शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
4
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
5
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
6
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
7
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
8
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
9
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
10
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
11
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
12
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
13
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
14
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
15
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
16
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
17
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
18
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
19
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
20
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....

एमआयडीसीने वाल्मिकी उद्यानाची विक्री केल्याच्या निषेधार्थ मेहतर समाजाचा मोर्चा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 16:36 IST

Thane : रामनगर- रामवाडी, रोड नंबर 28 परिसरात वाल्मिकी समाजाची मोठी संख्या आहे. या समाजाला आपले कार्यक्रम करता यावे, या उद्देशाने येथील नगरसेवक डॉ. जितेंद्र वाघ यांनी प्लॉट क्रमांक 414 येथे एक शेड बांधून दिली होती.

ठाणे (प्रतिनिधी)- ठाणे महानगर पालिकेने पडीक असलेला भूखंड विकसीत करुन वाल्मिकी उद्यानाची निर्मिती केल्यानंतर हा भूखंड परस्पर खासगी इसमास विकला असल्याच्या निषेधार्थ रामवाडी-रामनगर परिसरातील वाल्मिकी समाज बांधवांनी एमआयडीसीवर मोर्चा नेला. विशेष म्हणजे, पोलिसांनी मोर्चास परवानगी नाकारल्यानंतरही येथील तरुणांनी दुचाकीवरुन हा मोर्चा नेला. 

रामनगर- रामवाडी, रोड नंबर 28 परिसरात वाल्मिकी समाजाची मोठी संख्या आहे. या समाजाला आपले कार्यक्रम करता यावे, या उद्देशाने येथील नगरसेवक डॉ. जितेंद्र वाघ यांनी प्लॉट क्रमांक 414 येथे एक शेड बांधून दिली होती. तसेच, एक मंच, उद्यानही उभारण्यात आले होते. या जागेत प्रवेश करण्यासाठी एक प्रवेशद्वार उभारण्यात आला होता. या प्रवेशद्वारावरही ठाणे महानगर पालिका, वाल्मिकी उद्यान असा नामोल्लेख करण्यात आला होता. त्या ठिकाणी वाल्मिकी समाजाचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत.

याच ठिकाणी ठाणे महानगर पालिकेची एक पाण्याची टाकीदेखील आहे. या पाण्याच्या टाकीद्वारे परिसरातील लोकांना पाण्याचा पुरवठाही करण्यात येत आहे. असे असताना आता अचानक या प्लॉटची मालकी खासगी इसमाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्या निषेधार्थ रिपाइं एकतावादीचे ठाणे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ चव्हाण, वाल्मिकी नेते दशरथ आठवाल, दावडा सेठ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो वाल्मिकी समाजबांधवांनी वाल्मिकी उद्यानापासूनच मोर्चाला सुरुवात केली. या ठिकाणी एमआयडीसीच्या विरोधात मोर्चेकर्‍यांनी घोषणाबाजी केली. हा मोर्चा पायी निघणार होता. मात्र, पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारल्यामुळे मोर्चेकर्‍यांनी दुचाकीवरुन एमआयडीसीचे कार्यालय

गाठून   एमआयडीसी प्लॉट क्रमांक 414 हा भूखंड वाल्मिकी समाजाच्या उपक्रमांसाठी राखीव ठेवण्यात यावा;  प्लॉट क्रमांक 414 अर्थात वाल्मिकी उद्यानाचा खरेदी-विक्रीचा व्यवहार रद्द करण्यात यावा; प्लॉट क्रमांक 414 वरील खासगी इसमाचे अतिक्रमण दूर करुन वाल्मिकी समाजाच्या उपक्रमांना त्याचा वापर करण्यास परवानगी देण्यात यावी, या मागणीचे निवेदन दिले. यावेळी राजाभाऊ चव्हाण आणि दशरथ आठवाल यांनी, वाल्मिकी समाजाच्या कार्यक्रमांवर बंदी आणण्यासारखाच आहे.

एकीकडे अनेक वर्षापासून ठाणे महानगर पालिकेने या भूखंडाची काळजी घेऊन त्या ठिकाणी विविध उपक्रम सुरु केले असतानाच आता अचानक का भूखंड खासगी इसमाच्या ताब्यात देणे अत्यंत चुकीचे आहे. वाल्मिकी महाराजांच्या नावावर असलेल्या या उद्यानाची विक्री करुन वाल्मिकी समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रकार केला आहे. या संदर्भात मागील आठवड्यात पत्रव्यवहार केलेला असतानाही भूखंड विक्रीचा व्यवहार करुन भूखंड विकत घेणार्‍या इसमाने आता हे उद्यान ताब्यात घेऊन वाल्मिकी समाजाला सदर उद्यानामध्ये प्रवेश करण्यापासून रोखले जात आहे. त्यामुळे हा  खरेदी-विक्रीचा व्यवहार रद्द करुन उद्यान पुन्हा वाल्मिकी समाजाच्या ताब्यात देण्यात यावा, अन्यथा, या मोर्चापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला. 

या आंदोलनात बीरपाल भाल, रामवीर पारछा, विनोद सजानिया, नरेश बोहित, राजपाल मरोठिया, सोनी चौहान, श्याम पारछा, राजेश खत्री, राजकुमार सिंह, दशरथ आठवाल, अशोक पवार, राजू सैदा  आदी सहभागी झाले होते.

टॅग्स :thaneठाणे