शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
8
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
9
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
10
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
11
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
12
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
13
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
14
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
15
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
16
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
17
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
18
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
19
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
20
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला

सेफ्टी ऑडिटमध्ये मेट्रोपॉलिटन कंपनी ठरली होती उत्तम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2020 03:44 IST

औद्योगिक सुरक्षा संचालनालयाचा दावा : मुख्यमंत्र्यांचे शब्द ठरले खरे

मुरलीधर भवार 

कल्याण : डोंबिवलीतील नागरी वस्तीशेजारी घातक रसायनांचे कारखाने सुरु ठेवून तुम्ही मरण पोसताय का, असा खडा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंधरा दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर धोकादायक व अतिधोकादायक कंपन्यांचे सर्वेक्षण सुरु असतानाच मेट्रोपॉलिटन एक्झिम केमिकल कंपनीला भीषण आग लागल्याने डोंबिवलीकरांच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या मरणाची मंगळवारी साक्ष पटली. ज्या कंपनीला आग लागली त्या कंपनीचे सुरक्षा आॅडीट केले होते. त्यामुळे हा केवळ अपघात असल्याचे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

डोंबिवलीतील केमिकल प्रदूषणामुळे गुलाबी झालेल्या रस्त्याची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुमारे पंधरा दिवसांपूर्वी आले होते. तेव्हा त्यांनी येथील रसायनांच्या कारखान्यांची बेफिकीरी पाहून सुरक्षेची उपाययोजना करायची नसल्यास कंपन्यांना टाळे ठोका, असा इशारा दिला होता. अतिधोकादायक कंपन्यांना इतरत्र हलवण्याची कार्यवाही सुरु करा असे आदेश दिले होते. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, अग्निशमन दल, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय अधिकाऱ्यांची एक समिती गठीत होणार होती.या संदर्भात औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या कल्याण कार्यालयातील सहसंचालक विनायक लोेंढे यांनी सांगितले की, समिती गठीत केली असून तिची पहिली बैठक मागच्या सोमवारी पार पडली. यात ठरल्यानुसार, कंपन्यांचे सर्वेक्षण करण्यास सुरुवात झाली आहे. कोणत्या कंपन्यांमध्ये कोणते उत्पादन घेतले जाते. त्याकरिता कोणता कच्चा माल वापरला जातो. कंपन्यांमध्ये किती कामगार आहेत. शेजारी नागरी वस्ती आहे का नाही ? ही माहिती गोळा केली जात आहे. हे सर्वेक्षण नेमके किती वेळेत पूर्ण होईल याविषयी लागलीच काही सांगता येणार नाही. मात्र आजच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर तातडीने सर्वेक्षण पूर्ण करुन अहवाल सादर केला जाईल, असे ते म्हणाले. ज्या मेट्रोपॉलिटन एक्झिम कंपनीत आग लागली त्याचे सेफ्टी आॅडीट केल्याचे लोंढे यांनी सांगितले. ही कंपनी अधून मधून सुरक्षिततेचे व आपत्कालीन परिस्थितीत काय करायचे याचे मॉकड्रीलही करीत होती. कंपनीत लागलेली आग हा एक अपघात आहे. इतकेच म्हणता येईल.माहिती अधिकार कार्यकर्ते राजू नलावडे यांनी डोंबिवली एमआयडीसी परिसरातील अतिधोकादायक पाच कंपन्यांची यादी उघड केली होती. त्यात आज आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या कंपनीचा समावेश होता. स्फोटासारखे आवाज येत असल्याने भयभीत झालेला तरुण दत्ता वाटोरे याने सांगितले की, भीषण आगीच्या घटनेमुळे आम्हाला प्रोबेस स्फोटाची आठवण झाली.प्रोबेस स्फोटाची आठवणडोंबिवलीतील नागरीकांना मंगळवारी प्रोबेस कंपनीतील भीषण स्फोटाची आठवण झाली. मे २०१६ मध्ये प्रोबेस कंपनीत भीषण स्फोट झाला होता. मंगळवारी केमिकलच्या ड्रमचे एका मागोमाग ५० हून अधिक स्फोट झाले. प्रोबेस कंपनीत एका पत्र्याच्या शेडचे वेल्डिंग सुरु होते. त्याची ठिणगी पडली आणि मोठा स्फोट झाला होता. मंगळवारी तसेच मोठे संकट चालून आले होते. मात्र जीवितहानी टळली. प्रोबेस स्फोटाच्या चौकशीत कंपनीत अत्यंत ज्वलनशील रसायनांचा साठा असल्याचे उघड झाले होते. स्फोटाच्या चौकशी अहवालात ज्या काही शिफारसी करण्यात आल्या त्याकडे डोळेझाक केली गेली. त्यामुळे अशा घटनांची पुनरावृत्ती घडली आहे. 

टॅग्स :kalyanकल्याणfireआग