शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

उल्हासनगरात शिवसेना-राष्ट्रवादी पक्ष नेत्यांची बैठक, मात्र काँग्रेसचे एकलो चलोचा सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 17:28 IST

महापालिका निवडणूक पाश्वभूमीवर महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने महापालिका निवडणुकीत एकलो चलोची भूमिका घेतल्याने, काँग्रेस पक्ष नेत्यांना बैठकीला बोलाविले नसल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली.

सदानंद नाईक 

उल्हासनगर : महापालिका निवडणूक पाश्वभूमीवर शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांची गोलमैदान येथील खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयात गुरवारी रात्री पार पडली. बैठकीला शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना नेते धनंजय बोडारे, अरुण अशान तर राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष पंचम कलानी, ओमी कलानी, मनोज लासी आदीजन उपस्थित होते.

 उल्हासनगर महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत राज्यात सत्तेत असलेली महाविकास आघाडी एकत्रपणे उतरतील अशी आशा शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी यापूर्वी दिली होती. मात्र गुरवारी गोलमैदान येथील खासदार श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयात निवडणूक पाश्वभूमीवर शिवसेना व राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्याच्या निवडणुकी बाबत प्राथमिक चर्चा झाली. काँग्रेस पक्षाच्या बैठकीला बोलावले नसल्याने, शहर महाविकास आघाडीत बिघाडी झाली काय? अशी चर्चाही झाली. शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, शिवसेना नेते धनंजय बोडारे, अरुण अशान, नगरसेवक कलवंत सिंग बिट्टू, तर राष्ट्रवादी पक्षाकडून शहाराध्यक्षा पंचम कलानी, ओमी कलानी, नगरसेवक मनोज लासी, सुमित चक्रवर्ती, युवानेते कमलेश निकम आदीजन बैठकीला उपस्थित होते. शहर विकास कामे आदी बाबत प्राथमिक चर्चा बैठकीत झाल्याची माहिती बोडारे यांनी दिली. 

महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाने महापालिका निवडणुकीत एकलो चलोची भूमिका घेतल्याने, काँग्रेस पक्ष नेत्यांना बैठकीला बोलाविले नसल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी दिली. मात्र निवडणुकीत महाविकास आघाडी कायम राहावी, असे पक्ष नेत्यांचे व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. असेही चौधरी म्हणाले. तर काँग्रेस पक्षाचे शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी महापालिका निवडणुकी बाबत एकलो चलोची भूमिका पक्ष नेतृत्वाची असलीतरी, तसे आदेश प्रत्यक्षात आले नाही. पक्षाच्या भूमिकेनुसार महापालिका निवडणुकीत ध्येय धोरणे घेतले जाणार असल्याचे साळवे म्हणाले. महापालिकेत शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची सत्ता आहे. तसेच राष्ट्रवादी पक्षातील गंगोत्री गटाला बोलाविले नसल्याची चर्चाही शहरात रंगली आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस