शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
5
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
6
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
7
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
8
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
9
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
10
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
11
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
12
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
13
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
14
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
15
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
16
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
17
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
18
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल
19
अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी कशी झाली? प्रत्यक्षदर्शींनी दिली धक्कादायक माहिती, म्हणाले...  
20
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख

उल्हासनगरात शिवसेना-राष्ट्रवादी पक्ष नेत्यांची बैठक, मात्र काँग्रेसचे एकलो चलोचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 17:28 IST

महापालिका निवडणूक पाश्वभूमीवर महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने महापालिका निवडणुकीत एकलो चलोची भूमिका घेतल्याने, काँग्रेस पक्ष नेत्यांना बैठकीला बोलाविले नसल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिका निवडणूक पाश्वभूमीवर शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांची गोलमैदान येथील खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयात गुरवारी रात्री पार पडली. बैठकीला शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना नेते धनंजय बोडारे, अरुण अशान तर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष पंचम कलानी, ओमी कलानी, मनोज लासी आदीजन उपस्थित होते.

 उल्हासनगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत राज्यात सत्तेत असलेली महाविकास आघाडी एकत्रपणे उतरतील अशी आशा शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी यापूर्वी दिली होती. मात्र गुरवारी गोलमैदान येथील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयात निवडणूक पाश्वभूमीवर शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्याच्या निवडणुकी बाबत प्राथमिक चर्चा झाली. काँग्रेस पक्षाच्या बैठकीला बोलावले नसल्याने, शहर महाविकास आघाडीत बिघाडी झाली काय? अशी चर्चाही झाली. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना नेते धनंजय बोडारे, अरुण अशान, नगरसेवक कलवंत सिंग बिट्टू, तर राष्ट्रवादी पक्षाकडून शहाराध्यक्षा पंचम कलानी, ओमी कलानी, नगरसेवक मनोज लासी, सुमित चक्रवर्ती, युवानेते कमलेश निकम आदीजन बैठकीला उपस्थित होते. शहर विकास कामे आदी बाबत प्राथमिक चर्चा बैठकीत झाल्याची माहिती बोडारे यांनी दिली. 

महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने महापालिका निवडणुकीत एकलो चलोची भूमिका घेतल्याने, काँग्रेस पक्ष नेत्यांना बैठकीला बोलाविले नसल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. मात्र निवडणुकीत महाविकास आघाडी कायम राहावी, असे पक्ष नेत्यांचे व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. असेही चौधरी म्हणाले. तर काँग्रेस पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी महापालिका निवडणुकी बाबत एकलो चलोची भूमिका पक्ष नेतृत्वाची असलीतरी, तसे आदेश प्रत्यक्षात आले नाही. पक्षाच्या भूमिकेनुसार महापालिका निवडणुकीत ध्येय धोरणे घेतले जाणार असल्याचे साळवे म्हणाले. महापालिकेत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षातील गंगोत्री गटाला बोलाविले नसल्याची चर्चाही शहरात रंगली आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस