असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी प्रदूषण मंडळाने तहसीलदार, स्थानिक पोलीस, एमआयडीसी अधिकारी यांचीएक समिती तयार करून त्याद्वारे समस्या मार्गीलावणे आवश्यक असल्याचे देशमुख म्हणाले.

टॅग्स :dombivaliडोंबिवलीpollutionप्रदूषण