शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कल्याण-डोंबिवलीतील अर्धवट रस्त्यांचा स्थायी समितीच्या सभेत पंचनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 20:44 IST

शहराच्या पश्चिम भागातील संतोषीमाता रोडचे सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम अर्धवट असल्याने शाळकरी जेसलीन कुट्टी या ११ वर्षीय मुलाचा मंगळवारी अपघाती मृत्यू झाला होता. या घटनेचे तीव्र पडसाद आज पार पडलेल्य महापालिकेच्या स्थायी समिती सभेत उमटले.

कल्याण - शहराच्या पश्चिम भागातील संतोषीमाता रोडचे सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम अर्धवट असल्याने शाळकरी जेसलीन कुट्टी या ११ वर्षीय मुलाचा मंगळवारी अपघाती मृत्यू झाला होता. या घटनेचे तीव्र पडसाद आज पार पडलेल्य महापालिकेच्या स्थायी समिती सभेत उमटले. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती राहूल दामले यांनी प्रशासनाला दिले आहे. त्याचबरोबर हा रस्ता २८ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करण्याची डेडलाईन प्रशासनाकडून वदवून घेतली आहे.मुलाचा अपघात झाला त्याला महापालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत असा आरोप स्थायी समिती सदस्य दीपेश म्हात्रे यांनी केला. संतोषी माता रस्ता हा आयुक्तांच्या बगल्याजवळ आहे. तसेच हा रस्ता मुरबाड रोड व कल्याण आग्रा रोडला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्याचे काम २०१४ पासून सुरु आहे. यापूर्वीच्या कंत्राटदाराला प्रशासनाने ६ टक्के कमी दराने रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्याचे काम दिले होते. त्याचे काम रद्द करण्यात आले.त्यानंतर दुसरा कंत्राट कंपनीला १५ टक्के जादा दराने निविदा दिली. २०१४ सालापासून रस्त्याचे काम सुरु आहे. हे काम अर्धवट असल्याने जेसलीन या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या मृत्यूस महापालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत. या आरोपाचे खंडन करताना शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी या अपघाताचा महापालिकेच्या रस्ते विकास कामाशी काही एक संबंध नाही. अपघात स्थळ हे अर्धवट कामापासून दूर आहे अशी माहिती दिली. त्याला म्हात्रे यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्याचबरोबर या प्रकरणी खुलासा करताना कार्यकारी अभियंता सुनिल जोशी यांनी सांगितले की, अपघाताशी कल्याण डोंबिवली महापालिकेचा संबंध नाही. कामात दिरंगाई झाली हे मान्य केले. रस्ते विकासाची कामे मार्च २०१७ रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यात काही अडचणी आल्याचे कुलकर्णी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.मात्र एका विद्यार्थ्याचा नाहक बळी गेला. या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी म्हात्रे यांनी उचलून धरली. त्यावर सभापती दामले यांनी सांगितले की, रोड चांगला असता तर अपघात झालाच नसता. आयुक्तांच्या बंगल्या समोरचा रस्ता प्रशासन वेळेत पूर्ण करु शकत नाही. त्याचबरोबर या बंगल्यात राहणारे चार आयुक्त यापूर्वी बदलून गेले. त्यांनाही हे काम वेळेत पूर्ण करावे अशी विचारणा प्रशासनातील अधिका-यांकडे करावीशी वाटली नाही. रस्ते विकासातील अडचणी सोडविण्यासाठी चार वर्षे लागतात. हे काही न पटण्यासारखे आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सभापती दामले यांनी प्रशासनाला दिले. या प्रकरणी शहर अभियंता यांची चौकशी होणार आहे. तसेच हा रस्ता कधी पूर्ण करणार त्याची डेडलाईन सांगा असे दामले यांनी प्रशासनाकडून वदवून घेतले. तेव्हा कार्यकारी अभियंता जोशी यांनी हा रस्ता २८ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण केला जाईल असे ठोस आश्वासन दिले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMuncipal Corporationनगर पालिका