शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

हॉटस्पॉटमुळे मेट्रो मॉल बंद, मॉलच्या गेटवरून ग्राहकांचा परतीचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2020 22:14 IST

मेट्रो मॉल हे कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ येथील ग्राहकांच्या विविध उपयोगी वस्तू खरेदी करण्याचे आकर्षण केंद्र आहे. मात्र मागील पाच महिन्यापासून मेट्रो मॉल बंद आहे.

कुलदीप घायवट

कल्याण : राज्य शासनाने मिशन बिगिन अगेनमध्ये मॉल सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मॉल प्रशासक कोरोना संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाययोजना करून मॉल खुले केले आहेत. मुंबई, नवी मुंबई महापालिकेने शहरातील मॉल्स सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने मेट्रो जंक्शन मॉल परिसर हॉटस्पॉट येत असल्याने मॉल बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर, तांत्रिक कारणास्तव मॉल बंद असल्याचा फलक मॉलच्या प्रवेशद्वाराजवळ लावले आहे. त्यामुळे ग्राहकांचा मॉलच्या गेटवरून परतीचा प्रवास होत आहे. 

मेट्रो मॉल हे कल्याण, उल्हासनगर, बदलापूर, अंबरनाथ येथील ग्राहकांच्या विविध उपयोगी वस्तू खरेदी करण्याचे आकर्षण केंद्र आहे. मात्र मागील पाच महिन्यापासून मेट्रो मॉल बंद आहे. राज्य सरकार कोरोनासोबत लढताना परिस्थिती पूर्वपदावर आणण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. कोरोना रुग्णांच्या संख्येनुसार महानगरपालिकांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारने दिला आहे. त्यामुळेच मेट्रो मॉल बंद आहे. सकाळपासून ते सायंकाळपर्यंत मॉलच्या दिशेने अनेक ग्राहक येतात. मात्र प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षकांकडून मॉल बंद असल्याचे सांगण्यात येते. ग्राहकांने बंद असल्याचे कारण विचारल्यास, महापालिकेने मॉल बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे सुरक्षा रक्षकांकडून सांगण्यात येते.  तसेच, तांत्रिक कारणांमुळे पुढील सूचना मिळेपर्यंत मॉल बंद राहील, असा फलक मॉलच्या प्रवेशद्वाराजवळ लावला आहे.  त्यामुळे मॉलच्या दोन्ही प्रवेशद्वारापासून प्रवासी परत फिरतात.

मुंबई, नवी मुंबई महानगरपालिकेने मॉल्स सुरू ठेवले आहेत. येथील मॉल प्रशासकाने निर्जंतुकीकरण, स्वच्छता, कर्मचाऱ्यांना मास्क अशी खबरदारी घेतली आहे. कोरोना संदर्भातील उपाययोजना करून कल्याण-डोंबिवली  महानगरपालिकेनेही मिशन बिगिन अगेन अंतर्गत मॉल सुरू करण्याच्या सूचना द्याव्यात, अशी भावना नागरिकांनी व्यक्त केली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याkalyanकल्याणthaneठाणे