शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
2
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
3
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
4
एक स्मार्ट डिसिजन EPFO कडून मिळवून देईल अधिक पेन्शन; वय आणि कमाईचं कनेक्शन बहुतेकांना माहीत नाही
5
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
6
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
7
'महाभारत' सिनेमानंतर आमिर खान खरंच निवृत्ती घेणार? चर्चांवर म्हणाला, "आजकाल लोक..."
8
घटस्फोटानंतर दोन महिन्यातच एक्स पतीचं निधन, त्याच्या आठवणीत अभिनेत्री शुभांगी अत्रे भावुक
9
कोपरखैरणेत बेरोजगार पतीचं हादरवणारं कृत्य; पत्नीची मैत्रीण घरात शिरताच उडाला थरकाप
10
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
11
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
12
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
13
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
14
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
15
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
16
शू रॅकवर बसल्याने मांजराला नवव्या मजल्यावरून फेकले, आरोपी शेजाऱ्याविरोधात गुन्हा दाखल
17
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
18
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
19
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
20
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव

कल्याण-डोंबिवलीतील अर्धवट रस्त्यांचा स्थायी समितीच्या सभेत पंचनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 20:44 IST

शहराच्या पश्चिम भागातील संतोषीमाता रोडचे सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम अर्धवट असल्याने शाळकरी जेसलीन कुट्टी या ११ वर्षीय मुलाचा मंगळवारी अपघाती मृत्यू झाला होता. या घटनेचे तीव्र पडसाद आज पार पडलेल्य महापालिकेच्या स्थायी समिती सभेत उमटले.

कल्याण - शहराच्या पश्चिम भागातील संतोषीमाता रोडचे सिमेंट कॉन्क्रीटीकरणाचे काम अर्धवट असल्याने शाळकरी जेसलीन कुट्टी या ११ वर्षीय मुलाचा मंगळवारी अपघाती मृत्यू झाला होता. या घटनेचे तीव्र पडसाद आज पार पडलेल्य महापालिकेच्या स्थायी समिती सभेत उमटले. या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती राहूल दामले यांनी प्रशासनाला दिले आहे. त्याचबरोबर हा रस्ता २८ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण करण्याची डेडलाईन प्रशासनाकडून वदवून घेतली आहे.मुलाचा अपघात झाला त्याला महापालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत असा आरोप स्थायी समिती सदस्य दीपेश म्हात्रे यांनी केला. संतोषी माता रस्ता हा आयुक्तांच्या बगल्याजवळ आहे. तसेच हा रस्ता मुरबाड रोड व कल्याण आग्रा रोडला जोडणारा महत्वाचा रस्ता आहे. या रस्त्याचे काम २०१४ पासून सुरु आहे. यापूर्वीच्या कंत्राटदाराला प्रशासनाने ६ टक्के कमी दराने रस्त्यांचे सिमेंट कॉन्क्रीटीकरण करण्याचे काम दिले होते. त्याचे काम रद्द करण्यात आले.त्यानंतर दुसरा कंत्राट कंपनीला १५ टक्के जादा दराने निविदा दिली. २०१४ सालापासून रस्त्याचे काम सुरु आहे. हे काम अर्धवट असल्याने जेसलीन या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. या मृत्यूस महापालिकेचे अधिकारी जबाबदार आहेत. या आरोपाचे खंडन करताना शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी या अपघाताचा महापालिकेच्या रस्ते विकास कामाशी काही एक संबंध नाही. अपघात स्थळ हे अर्धवट कामापासून दूर आहे अशी माहिती दिली. त्याला म्हात्रे यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्याचबरोबर या प्रकरणी खुलासा करताना कार्यकारी अभियंता सुनिल जोशी यांनी सांगितले की, अपघाताशी कल्याण डोंबिवली महापालिकेचा संबंध नाही. कामात दिरंगाई झाली हे मान्य केले. रस्ते विकासाची कामे मार्च २०१७ रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यात काही अडचणी आल्याचे कुलकर्णी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते.मात्र एका विद्यार्थ्याचा नाहक बळी गेला. या प्रकरणाची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी म्हात्रे यांनी उचलून धरली. त्यावर सभापती दामले यांनी सांगितले की, रोड चांगला असता तर अपघात झालाच नसता. आयुक्तांच्या बंगल्या समोरचा रस्ता प्रशासन वेळेत पूर्ण करु शकत नाही. त्याचबरोबर या बंगल्यात राहणारे चार आयुक्त यापूर्वी बदलून गेले. त्यांनाही हे काम वेळेत पूर्ण करावे अशी विचारणा प्रशासनातील अधिका-यांकडे करावीशी वाटली नाही. रस्ते विकासातील अडचणी सोडविण्यासाठी चार वर्षे लागतात. हे काही न पटण्यासारखे आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सभापती दामले यांनी प्रशासनाला दिले. या प्रकरणी शहर अभियंता यांची चौकशी होणार आहे. तसेच हा रस्ता कधी पूर्ण करणार त्याची डेडलाईन सांगा असे दामले यांनी प्रशासनाकडून वदवून घेतले. तेव्हा कार्यकारी अभियंता जोशी यांनी हा रस्ता २८ फेब्रुवारी पर्यंत पूर्ण केला जाईल असे ठोस आश्वासन दिले.

टॅग्स :kdmcकल्याण डोंबिवली महापालिकाMuncipal Corporationनगर पालिका