शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रोचे अधिकारी मुख्यमंत्र्यांना खोटे बोलायला लावतात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 05:37 IST

आरे येथील प्रस्तावित मेट्रो कारशेडच्या प्रकरणात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पाेरेशनच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले.

अंबरनाथ : आरे येथील प्रस्तावित मेट्रो कारशेडच्या प्रकरणात युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी मुंबई मेट्रो रेल कॉर्पाेरेशनच्या अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. हे अधिकारी मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती देऊन त्यांना खोटे बोलायला लावत असल्याचा आरोप त्यांनी अंबरनाथमध्ये जनआशीर्वाद यात्रेदरम्यान केला.कल्याण लोकसभा मतदारसंघातील जनआशीर्वाद यात्रेला आदित्य ठाकरे यांनी अंबरनाथमधून सुरुवात केली. बुधवारी सकाळी ११ वाजता फॉरेस्ट नाका येथून यात्रा सुरू झाली. यात्रेच्या मार्गावर नागरिक आणि कार्यकर्त्यांची भेट घेत ते शिवाजी चौकात आले. येथे त्यांनी उपस्थितांना संबोधित केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी आरे येथील कारशेडमुळे होणाºया पर्यावरणाच्या हानीसाठी एमएमआरसीएलच्या अधिकाऱ्यांना दोषी धरले. हे अधिकारी मुख्यमंत्र्यांना खोटी माहिती देत असल्याचा आरोप त्यांनी केला.नाणार येथील प्रकल्पाच्या मुद्द्यावर शिवसेना भूमिपुत्रांच्या बाजूने आहे. मात्र, त्याचा अर्थ असाही नाही की आम्हाला विकास नको; पण पर्यावरणाची हानी करून कोणताच विकास नको. भूमिपुत्रांचा विरोध असेल तर तिथे आमचाही विरोध असेल. त्यातून मार्ग काढण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. नेत्यांच्या वाढत्या पक्षांतराबाबत बोलताना निवडणुकीत नेत्यांविषयी चर्चा करण्याऐवजी नागरिकांच्या प्रश्नांवर विचार करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. स्वत:च्या निवडणूक लढवण्याच्या मुद्द्यावरही त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्र ही माझी कर्मभूमी असून लोकांचा आशीर्वाद घेतल्यानंतर आपण त्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.>विद्यार्थी दोन तास ताटकळतउल्हासनगर : जनआशीर्वाद यात्रेसाठी उल्हासनगरात बुधवारी आलेले आदित्य ठाकरे हे विद्यार्थ्यांशी संवाद साधणार होते. त्यासाठी येथील दोन शाळांमध्ये विद्यार्थी जवळपास दोन तास ताटकळत बसले होते. मात्र ऐनवेळी त्यांचा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. यात्रेच्या मार्गावरील खड्डे रातोरात बुजविण्यात आले. या वेळी ठाकरे यांनी थायरियासिंघ दरबारच्या वतीने शेणापासून लाकूड बनविण्याच्या कारखान्याचे उद्घाटन केले. येथे बनविलेले लाकूड स्मशानभूमीला मोफत देण्यात येणार आहे. उल्हासनगरात शिवसैनिकांनी यात्रेच्या मार्गात ठिकठिकाणी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019